शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

तुकाराम मुंडे यांची बदली करूनही भाजपा चिंतित

By श्याम बागुल | Updated: November 23, 2018 16:49 IST

गेल्या सहा महिन्यांपासून भाजपाचे लोकप्रतिनिधी व नगरसेवक आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या महापालिकेच्या कामकाजात अडथळे निर्माण करून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्नशील होते. परंतु मुंडे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय असल्यामुळे शक्य होत नव्हते. मुंडे यांनी आपल्या पद्धतीनेच महापालिकेचा कारभार हाकण्याबरोबरच, सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या रस्ते, पाणी,

ठळक मुद्देप्रतिमेचा प्रश्न : श्रेय घेणे अंगलट येण्याची शक्यता

नाशिक : भ्रष्टाचार विरोधी व कायद्याच्या कसोटीवरच काम करणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली करून भाजपाचे मुखंड उत्साह व जल्लोष साजरा करीत असले तरी, मुंडे यांची जनमानसातील प्रतिमा पाहता, त्यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करून भाजपाने आपला खरा चेहरा समोर उघड केल्याची भावना जनमानसात व्यक्त केली जात असल्याने भाजपाच्या एका गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खुल्यापणाने हा गट मुंडे यांच्या बदलीच्या प्रकरणात जाहीरपणे काही बोलत नसला तरी, आगामी निवडणुकीत जनतेकडून मुंडे यांच्या बदलीबाबत जाब विचारल्यास काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावू लागला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून भाजपाचे लोकप्रतिनिधी व नगरसेवक आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या महापालिकेच्या कामकाजात अडथळे निर्माण करून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्नशील होते. परंतु मुंडे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय असल्यामुळे शक्य होत नव्हते. मुंडे यांनी आपल्या पद्धतीनेच महापालिकेचा कारभार हाकण्याबरोबरच, सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या रस्ते, पाणी, गटार या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले. परिणामी मुंडे जनतेत लोकप्रिय तर झालेच, परंतु काम न करणा-या महापालिकेच्या अधिकाºयांना नकोसे तर नको त्या कामात ‘अर्थ’ शोधणाºया लोकप्रतिनिधींना अडचणीचे ठरले होते. लोकांना जे हवे ते देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंडे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबवून नागरिकांच्या महापालिकेच्या संबंधित तक्रारी अवघ्या चोवीस तासात सोडविण्यास सुरुवात केल्याने त्यांना जनमानसातून मिळत असलेला पाठिंबा सत्ताधारी भाजपाच्या जिव्हारी लागला होता. त्यातूनच मुंडे जर आणखी काहीकाळ नाशकात थांबले तर भाजपासाठी ते अडचणीचे ठरणार असल्यामुळेच त्यांच्या बदलीचा प्रश्न प्रतिष्ठेचा करण्यात आला. 

मुंडे यांची आता बदली झाली असली तरी, मुंडे यांच्या कामकाजावर समाधानी असलेल्या नाशिककरांच्या नाराजीचा सामना भाजपाला करावा लागणार आहे. मुंडे यांच्या कायदेशीर कामकाजामुळे मुठभरच लोकांना त्रास झाला व ज्यांना झाला त्यांचा जनमानसातील वावर अगदीच अल्प आहे. त्यांच्यापासून पक्षाला कितपत फायदा होईल, असा विचार आता भाजपातील मंडळी करू लागली असून, निव्वळ महापालिकेतून स्वहित साधण्यासाठीच मुंडे यांच्या बदलीला प्रतिष्ठेचा प्रश्न करणा-यांमुळे भाजपाला नुकसानच होण्याची भीती खासगीत व्यक्त होवू लागली आहे. अशातच काही लोकप्रतिनिधी जाहीरपणे मुंडे यांच्या बदलीचे समर्थन करीत असल्यामुळे तर भाजपा भ्रष्टाचाराला पाठिंबा देते, असा संदेश जनमानसात गेला आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाNashikनाशिक