शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भाजपाची मदार आता शक्ती केंद्र प्रमुखांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 01:56 IST

कोणत्याही स्थितीत महापालिकेवर सत्ता पुन्हा मिळवायची असून त्यासाठी संघटना मजबूत करणे आणि प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रत्येक बुथवर ३० जणांची जबाबदारी निश्चित करायची आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रनिहाय ५ बुथमागे एका शक्ती केंद्र प्रमुखाची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुख हा मंडल अध्यक्षांइतकाच महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी केले.

नाशिक : कोणत्याही स्थितीत महापालिकेवर सत्ता पुन्हा मिळवायची असून त्यासाठी संघटना मजबूत करणे आणि प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रत्येक बुथवर ३० जणांची जबाबदारी निश्चित करायची आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रनिहाय ५ बुथमागे एका शक्ती केंद्र प्रमुखाची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुख हा मंडल अध्यक्षांइतकाच महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी केले.

 

भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील हॉटेल राॅयल पॅलेसच्या सभागृहात ‘समर्थ बूथ अभियान’ उपक्रमांतर्गत उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भारतीय यांनी संघटनेचा पाया अधिकाधिक विस्तारण्यावर प्रत्येकाने भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यापुढील प्रत्येक निवडणूक ही आपल्याला स्वबळावर लढवायची असल्याने प्रत्येक जागेसाठी आणि प्रत्येक बुथसाठी आपले कार्यकर्ते सज्ज असणे आवश्यक आहे. पक्ष आहे, संघटन आहे म्हणून आपल्याला महत्त्व आहे. आपल्यामागे संघटना नसेल तर आपल्याला काहीच किंमत उरत नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक असल्याचेही भारतीय यांनी नमूद केले. यावेळी प्रदेश समर्थ बुथ संयोजक रामदास आंबटकर, यावेळी उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, सुमंत घैसास, अरविंद पाटील, सतीश निकम, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी, आमदार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीश पालवे, विजय साने आदींसह प्रदेश संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो

आता संघटन कार्य जोमाने करा

कोरोनाच्या प्रभाव काळात पक्षसंघटनेने जनतेच्या मदतकार्याला प्राधान्य दिले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला असून प्रत्येक कार्यकर्त्याने संघटन कार्याला प्राधान्य देण्याचे आवाहन समर्थ बुथ संयोजक रामदास आंबटकर यांनी केले. प्रत्येक बुथमधील ३० जणांच्या समितीत युवा, महिला तसेच समाजातील सर्व जाती, धर्मांमधील घटकांचा त्यात समावेश करून सर्व बुथ समित्या अत्यंत सक्षम करण्याचे आवाहनदेखील आंबटकर यांनी केले.

 

 

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपा