शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

भाजपाची मदार आता शक्ती केंद्र प्रमुखांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 01:56 IST

कोणत्याही स्थितीत महापालिकेवर सत्ता पुन्हा मिळवायची असून त्यासाठी संघटना मजबूत करणे आणि प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रत्येक बुथवर ३० जणांची जबाबदारी निश्चित करायची आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रनिहाय ५ बुथमागे एका शक्ती केंद्र प्रमुखाची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुख हा मंडल अध्यक्षांइतकाच महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी केले.

नाशिक : कोणत्याही स्थितीत महापालिकेवर सत्ता पुन्हा मिळवायची असून त्यासाठी संघटना मजबूत करणे आणि प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रत्येक बुथवर ३० जणांची जबाबदारी निश्चित करायची आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रनिहाय ५ बुथमागे एका शक्ती केंद्र प्रमुखाची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुख हा मंडल अध्यक्षांइतकाच महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी केले.

 

भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील हॉटेल राॅयल पॅलेसच्या सभागृहात ‘समर्थ बूथ अभियान’ उपक्रमांतर्गत उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भारतीय यांनी संघटनेचा पाया अधिकाधिक विस्तारण्यावर प्रत्येकाने भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यापुढील प्रत्येक निवडणूक ही आपल्याला स्वबळावर लढवायची असल्याने प्रत्येक जागेसाठी आणि प्रत्येक बुथसाठी आपले कार्यकर्ते सज्ज असणे आवश्यक आहे. पक्ष आहे, संघटन आहे म्हणून आपल्याला महत्त्व आहे. आपल्यामागे संघटना नसेल तर आपल्याला काहीच किंमत उरत नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक असल्याचेही भारतीय यांनी नमूद केले. यावेळी प्रदेश समर्थ बुथ संयोजक रामदास आंबटकर, यावेळी उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, सुमंत घैसास, अरविंद पाटील, सतीश निकम, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी, आमदार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीश पालवे, विजय साने आदींसह प्रदेश संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो

आता संघटन कार्य जोमाने करा

कोरोनाच्या प्रभाव काळात पक्षसंघटनेने जनतेच्या मदतकार्याला प्राधान्य दिले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला असून प्रत्येक कार्यकर्त्याने संघटन कार्याला प्राधान्य देण्याचे आवाहन समर्थ बुथ संयोजक रामदास आंबटकर यांनी केले. प्रत्येक बुथमधील ३० जणांच्या समितीत युवा, महिला तसेच समाजातील सर्व जाती, धर्मांमधील घटकांचा त्यात समावेश करून सर्व बुथ समित्या अत्यंत सक्षम करण्याचे आवाहनदेखील आंबटकर यांनी केले.

 

 

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपा