मनमाड : नांदगाव रोडवर पानेवाडी शिवारात पिकअप वाहनाने (क्र. एमएच १५ बीएफ ५९४०) समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच ४३ डब्लू ३१४१) जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार बाळू अहिरे व भाऊलाल गायकवाड या दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंकुश कातकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपनिरीक्षकाचे पिस्तूल लंपासमनमाड परिसरात धावत्या रेल्वेगाडीत चोरीच्या घटना ही नित्याचीच बाब झाली असली तरी, चक्क एका रेल्वेसुरक्षा दलाच्या उपनिरीक्षकाची पिस्तूल ठेवलेली बॅगच चोरीला गेल्याने खळबळ उडली आहे. पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याप्रकरणी मलकापूर येथील रेल्वे सुरक्षा बल सहायक निरीक्षक सुमित किशनचंद यांनी फिर्याद दिली आहे. ते हावडा एक्स्प्रेसने मलकापूर ते मनमाडदरम्यान आपल्या सहकाऱ्यांसमवेत धावत्या गाडीत गस्त घालत होते. परतीच्या वेळी त्यांनी आपली पिस्तूल ठेवलेली बॅग सहकाऱ्यांजवळ देऊन लघुशंकेसाठी गेले. दरम्यान, सहकारी फलाटावर उतरले असता अज्ञात चोरट्यांनी बॅग लंपास केली. चोरट्यांनी बॅगेतील पिस्तूल व गोळ्या काढून घेऊन रिकामी बॅग मनमाड येथील बोहरी कंपाउंड येथे फेकून दिल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे रेल्वे पोलीसही चक्रावले आहेत. मनमाड स्थानकातील सुरक्षा यंत्रणा चोरीस गेलेले पिस्तूल व गोळ्या यांचा शोध घेत आहे. याप्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक के.एस. जांभळे करीत आहेत. (वार्ताहर)
दोघे जागीच ठार
By admin | Updated: February 13, 2016 22:43 IST