शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात राज्यासह सात जिल्ह्यांच्या सीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोना संसर्गाच्या वाढत्या संकटामुळे राज्य शासनाने गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू केली असून, संचारबंदीसोबतच ...

नाशिक : कोरोना संसर्गाच्या वाढत्या संकटामुळे राज्य शासनाने गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू केली असून, संचारबंदीसोबतच जिल्हा बंदीचे आदेशही लागू केले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात राज्याच्या सीमेसह ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमा भागातील रस्त्यांवर एकून २६ तपासणी नाके लावण्यात आले आहेत. याठिकाणी कसून तपासणी केल्याशिवाय कोणालाही नाशिक जिल्ह्यात प्रवेश दिला जात नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या सात जिल्ह्यांच्या व एका राज्याची सीमा बंद करण्यात आली असून, सीमा भागात ग्रामीण पोलिसांची पथके खडा पहारा देत आहेत. यात अहमदनगर जिल्ह्याची येवला व सिन्नरमधील नांदुरशिंगोटे, वावी परीसरातील सीमा बंद करण्यात आली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्याला लागून असलेली येवला, आंदरसूल भागातील सीमाही बंद करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातून नाशिकमध्ये येणारा मार्ग मालेगावातील झोडगे येथे बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जळगावचा सीमामार्ग नांदगाव, चाळीसगाव भागात बंद करण्यात आला असून, नंदूरबारमधून येणारा रस्ता सटाण्यातील ताराहाबाद सीमेवर अडवण्यात आला आहेे. त्र्यंबकेश्वरला लागून असलेल्या पालघर जिल्ह्याची सीमा आंबोली घाटात बंद करण्यात आली आहे तर इगतपुरीला लागून असलेल्या घाटनदेवी भागात नाकाबंदी करून मुंबई, कल्याण व ठाणे जिल्ह्यातून येणारी वाहने अडवली जात आहेत. या सातही जिल्ह्यांतून नाशिकमध्ये येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात असून, अत्यावश्यक कारणांची पडताळणी करूनच वाहनांना जिल्हा प्रवेशाची परवानगी दिली जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

इन्फो-

गुजरातच्या सीमाही बंद

नाशिक जिल्ह्याला लागून गुजरात राज्याची सीमा आहे. या सीमेलगतच्या भागात ८ तपासणी नोक लावण्यात आले असून, आंतरजिल्हा मार्गांवर १८ तपासणी नाक्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या तपासणी नाक्यांवर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यात जवळपास दोन हजार ग्रामीण पोलिसांसह एक हजार होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या एक कंपनीचा समावेश आहे.

कोट-

शासनाने अत्यावश्यक व इतर महत्त्वाच्या कारणांसाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रं अपलोड करून ऑनलाईन परवानगी मि‌ळवून अत्यावश्यक कारणांसाठी नागरिक प्रवास करू शकतील. परंतु, अतिमहत्त्वाच्या आणि अत्यावश्यक कारणाशिवाय लोकांनी बाहेर पडू नये.

- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक