शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंडे यांची बदली करूनही भाजपा चिंतित

By श्याम बागुल | Updated: November 23, 2018 16:49 IST

गेल्या सहा महिन्यांपासून भाजपाचे लोकप्रतिनिधी व नगरसेवक आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या महापालिकेच्या कामकाजात अडथळे निर्माण करून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्नशील होते. परंतु मुंडे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय असल्यामुळे शक्य होत नव्हते. मुंडे यांनी आपल्या पद्धतीनेच महापालिकेचा कारभार हाकण्याबरोबरच, सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या रस्ते, पाणी,

ठळक मुद्देप्रतिमेचा प्रश्न : श्रेय घेणे अंगलट येण्याची शक्यता

नाशिक : भ्रष्टाचार विरोधी व कायद्याच्या कसोटीवरच काम करणारे महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली करून भाजपाचे मुखंड उत्साह व जल्लोष साजरा करीत असले तरी, मुंडे यांची जनमानसातील प्रतिमा पाहता, त्यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करून भाजपाने आपला खरा चेहरा समोर उघड केल्याची भावना जनमानसात व्यक्त केली जात असल्याने भाजपाच्या एका गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खुल्यापणाने हा गट मुंडे यांच्या बदलीच्या प्रकरणात जाहीरपणे काही बोलत नसला तरी, आगामी निवडणुकीत जनतेकडून मुंडे यांच्या बदलीबाबत जाब विचारल्यास काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावू लागला आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून भाजपाचे लोकप्रतिनिधी व नगरसेवक आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या महापालिकेच्या कामकाजात अडथळे निर्माण करून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्नशील होते. परंतु मुंडे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय असल्यामुळे शक्य होत नव्हते. मुंडे यांनी आपल्या पद्धतीनेच महापालिकेचा कारभार हाकण्याबरोबरच, सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या रस्ते, पाणी, गटार या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले. परिणामी मुंडे जनतेत लोकप्रिय तर झालेच, परंतु काम न करणा-या महापालिकेच्या अधिकाºयांना नकोसे तर नको त्या कामात ‘अर्थ’ शोधणाºया लोकप्रतिनिधींना अडचणीचे ठरले होते. लोकांना जे हवे ते देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंडे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबवून नागरिकांच्या महापालिकेच्या संबंधित तक्रारी अवघ्या चोवीस तासात सोडविण्यास सुरुवात केल्याने त्यांना जनमानसातून मिळत असलेला पाठिंबा सत्ताधारी भाजपाच्या जिव्हारी लागला होता. त्यातूनच मुंडे जर आणखी काहीकाळ नाशकात थांबले तर भाजपासाठी ते अडचणीचे ठरणार असल्यामुळेच त्यांच्या बदलीचा प्रश्न प्रतिष्ठेचा करण्यात आला. 

मुंडे यांची आता बदली झाली असली तरी, मुंडे यांच्या कामकाजावर समाधानी असलेल्या नाशिककरांच्या नाराजीचा सामना भाजपाला करावा लागणार आहे. मुंडे यांच्या कायदेशीर कामकाजामुळे मुठभरच लोकांना त्रास झाला व ज्यांना झाला त्यांचा जनमानसातील वावर अगदीच अल्प आहे. त्यांच्यापासून पक्षाला कितपत फायदा होईल, असा विचार आता भाजपातील मंडळी करू लागली असून, निव्वळ महापालिकेतून स्वहित साधण्यासाठीच मुंडे यांच्या बदलीला प्रतिष्ठेचा प्रश्न करणा-यांमुळे भाजपाला नुकसानच होण्याची भीती खासगीत व्यक्त होवू लागली आहे. अशातच काही लोकप्रतिनिधी जाहीरपणे मुंडे यांच्या बदलीचे समर्थन करीत असल्यामुळे तर भाजपा भ्रष्टाचाराला पाठिंबा देते, असा संदेश जनमानसात गेला आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाNashikनाशिक