शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

काळा दिवस : दुर्घटनेला आज बारा वर्षे पूर्ण

By admin | Updated: August 27, 2015 00:16 IST

चेंगराचेंगरीची कारणमीमांसा एक तपानंतरही गुलदस्त्यात

नाशिक : बरोबर १२ वर्षांपूर्वी दि. २७ आॅगस्ट २००३ रोजी नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महापर्वणीला सरदार चौकात चेंगराचेंगरीची दुर्घटना घडून ३३ भाविकांचा बळी गेला होता. आज एक तपानंतरही या दुर्घटनेची कारणमीमांसा गुलदस्त्यातच आहे. बारा वर्षांपूर्वी नाशिक व त्र्यंबकेश्वर याठिकाणी दि. १२ आणि १७ आॅगस्ट रोजी पहिली पर्वणी पार पडल्यानंतर दि. २७ आॅगस्ट २००३ रोजी द्वितीय महापर्वणी नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी होती. पहिल्या पर्वणीचा अनुभव लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने द्वितीय महापर्वणीला गर्दीच्या दृष्टीने नियोजन केले. परंतु नाशिक येथे महापर्वणीला साधू-महंतांच्या शाही मिरवणुकीला गालबोट लागले आणि सरदार चौकात चेंगराचेंगरीची दुर्घटना होऊन ३३ भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेला गुरुवार, दि. २७ आॅगस्ट २०१५ रोजी बरोबर बारा वर्षे पूर्ण होत आहेत. तमाम नाशिककर ही दु:खद आणि अंगावर शहारे आणणारी घटना आजही विसरू शकलेले नाहीत. या दुर्घटनेची शासनाने रमणी आयोगामार्फत चौकशी केली. रमणी आयोगाने चौकशी अहवालात काही शिफारशी केल्या होत्या. त्यापैकी एक सरदार चौकाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाने रुंदीकरणाचा प्रस्ताव महासभा आणि स्थायी समितीसमोर ठेवलाही होता; परंतु दोहोंनीही सदरचा प्रस्ताव फेटाळून लावला. शाही मिरवणुकीत एका महंताने चांदीची नाणी उधळल्याने ती वेचण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आणि चेंगराचेंगरी झाल्याचे सांगितले जाते. परंतु सत्य परिस्थितीचा आजही छडा लागू शकलेला नाही आणि रमणी आयोगाने सुचविलेल्या शिफारशीही महापालिकेसह पोलीस प्रशासनाने बासनात गुंडाळून ठेवल्या. गेल्या बारा वर्षांत या दुर्घटनेची कारणमीमांसाही कुणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे कारणमीमांसा एक तपानंतरही गुलदस्त्यातच आहे. (प्रतिनिधी)