शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

नंदुरबारहून निघालेला बिºहाड मोर्चा पोहोचला ठेंगोड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 15:08 IST

सटाणा : गेल्या पंधरा वर्षांपासून आदिवासी विकास विभागाचा शासकीय आश्रम शाळांमध्ये अनेक पदावर रोजंदारीवर कर्मचारी भरती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन सरकारने दिले मात्र त्यांना अजून ही सेवेत समाविष्ट केलेले नाही. या कर्मचाºयांना मागील आठ महिन्याचे मानधन दिले गेले नसल्याने आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी या कर्मचाºयांनी नंदूरबार ते नाशिक बिºहाड मोर्चा काढण्यात येत आहे. सोमवारी या मोर्चाचे देवळा तालुक्यातील ठेंगोडा येथे आगमन झाले.

सटाणा : गेल्या पंधरा वर्षांपासून आदिवासी विकास विभागाचा शासकीय आश्रम शाळांमध्ये अनेक पदावर रोजंदारीवर कर्मचारी भरती करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन सरकारने दिले मात्र त्यांना अजून ही सेवेत समाविष्ट केलेले नाही. या कर्मचाºयांना मागील आठ महिन्याचे मानधन दिले गेले नसल्याने आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी या कर्मचाºयांनी नंदूरबार ते नाशिक बिºहाड मोर्चा काढण्यात येत आहे. सोमवारी या मोर्चाचे देवळा तालुक्यातील ठेंगोडा येथे आगमन झाले. हे दोन हजार कर्मचारी पायी आदिवासी विकास आयुक्तालय येथे सामूहिक आत्मदहन करण्यासाठी जात आहेत. या मोर्चात गर्भवती महिला, लहान बालकांचा देखील समावेश आहे. महिला कर्मचाºयांची संख्या देखील मोठी आहे.या मोर्चामुळे सटाणा शहरात वाहतूक कोलमडली असून आज दुपारपासून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. उन्हात प्रलंबित मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आरपारची लढाई करण्यासाठी शासकीय आश्रम शाळामधील गेल्या सहा दिवसांपासून रोजंदारी कर्मचाºयांचा बिºहाड मोर्चा निघाला आहे. नंदूरबार ते नाशिक पायी चालत जात ते सरकारला जाब विचारणार आहेत. सरकारने अनेक वेळा लेखी आश्वासन दिले. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यावरही आदिवासी विकास विभाग आपल्यावर अन्याय करीत असल्याचा भावना या आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत.दरम्यान सोमवारी सकाळी ताहाराबाद येथे आदिवासी विकासच्या प्रकल्प अधिकार्यांनी मोर्चेकर्यांची भेट घेऊन मोर्चा मागे घेण्याची विनंती केली मात्र त्यांनी ती धुडकावून लावली. आदिवासी विकास विभागातील या रोजंदारी कर्मचार्यांना गेल्या आठ महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. अनेक वेळा आंदोलन केले, आश्वासन मिळाले मात्र पदरी काही पडले नाही. यातील अनेक कर्मचार्यांची वयोमर्यादाही संपली आहे. त्यांना आता दुसरीकडे कुठे नोकरी ही करता येणार नाही. एका तपापेक्षा अधिक काळ हा संघर्ष सुरु आहे. सरकार मात्र दुर्लक्ष करीत आहे. आदिवासी लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नाहीत, अशी खंत कर्मचारी व्यक्त करत आहेत. ज्या वेळेस शासकीय आश्रमशाळामधील रिक्त पदाची समस्या भीषण होती तेव्हा सरकारने याच रोजदारी कर्मचार्याच्या मदतीने वेळ मारून नेली होती. मात्र या कर्मचार्यांना न्याय देण्यापेक्षा सरकार नवीन भरती करण्याचा प्रयत्न करीत आहे. या कर्मचार्याबाबत काम सरो आण िवैद्य मरो अशी भूमिका सरकारची दिसून येत आहे. आंदोलक महिलांच्या पायाला जखमा झाल्या आहेत. अनेक आंदोलकांची प्रकृती खराब झाल्याने रूग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक