शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

गणेशगाव येथील  तरुणीचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 01:19 IST

तालुक्यातील गणेशगाव (वा) येथील २१ वर्षीय तरुणी घरात एकटी पाहून नांगराच्या जोखडाच्या दांड्याने तिच्या डोक्यावर व तोंडावर प्रहार करून अज्ञातांनी तिचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील गणेशगाव (वा) येथील २१ वर्षीय तरुणी घरात एकटी पाहून नांगराच्या जोखडाच्या दांड्याने तिच्या डोक्यावर व तोंडावर प्रहार करून अज्ञातांनी तिचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजना चंदर महाले असे मृत तरुणीचे नाव असून, ती आई सोबत गावापासून अडीच किलोमीटर अंतरावरील विनायकनगर शिवारात शेतात राहात होती. मयत रंजनाच्या विवाहासंदर्भात शनिवारी पाहुण्यांच्या घरी जायच असल्यामुळे तिची आई शुक्रवारी सायंकाळच्या वेळी गावातील भाऊबंदांना निमंत्रण देण्यासाठी गेली होती, तर मोठी बहीण मजुरीला गेली होती. रात्री ७.३० वाजेदरम्यान रंजना घरात एकटीच होती. ती स्वयंपाकाची तयारी करत होती याच संधीचा फायदा घेत अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला. तिच्याशी झटापट झाली असल्याच्या खुणा दिसत होत्या. प्रतिकार वाढत असल्याने गुन्हेगाराने रंजनाला घराबाहेर ओढत नेले. रंजना मदतीसाठी आवाज देत असताना गुन्हेगाराने नांगरासाठी वापरल्या जाणाऱ्या जोखडाच्या दांड्याने तिच्या डोक्यात व तोंडावर जोरदार प्रहार केला. त्यातच तिचा जीव गेल्याची माहिती शवविच्छेदन अहवालानंतर समोर आली आहे. घटनेनंतर अज्ञात मारेकºयाने घटनास्थळापासून पोबारा केला. घरी आल्यानंतर तिच्या आईने तिला हाक मारली; मात्र घरातून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून आईने बॅटरी घेऊन घराच्या आसपास शोध घेतला त्यांना घराच्या समोरच खळ्यावर रंजनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला. आईने मोठ्याने हंबरडा फोडल्याने परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली. तत्काळ त्र्यंबकेश्वर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी रात्री १ वाजता अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रविकांत सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे आदी करत आहेत.मोलमजुरी करून निर्वाहरंजनाच्या पश्चात आई व तीन बहिणी असा परिवार आहे. वडिलांचे छत्र नसल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी आई ताईबाई चंदर महाले यांच्यावर येऊन पडली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी मोठ्या मुलीने व रंजनाने आपल्या खांद्यावर घेऊन दोघी बहिणी मोलमजुरी करण्यासाठी विनायकनगरहून गिरणारे येथे जात असत.

टॅग्स :PoliceपोलिसMurderखून