शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मालेगावी भाजपचे चक्का जाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 15:20 IST

मालेगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याच्या निषेधार्थ शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाटा येथे चक्का जाम आंदोलन केले.

मालेगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याच्या निषेधार्थ शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाटा येथे चक्का जाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल अर्धातास खोळंबली होती. तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना आंदोलनकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले, तर ग्रामीण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सटाणा-मालेगाव रस्त्यावरील आघार बुद्रुक येथे चक्का जाम आंदोलन केले होते.जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महापालिकासारख्या संख्यांमधील ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती; मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली नसल्यामुळे आरक्षण संपुष्टात आले आहे. राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर ही वेळ आल्याच्या निषेधार्थ भाजप ओबीसी मार्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक पवार, भाजपाचे गटनेते सुनील गायकवाड, महानगर प्रमुख मदन गायकवाड, नितीन पोफळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी चाळीसगाव फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुनील गायकवाड, भाजपाचे प्रभारी शशिकांत वाणी, दिपक पवार यांनी शासनाच्या धोरणावर कडाडून टिका केली. या आंदोलनात नितीन पोफळे, दिपक देसले, राजेंद्र शेलार, दिपक गायकवाड, श्रीकांत शेवाळे, मुन्ना अहिरे, राकेश गायकवाड, युवा गिते, विवेक वारूळे, प्रशांत पवार, जयप्रकाश पठाडे आदिंसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.-------------------------जयकुमार रावल यांची शासनावर टिकाया आंदोलना दरम्यान राज्याचे माजी पर्यटनमंत्री, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार जयकुमार रावल आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्य शासनावर टिका केली. २०१९ च्या निवडणुकीत गद्दारी करुन महावसुली सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर समाजातील शेतकरी, मराठा, दलित, आदिवासी व इतर कुठल्याही समाजाला न्याय दिला नाही. राजकीय आरक्षण टिकू शकले नाही. सध्याचे शासनातील विभाग राजे बनले असून त्यांच्याकडे वसुलीसाठी वाजे आहेत. ओबीसी आरक्षण रद्द करून निवडणूका घेण्याचा डाव रचला जात आहे. या विरोधात यापुढे तीव्र लढा उभारला जाईल, असे रावल यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक