शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

काळा दिवस : दुर्घटनेला आज बारा वर्षे पूर्ण

By admin | Updated: August 27, 2015 00:16 IST

चेंगराचेंगरीची कारणमीमांसा एक तपानंतरही गुलदस्त्यात

नाशिक : बरोबर १२ वर्षांपूर्वी दि. २७ आॅगस्ट २००३ रोजी नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महापर्वणीला सरदार चौकात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडून ३३ भाविकांचा बळी गेला होता. आज एक तपानंतरही या दुर्घटनेची कारणमीमांसा गुलदस्त्यातच आहे. बारा वर्षांपूर्वी नाशिक व त्र्यंबकेश्वर याठिकाणी दि. १२ आणि १७ आॅगस्ट रोजी पहिली पर्वणी पार पडल्यानंतर दि. २७ आॅगस्ट २००३ रोजी द्वितीय महापर्वणी नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी होती. पहिल्या पर्वणीचा अनुभव लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने द्वितीय महापर्वणीला गर्दीच्या दृष्टीने नियोजन केले. परंतु नाशिक येथे महापर्वणीला साधू-महंतांच्या शाही मिरवणुकीला गालबोट लागले आणि सरदार चौकात चेंगराचेंगरीची दुर्घटना होऊन ३३ भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेला गुरुवार, दि. २७ आॅगस्ट २०१५ रोजी बरोबर बारा वर्षे पूर्ण होत आहेत. तमाम नाशिककर ही दु:खद आणि अंगावर शहारे आणणारी घटना आजही विसरू शकलेले नाहीत. या दुर्घटनेची शासनाने रमणी आयोगामार्फत चौकशी केली. रमणी आयोगाने चौकशी अहवालात काही शिफारशी केल्या होत्या. त्यापैकी एक सरदार चौकाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाने रुंदीकरणाचा प्रस्ताव महासभा आणि स्थायी समितीसमोर ठेवलाही होता; परंतु दोहोंनीही सदरचा प्रस्ताव फेटाळून लावला. शाही मिरवणुकीत एका महंताने चांदीची नाणी उधळल्याने ती वेचण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आणि चेंगराचेंगरी झाल्याचे सांगितले जाते. परंतु सत्य परिस्थितीचा आजही छडा लागू शकलेला नाही आणि रमणी आयोगाने सुचविलेल्या शिफारशीही महापालिकेसह पोलीस प्रशासनाने बासनात गुंडाळून ठेवल्या. गेल्या बारा वर्षांत या दुर्घटनेची कारणमीमांसाही कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे कारणमीमांसा एक तपानंतरही गुलदस्त्यातच आहे. (प्रतिनिधी)