शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

सरकारच्या निषेधार्थ भुजबळ समर्थकांचा ‘काळा दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 15:25 IST

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार छगन भुजबळ व पुतणे समीर भुजबळ हे गेल्या २२ महिन्यांपासून तुरुंगात अटकेत असून, त्यांच्याविरुद्ध सरकार सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप करून राज्यभरातील छगन भुजबळ समर्थकांकडून ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करण्याचे ठरविण्यात आले,

ठळक मुद्देसुडबुद्धीने कारवाई : राजकीय कारकिर्द संपविण्याचे षडयंत्र

नाशिक : डोक्यावर ‘मी भुजबळ’अशी घातलेली टोपी, हातात भुजबळ समर्थकाचा पिवळा झेंडा व राज्य सरकार मुर्दाबादच्या काळ्या कपड्यानिशी दिल्या जाणा-या घोषणांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार दणाणून गेले. निमित्त होते, राज्याचे नेते व सध्या तुरुंगात असलेले छगन भुजबळ यांना जाणून बुजून जामीन नाकारून तुरुंगात अडकवून ठेवल्याच्या निषेधार्थ भुजबळ समर्थक समन्वय समितीने पुकारलेल्या सत्याग्रह आंदोलनाचे.जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार छगन भुजबळ व पुतणे समीर भुजबळ हे गेल्या २२ महिन्यांपासून तुरुंगात अटकेत असून, त्यांच्याविरुद्ध सरकार सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप करून राज्यभरातील छगन भुजबळ समर्थकांकडून ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करण्याचे ठरविण्यात आले, त्याचाच भाग म्हणून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर भुजबळ समर्थकांनी दिवसभर सत्याग्रह केला. सकाळी दहा वाजता मोठ्या संख्येने भुजबळ समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडक देत, केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ घोेषणा बाजी केली. ‘ वी वॉन्ट जस्टीस’, ‘भुजबळ मांगे जस्टीस’, ‘भुजबळ साहेब झिंदाबाद’, ‘राज्य सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणा देत समर्थकांनी रस्त्यावर धाव घेतली. त्यामुळे काहीकाळ जुना आग्रारोडवरील वाहतूक खंडित झाली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.यावेळी शिष्टमंडळाने समन्वय समितीच्या वतीने तयार करण्यात आलेले मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांना सादर केले. त्यात म्हटले आहे की, महाराष्टÑाच्या राजकारणात पन्नास वर्षे वाटचाल करणारे व दलित, ओबीसी, अल्पसंख्याकांचे नेतृत्व करणारे छगन भुजबळ यांना राजकीय हेतूने प्रेरित होऊन विद्यमान सरकारकडून खोटे नाटे आरोपांवर तुरुंगात डांबण्यात आले आहे. यात कायद्याचे उल्लंघन करण्यात आले असून, भुजबळ यांनी तपास यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करूनही निव्वळ तांत्रिक कारणे पुढे करून त्यांच्या सुटकेत अडथळे निर्माण केले जात आहेत, शिवाय काही तथाकथित लोकांना हाताशी धरून न्यायालयाची दिशाभूल करण्याचे काम पद्धतशीरपणे केले जात असून, हा सारा प्रकार म्हणजे भुजबळ यांची राजकीय कारकिर्द संपविण्याचेच षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जनभावनेचा विचार करून छगन भुजबळ, समीर भुजबळ यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक