शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

पणन मंडळाने सचिव सोडले वाऱ्यावर

By admin | Updated: June 21, 2014 01:18 IST

नाशिक : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आस्थापनेवर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून पॅनलनुसार ५१ सचिवांच्या नियुक्त्या केलेल्या असताना

  नाशिक : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आस्थापनेवर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून पॅनलनुसार ५१ सचिवांच्या नियुक्त्या केलेल्या असताना आणि यासंदर्भात दाखल याचिकेवरून उच्च न्यायालयाने या नियुक्त्यांना संरक्षण दिलेले असताना, राज्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी परस्पर सचिव बदलून न्यायालयाचा अवमान केल्याचे घोटी बाजार समितीचे माजी सचिव व याचिकाकर्ते जितेंद्र सांगळे यांचे म्हणणे आहे. कृषी पणन मंडळांकडून केलेल्या नेमणुकांबाबत २० आॅक्टोबर २०१३ च्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त सचिवांना संरक्षण दिलेले आहे. असे असताना राज्यातील बीड, सेलू, घोटी व राजुरा या चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी परस्पर सचिव बदलण्याची कार्यवाही केल्याचा आरोप सांगळे यांचा आहे. राजुरा बाजार समिती सचिवांनी नागपूर खंडपीठासमोर याचिका दाखल केली असता सचिवांना कार्यमुक्त करण्याच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. याबाबत पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ४ मार्च २०१४ रोजीच बाजार समित्यांना वस्तुस्थिती कळवून उचित कार्यवाही करावी, असे कळविले होते. मात्र, बाजार समिती आणि पणन मंडळ एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे काम करीत असून, या चारही कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे जितेंद्र सांगळे यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)