शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

मशीनमध्ये गडबड झाल्यास भाजपाचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:02 IST

गुजरातमधील निवडणूक ही तेथील जनता आणि मोदी यांच्यातच असून, यामध्ये तेथील जनतेचा विजय निश्चित आहे. मात्र वोटिंग मशीनमध्ये गडबड झाली तरच भाजपाला विजय मिळेल, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी के. मोहनप्रकाश यांनी केले.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनविकासाचा खरा चेहरा समोर आला आहेव्यापारीही मोदी धोरणाच्या विरोधात

नाशिक : गुजरातमधील निवडणूक ही तेथील जनता आणि मोदी यांच्यातच असून, यामध्ये तेथील जनतेचा विजय निश्चित आहे. मात्र वोटिंग मशीनमध्ये गडबड झाली तरच भाजपाला विजय मिळेल, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी के. मोहनप्रकाश यांनी केले.  नाशिक शहर कॉँग्रेस कमिटी येथे संविधान दिनानिमित्ताने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कॉँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी के. मोहनप्रकाश यांच्या हस्ते झाले यावेळी ते पत्रकार परिदेत बोलत होते. नरेंद्र मोंदी यांनी २०१४ची निवडणूक ही गुजरातमधील विकासाच्या मुद्द्यावर लढविली होती. आता तेथील विकासाचा खरा चेहरा समोर आला आहे. गुजरातमधील शेतकरी आत्महत्या करीत आहे, तरुण बेरोजगार झाले आहेत तर व्यापारीही मोदी धोरणाच्या विरोधात आहेत. येथील व्यापारी ‘एकही भूल कमल का फूल’ असे बिलांवर लिहित आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे येथील जनतेमध्ये मोदीच्या विरोधात असलेली भावना पाहता गुजरातच्या जनतेचाच विजय होईल, असे वाटते. भाजपा ज्या पद्धतीने निवडणुका जिंकत आहे त्याप्रमाणे जर वोटिंग मशीनमध्ये गडबड झाली तरच भाजपाला गुतरातमध्ये विजय मिळेल, असेही मोहनप्रकाश म्हणाले.  आजवर झालेल्या निवडणुकांनंतर अनेक पक्ष आणि व्यक्तींनी वोटिंग मशीनमधील गडबडीवर आक्षेप घेतला आहे. मध्य प्रदेशमधील राज्य निवडणूक आयोगाच्या महिला अधिकाºयानेच वोटिंग मशीनमधील गैरप्रकार उघड करून दाखविला आहे. वोटिंग मशीनमधील झोल हा तक्रारीनंतर लगेचच सिद्ध होईल, असेही नाही. त्यामुळे तत्काळ मशीनवर आक्षेप घेतला तरी त्याचा उपयोग होत नाही. परंतु जर या यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह असेल तर मग बॅलेटनुसार मतदानयंत्रणा राबविली पाहिजे, अशी मागणी अनेकदा अनेकांनी केल्याचे मोहनप्रकाश म्हणाले. लोकशाहीत जर अशाप्रकारचा आक्षेप वारंवार घेतला जात असेल तर केंद्राने पारदर्शकता आणली पाहिजे, असे ते म्हणाले.  दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पांढरी टोपी आणि खादी परिधान करणाºयांचा समावेश होता, तर काळी टोपी घालणारे आरएसएसवाले कधीही स्वातंत्र्याच्या बाजूने नव्हते, तर त्यांची इंग्रजांशी जवळीत होती, असा आरोपही मोहनप्रकाश यांनी केला. संपूर्ण देश भारत छोडोच्या आंदोलनात असताना आरएसएस मात्र इंग्रजांबरोबर होती, असेही ते म्हणाले.राम मंदिर निवडणुकीचाच मुद्दागुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएसने पुन्हा एकदा राम मंदिर निर्माण मुद्दा पुढे केला आहे. भाजपाचा मुद्दा देशासाठी काही नवीन नाही. कोणतीही निवडणूक आली की भाजपा-आरएसएस राम मंदिराचा मुद्दा पुढे करतात. गुजरात निवडणुकीतही भाजपाकडून विकासाचा नाही तर मंदिराचा मुद्दा पुढे केला जात आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेस