शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

कॉँग्रेस ताब्यात राखणार की भाजपा खेचणार

By admin | Updated: January 14, 2017 00:31 IST

पदवीधर मतदारसंघ : राजकीय समीकरणे बदलल्याने दुहेरी लढतीचे संकेत

नाशिक : राज्यात कॉँग्रेसची सत्ता असतानाही पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व ठेवून असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून सात वर्षांपूर्वी कॉँग्रेसने हा मतदारसंघ खेचून आणला असला तरी, राज्यात व केंद्रात झालेल्या सत्तांतरानंतर होत असलेल्या या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस व भाजपा या दोनच पक्षांमध्ये पुन्हा लढत होण्याचे संकेत आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली असून, या निवडणुकीसाठी कॉँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे, भारतीय जनता पक्षाने डॉ. प्रशांत पाटील तर तिसऱ्या आघाडीने कॉ. राजू देसले यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघावर म्हणजेच २००९ पर्यंत भारतीय जनता पक्षाचेच वर्चस्व राहिले. ना. स. फरांदे यांनी अनेक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले, त्यानंतर १९९८ मध्ये फरांदे यांच्याऐवजी भाजपाने प्रतापदादा सोनवणे यांना उमेदवारी दिली. सलग दोन वेळा सोनवणे या मतदारसंघातून निवडून आले, मात्र त्यांना २००९ मध्ये त्यांना खासदारकी लाभल्याने पदवीधर मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागली. अवघ्या वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना झालेल्या या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली, त्यात भाजपाकडून प्रसाद हिरे, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे अ‍ॅड. नितीन ठाकरे रिंगणात होते. यांच्या लढतीत अपक्ष डॉ. सुधीर तांबे यांनी विजय मिळवत अल्पकाळासाठी का होईना या मतदारसंघात परिवर्तन घडवून आणले. त्यानंतर वर्षभरात म्हणजे २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत राजकीय गणिते बदलली. डॉ. सुधीर तांबे यांना दोन्ही कॉँग्रेसने उमेदवारी दिली व भाजपाने प्रा. सुहास फरांदे यांना रिंगणात उतरविले. सरळ सरळ दुरंगी झालेल्या या निवडणुकीत तांबे यांनी पुन्हा बाजी मारून मतदारसंघावर कब्जा मिळविला व भाजपाला दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. या सर्व परिस्थितीला सहा वर्षांचा कालावधी लोटला असून, या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. केंद्रात व राज्यात सत्तांतर घडले, मतदारांवर मोदी नावाचे गारुड घट्ट बसले तर ताकदवान समजल्या जाणाऱ्या कॉँग्रेसची ताकद क्षीण झाली. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा या मतदारसंघातील अडीच लाख मतदार सामोरे जाऊ पहात असताना बदललेल्या राजकीय समीकरणांपासून ही निवडणूकही दूर राहू शकत नाही. कॉँग्रेस व राष्ट्रवादीत सत्ता काबीज करण्यासाठी सुरू असलेली चढाओढ पाहता, राष्ट्रवादीनेही या निवडणुकीत उतरण्याची कॉँग्रेसला मध्यंतरी धमकी दिली तशीच आजमावणी शिवसेनेनेही करून पाहिली. अर्थातच राष्ट्रवादी असो की शिवसेना या दोघांना ही निवडणूक लढविण्यापेक्षा मित्रपक्षांना जेरीस आणणे हाच एकमेव हेतू आहे हे लपून राहिलेले नाही. कारण दोन महिने या मतदारसंघासाठी मतदारांची नोंदणी सुरू असताना या दोन्ही पक्षांनी त्यासाठी दाखविलेली उदासीनता बरेच काही सांगून गेली. (प्रतिनिधी)