शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या विजयी वारुला मालेगावात लगाम

By admin | Updated: May 26, 2017 19:08 IST

मालेगाव : देशभरातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयी पताका फडकविणाऱ्या भाजपाच्या वारुला मालेगावकरांनी महापालिकेत लगाम लावला आहे.

मालेगाव/संजय दुनबळेमालेगाव : देशभरातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयी पताका फडकविणाऱ्या भाजपाच्या वारुला मालेगावकरांनी महापालिकेत लगाम लावला आहे. पक्षाची मुस्लीम कार्डची खेळी फसली असली तरी ९ जागा मिळवुन मालेगावात खाते उघडल्याचे समाधान मात्र पक्षधुरीनांना मिळाले आहे. शहराच्या पूर्व भागातुन भाजपाचा एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नसला तरी आपण मुस्लिमांनाही संधी दिल्याचे सांगण्यास पक्षनेते विसरले नाहीत. त्रिशंकु स्थितीत सर्वाधिक २८ जागा मिळवुन कॉँग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले असले तरी सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या मॅजीक आकड्यासाठी मोठा सत्ता संघर्ष व तडजोडीचे राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील पंचवार्षीकमध्ये तीसरा महाज व कॉँग्रेसने आघाडी करुन अडीचवर्ष महापौरपदी कॉँग्रेसच्या ताहेरा शेख यांची वर्णी लावली होती. मात्र राजकीय घडामोडी घडल्यानंतर तिसरा महाज, सेना, शहर विकास आघाडीला हाताशी धरुन माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांचे खंदे समर्थक हाजी मो. इब्राहीम यांना महापौरपदाची संधी देण्यात आली होती. या काळात विविध आरोप प्रत्यारोपामुळे महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे निघाले असल्यामुळे यावेळच्या निवडणुकीकडे जाणकारांचे लक्ष लागले होते. गतवेळच्या तिसरा महाजचे यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यात आले. राष्ट्रवादी कॉँग्रेसने जनता दलाशी युती केली तर राष्ट्रीय कॉँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुक रिंगणात उडी घेतली. केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा आणि शिवसेना यांनी परस्परांविरुध्द दंड थोपटले तर एमआयएमने प्रथमच आपले भवितव्य आजमाविले. निवडणुकीत सुरुवातीपासूनच चुरस निर्माण झाली प्रचारादरम्यान परस्परांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. प्रत्येक पक्षाने विजयाचा दावा केला असला तरी मतदानाची कमी टक्केवारी सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकविणारी ठरली. रखरखीत उन्हामुळे मतदानाची टक्केवारी घसरली. त्यामुळे बहुमताच्या ४३ या जादुई संख्येपर्यत एकाही पक्षाला पोहोचता आले नसले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने मालेगावात भारतीय जनता पक्षाने आणि एमआयएमने प्रत्येकी ९ आणि ७ जागा मिळवुन आपले खाते उघडले आहे.गतवेळी दोन नगरसेवक असलेल्या मनसेचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला असून जनता दलाला ६ जागांच्या रुपाने काहीसा दिलासा मिळाला आहे. महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण पुरुषासाठी राखीव असल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच होणार असली तरी कॉँग्रेसचे माजी आमदार शेख रशीद यांनी महापौर पदाचे उमेदवार म्हणूनच महापालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. आपली महापौरपदाची इच्छा पुर्ण करण्यासाठी आता ते कोणती खेळी खेळतात यावरच पुढील गणिते अवलंबुन आहेत.दादा भुसे यांच्या रुपाने शिवसेनेने मालेगावला मंत्रीमंडळात स्थान दिले असले तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झालेला पराभव दादा भुसे यांच्या जिव्हारी लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांनी महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मागील पंचवार्षीक मध्ये ११ जागांवर असलेली शिवसेना यावेळी १३ जागांवर पोहोचल्याने भुसे यांनी पराभवाचा वचपा काढला असे म्हणायला हरकत नाही.