शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जिल्हाधिकाऱ्यांच्या रक्तदानाने झाला रक्तदान अभियानाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST

नाशिक : कोणत्याही कार्यातील उणिवा, त्रुटी दाखवण्याचे काम माध्यमे करीतच असतात. मात्र, कोरोनानंतरच्या काळात ब्लड बँकांकडे पुरेसा रक्तसाठा शिल्लक ...

नाशिक : कोणत्याही कार्यातील उणिवा, त्रुटी दाखवण्याचे काम माध्यमे करीतच असतात. मात्र, कोरोनानंतरच्या काळात ब्लड बँकांकडे पुरेसा रक्तसाठा शिल्लक नाही, ही उणीव केवळ दाखवून तेवढ्यावरच न थांबता लोकमतने ‘रक्ताचं नातं’ हा उपक्रम हाती घेऊन आपल्यापरीने रक्त साठ्यात भर घालण्यासाठी दिलेले योगदान निश्चितच प्रशंसनीय असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. कोरोनाचे संकट कमी होत असताना रक्त साठ्याच्या तुटवड्याची समस्या राज्यात जाणवू लागल्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभिनव उपक्रमाचा प्रारंभ स्वत:च्या रक्तदानाने केल्यानंतर ते बोलत होते.

राज्यात कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून ‘लोकमत’च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून राज्यभरातील रक्त साठ्यात भर घालण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या रक्तदान महायज्ञांतर्गत शुक्रवारी (दि.२) नाशिक शहरात कालिका मंदिरासमोरील कालिका कॉम्प्लेक्स येथे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी, तर नाशिकरोडला दुर्गा गार्डनजवळील स्टारप्लस मॉल कमर्शिअल कॉम्प्लेक्स येथे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. कालिका कॉम्प्लेक्स येथे स्वत: रक्तदान केल्यानंतर बोलताना मांढरे यांनी आपण रक्तदान करून दुसऱ्या कुणा व्यक्तीला जीवनदान देऊ शकतोय, ही भावनाच खूप समाधान देणारी असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्येक तंदुरुस्त नागरिकाने या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहनदेखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी उपक्रमाची संकल्पना विशद करून राज्यभरात १०० ठिकाणी या अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. यावेळी लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी, उपक्रमाचे प्रायोजक दीपक चंदे, शुभ चंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्याशिवाय अन्य तीन स्थानांवर शुक्रवारी रक्तदान शिबिरांचा प्रारंभ करण्यात आला. त्यातून एकूण १६८ पिशव्या रक्तसंकलन झाले.

इन्फो

रक्त रिचार्ज करतोय, असे समजावे

रक्तदान केल्याने अवघ्या काही दिवसांत तेवढे ताजे रक्त भरून निघत असते. त्यामुळे जसे आपण विशिष्ट काळानंतर मोबाइल रिचार्ज करतो, तसेच काही महिन्यांच्या कालावधीने आपण रक्त रिचार्ज करतोय असे समजून रक्तदान करायला हवे. त्यातून आपला सर्वांत मोठा फायदा म्हणजे रक्तदात्याच्या रक्ताचेही शुद्धीकरण होत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने हा फायदा लक्षात घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले. मी स्वत: आता पंधराव्या वेळेस रक्तदान करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

इन्फो

शनिवारी दोन केंद्रांवर रक्तदान

शनिवारी (दि.३) सह्याद्री हॉस्पिटल आणि एकलहरेनजीक चांदगिरी ग्रामपंचायत या दोन ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरास शहरासह ग्रामीण भागातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने महानगराच्या परिघातील गावांचाही या रक्तदान मोहिमेत सहभाग घेण्यात आला आहे.

इन्फो

अन्य तीन केंद्रांवरही रक्तदान

जिल्ह्यात गंगापूररोड परिसरातील निर्मला कॉन्व्हेंटजवळील अरिहंत नर्सिंग होम येथे डॉ. किरण जैन यांच्या उपस्थितीत रक्तदानाला प्रारंभ झाला. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सतर्फे गंगापूर रोडवरील जनकल्याण ब्लड बँकेत रक्तदान करण्यात आले. तसेच गंगापूर गावातील क्रांती चौकातील भाजी मार्केटमध्ये शिवसेना गटनेता विलास शिंदे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचा प्रारंभ झाला. नाशिकला कालिका कॉम्प्लेक्स आणि नाशिकरोडला स्टारप्लस कमर्शिअल मॉल येथे १० जुलैपर्यंत दररोज सकाळी १० ते २ या वेळेत रक्तदान करता येणार आहे. सर्व रक्तदान शिबिरांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.