शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

गुजरात राज्यासह सात जिल्ह्यांच्या सीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोना संसर्गाच्या वाढत्या संकटामुळे राज्य शासनाने गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू केली असून, संचारबंदीसोबतच ...

नाशिक : कोरोना संसर्गाच्या वाढत्या संकटामुळे राज्य शासनाने गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू केली असून, संचारबंदीसोबतच जिल्हा बंदीचे आदेशही लागू केले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात राज्याच्या सीमेसह ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमा भागातील रस्त्यांवर एकून २६ तपासणी नाके लावण्यात आले आहेत. याठिकाणी कसून तपासणी केल्याशिवाय कोणालाही नाशिक जिल्ह्यात प्रवेश दिला जात नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या सात जिल्ह्यांच्या व एका राज्याची सीमा बंद करण्यात आली असून, सीमा भागात ग्रामीण पोलिसांची पथके खडा पहारा देत आहेत. यात अहमदनगर जिल्ह्याची येवला व सिन्नरमधील नांदुरशिंगोटे, वावी परीसरातील सीमा बंद करण्यात आली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्याला लागून असलेली येवला, आंदरसूल भागातील सीमाही बंद करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातून नाशिकमध्ये येणारा मार्ग मालेगावातील झोडगे येथे बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जळगावचा सीमामार्ग नांदगाव, चाळीसगाव भागात बंद करण्यात आला असून, नंदूरबारमधून येणारा रस्ता सटाण्यातील ताराहाबाद सीमेवर अडवण्यात आला आहेे. त्र्यंबकेश्वरला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याची सीमा आंबोली घाटात बंद करण्यात आली आहे तर इगतपुरीला लागून असलेल्या घाटनदेवी भागात नाकाबंदी करून मुंबई, कल्याण व ठाणे जिल्ह्यातून येणारी वाहने अडवली जात आहेत. या सातही जिल्ह्यांतून नाशिकमध्ये येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात असून, अत्यावश्यक कारणांची पडताळणी करूनच वाहनांना जिल्हा प्रवेशाची परवानगी दिली जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

इन्फो-

गुजरातच्या सीमाही बंद

नाशिक जिल्ह्याला लागून गुजरात राज्याची सीमा आहे. या सीमेलगतच्या भागात ८ तपासणी नोक लावण्यात आले असून, आंतरजिल्हा मार्गांवर १८ तपासणी नाक्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या तपासणी नाक्यांवर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यात जवळपास दोन हजार ग्रामीण पोलिसांसह एक हजार होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या एक कंपनीचा समावेश आहे.

कोट-

शासनाने अत्यावश्यक व इतर महत्त्वाच्या कारणांसाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रं अपलोड करून ऑनलाईन परवानगी मि‌ळवून अत्यावश्यक कारणांसाठी नागरिक प्रवास करू शकतील. परंतु, अतिमहत्त्वाच्या आणि अत्यावश्यक कारणाशिवाय लोकांनी बाहेर पडू नये.

- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक