शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

मशीनमध्ये गडबड झाल्यास भाजपाचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:02 IST

गुजरातमधील निवडणूक ही तेथील जनता आणि मोदी यांच्यातच असून, यामध्ये तेथील जनतेचा विजय निश्चित आहे. मात्र वोटिंग मशीनमध्ये गडबड झाली तरच भाजपाला विजय मिळेल, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी के. मोहनप्रकाश यांनी केले.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनविकासाचा खरा चेहरा समोर आला आहेव्यापारीही मोदी धोरणाच्या विरोधात

नाशिक : गुजरातमधील निवडणूक ही तेथील जनता आणि मोदी यांच्यातच असून, यामध्ये तेथील जनतेचा विजय निश्चित आहे. मात्र वोटिंग मशीनमध्ये गडबड झाली तरच भाजपाला विजय मिळेल, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी के. मोहनप्रकाश यांनी केले.  नाशिक शहर कॉँग्रेस कमिटी येथे संविधान दिनानिमित्ताने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कॉँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी के. मोहनप्रकाश यांच्या हस्ते झाले यावेळी ते पत्रकार परिदेत बोलत होते. नरेंद्र मोंदी यांनी २०१४ची निवडणूक ही गुजरातमधील विकासाच्या मुद्द्यावर लढविली होती. आता तेथील विकासाचा खरा चेहरा समोर आला आहे. गुजरातमधील शेतकरी आत्महत्या करीत आहे, तरुण बेरोजगार झाले आहेत तर व्यापारीही मोदी धोरणाच्या विरोधात आहेत. येथील व्यापारी ‘एकही भूल कमल का फूल’ असे बिलांवर लिहित आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे येथील जनतेमध्ये मोदीच्या विरोधात असलेली भावना पाहता गुजरातच्या जनतेचाच विजय होईल, असे वाटते. भाजपा ज्या पद्धतीने निवडणुका जिंकत आहे त्याप्रमाणे जर वोटिंग मशीनमध्ये गडबड झाली तरच भाजपाला गुतरातमध्ये विजय मिळेल, असेही मोहनप्रकाश म्हणाले.  आजवर झालेल्या निवडणुकांनंतर अनेक पक्ष आणि व्यक्तींनी वोटिंग मशीनमधील गडबडीवर आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेशमधील राज्य निवडणूक आयोगाच्या महिला अधिकाºयानेच वोटिंग मशीनमधील गैरप्रकार उघड करून दाखविला आहे. वोटिंग मशीनमधील झोल हा तक्रारीनंतर लगेचच सिद्ध होईल, असेही नाही. त्यामुळे तत्काळ मशीनवर आक्षेप घेतला तरी त्याचा उपयोग होत नाही. परंतु जर या यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह असेल तर मग बॅलेटनुसार मतदानयंत्रणा राबविली पाहिजे, अशी मागणी अनेकदा अनेकांनी केल्याचे मोहनप्रकाश म्हणाले. लोकशाहीत जर अशाप्रकारचा आक्षेप वारंवार घेतला जात असेल तर केंद्राने पारदर्शकता आणली पाहिजे, असे ते म्हणाले.  दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पांढरी टोपी आणि खादी परिधान करणाºयांचा समावेश होता, तर काळी टोपी घालणारे आरएसएसवाले कधीही स्वातंत्र्याच्या बाजूने नव्हते, तर त्यांची इंग्रजांशी जवळीत होती, असा आरोपही मोहनप्रकाश यांनी केला. संपूर्ण देश भारत छोडोच्या आंदोलनात असताना आरएसएस मात्र इंग्रजांबरोबर होती, असेही ते म्हणाले.राम मंदिर निवडणुकीचाच मुद्दागुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएसने पुन्हा एकदा राम मंदिर निर्माण मुद्दा पुढे केला आहे. भाजपाचा मुद्दा देशासाठी काही नवीन नाही. कोणतीही निवडणूक आली की भाजपा-आरएसएस राम मंदिराचा मुद्दा पुढे करतात. गुजरात निवडणुकीतही भाजपाकडून विकासाचा नाही तर मंदिराचा मुद्दा पुढे केला जात आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेस