नाशिक : भाजपा स्वबळावर नव्हे, तर महायुतीच्या माध्यमातून लढणार आहे. मात्र २८८ मतदारसंघांत भाजपाच्या संघटनात्मक बांधणीसाठी केंद्रातील तसेच छत्तीसगड, गुजरातसह अन्य राज्यांतील मंत्री मतदारसंघनिहाय जाऊन पक्षबांधणी व जनतेच्या समस्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.येथील उत्तर महाराष्ट्राच्या विभागीय बैठकीसाठी ते नाशकात आले असता पत्रकारांशी बोलत होते. भाजपाने विभागनिहाय बैठका घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात विभागनिहाय बैठकांचे आयोजन केले असून, नाशिकपासून या विभागनिहाय आढावा बैठकांना शुभारंभ झाला. त्यानंतर शनिवारी पश्चिम महाराष्ट्र, १४ तारखेला नागपूर, १६ तारखेला मुंबई/कोकण, १७ जुुलैला औरंगाबाद व १८ जुलैला अमरावती अशा विभागनिहाय बैठका घेण्यात येणार असून, त्यातून आगामी विधानसभा निवडणुकांबाबत मतदारसंघनिहाय इच्छुक व पक्ष संघटनांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची १५ जुलै रोजी महाराष्ट्रातील कोअर कमिटीचे सदस्य भेट घेऊन महाराष्ट्रातील विधानसभानिहाय आढावा देतील. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांचे फारसे ट्युनिंग जमत नसल्याबाबत त्यांनी इन्कार करीत, केवळ अमित शहाच नव्हे तर राजनाथ सिंह हेही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात येऊन लक्ष देणार आहेत.मुख्यमंत्र्यांना नोटीसजलसंपदा विभागातील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी अन्यथा तुमच्या विरोधात न्यायालयात धाव घेऊ, अशी नोटीस आम्ही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बजावली असून, त्याला आता २० ते २२ दिवस झाले आहेत. आता याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्याचा आमचा विचार असल्याचे देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले.आयारामांना ‘नो एन्ट्री’पक्षाची स्थिती चांगली असल्याने कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आजी-माजी मंत्री व लोकप्रतिनिधी भाजपाच्या वाटेवर असून, कोणालाही पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. जो भाजपाच्या विचारांशी आणि जनतेच्या प्रश्नांची जुळलेला आहे अशांनाच आम्ही प्रवेश देणार आहोत.
२८८ मतदारसंघांत भाजपाचे मंत्री पोहोचणार
By admin | Updated: July 12, 2014 00:23 IST