शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

गणेशगाव येथील  तरुणीचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 01:19 IST

तालुक्यातील गणेशगाव (वा) येथील २१ वर्षीय तरुणी घरात एकटी पाहून नांगराच्या जोखडाच्या दांड्याने तिच्या डोक्यावर व तोंडावर प्रहार करून अज्ञातांनी तिचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील गणेशगाव (वा) येथील २१ वर्षीय तरुणी घरात एकटी पाहून नांगराच्या जोखडाच्या दांड्याने तिच्या डोक्यावर व तोंडावर प्रहार करून अज्ञातांनी तिचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजना चंदर महाले असे मृत तरुणीचे नाव असून, ती आई सोबत गावापासून अडीच किलोमीटर अंतरावरील विनायकनगर शिवारात शेतात राहात होती. मयत रंजनाच्या विवाहासंदर्भात शनिवारी पाहुण्यांच्या घरी जायच असल्यामुळे तिची आई शुक्रवारी सायंकाळच्या वेळी गावातील भाऊबंदांना निमंत्रण देण्यासाठी गेली होती, तर मोठी बहीण मजुरीला गेली होती. रात्री ७.३० वाजेदरम्यान रंजना घरात एकटीच होती. ती स्वयंपाकाची तयारी करत होती याच संधीचा फायदा घेत अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला. तिच्याशी झटापट झाली असल्याच्या खुणा दिसत होत्या. प्रतिकार वाढत असल्याने गुन्हेगाराने रंजनाला घराबाहेर ओढत नेले. रंजना मदतीसाठी आवाज देत असताना गुन्हेगाराने नांगरासाठी वापरल्या जाणाऱ्या जोखडाच्या दांड्याने तिच्या डोक्यात व तोंडावर जोरदार प्रहार केला. त्यातच तिचा जीव गेल्याची माहिती शवविच्छेदन अहवालानंतर समोर आली आहे. घटनेनंतर अज्ञात मारेकºयाने घटनास्थळापासून पोबारा केला. घरी आल्यानंतर तिच्या आईने तिला हाक मारली; मात्र घरातून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून आईने बॅटरी घेऊन घराच्या आसपास शोध घेतला त्यांना घराच्या समोरच खळ्यावर रंजनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. आईने मोठ्याने हंबरडा फोडल्याने परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली. तत्काळ त्र्यंबकेश्वर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी रात्री १ वाजता अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रविकांत सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे आदी करत आहेत.मोलमजुरी करून निर्वाहरंजनाच्या पश्चात आई व तीन बहिणी असा परिवार आहे. वडिलांचे छत्र नसल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी आई ताईबाई चंदर महाले यांच्यावर येऊन पडली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी मोठ्या मुलीने व रंजनाने आपल्या खांद्यावर घेऊन दोघी बहिणी मोलमजुरी करण्यासाठी विनायकनगरहून गिरणारे येथे जात असत.

टॅग्स :PoliceपोलिसMurderखून