शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी भाजपचे चक्का जाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 15:20 IST

मालेगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याच्या निषेधार्थ शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाटा येथे चक्का जाम आंदोलन केले.

मालेगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याच्या निषेधार्थ शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाटा येथे चक्का जाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल अर्धातास खोळंबली होती. तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना आंदोलनकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले, तर ग्रामीण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सटाणा-मालेगाव रस्त्यावरील आघार बुद्रुक येथे चक्का जाम आंदोलन केले होते.जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महापालिकासारख्या संख्यांमधील ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती; मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली नसल्यामुळे आरक्षण संपुष्टात आले आहे. राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर ही वेळ आल्याच्या निषेधार्थ भाजप ओबीसी मार्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक पवार, भाजपाचे गटनेते सुनील गायकवाड, महानगर प्रमुख मदन गायकवाड, नितीन पोफळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी चाळीसगाव फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुनील गायकवाड, भाजपाचे प्रभारी शशिकांत वाणी, दिपक पवार यांनी शासनाच्या धोरणावर कडाडून टिका केली. या आंदोलनात नितीन पोफळे, दिपक देसले, राजेंद्र शेलार, दिपक गायकवाड, श्रीकांत शेवाळे, मुन्ना अहिरे, राकेश गायकवाड, युवा गिते, विवेक वारूळे, प्रशांत पवार, जयप्रकाश पठाडे आदिंसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.-------------------------जयकुमार रावल यांची शासनावर टिकाया आंदोलना दरम्यान राज्याचे माजी पर्यटनमंत्री, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार जयकुमार रावल आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्य शासनावर टिका केली. २०१९ च्या निवडणुकीत गद्दारी करुन महावसुली सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर समाजातील शेतकरी, मराठा, दलित, आदिवासी व इतर कुठल्याही समाजाला न्याय दिला नाही. राजकीय आरक्षण टिकू शकले नाही. सध्याचे शासनातील विभाग राजे बनले असून त्यांच्याकडे वसुलीसाठी वाजे आहेत. ओबीसी आरक्षण रद्द करून निवडणूका घेण्याचा डाव रचला जात आहे. या विरोधात यापुढे तीव्र लढा उभारला जाईल, असे रावल यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक