शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस ताब्यात राखणार की भाजपा खेचणार

By admin | Updated: January 14, 2017 00:31 IST

पदवीधर मतदारसंघ : राजकीय समीकरणे बदलल्याने दुहेरी लढतीचे संकेत

नाशिक : राज्यात कॉँग्रेसची सत्ता असतानाही पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व ठेवून असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून सात वर्षांपूर्वी कॉँग्रेसने हा मतदारसंघ खेचून आणला असला तरी, राज्यात व केंद्रात झालेल्या सत्तांतरानंतर होत असलेल्या या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कॉँग्रेस व भाजपा या दोनच पक्षांमध्ये पुन्हा लढत होण्याचे संकेत आहे. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली असून, या निवडणुकीसाठी कॉँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे, भारतीय जनता पक्षाने डॉ. प्रशांत पाटील तर तिसऱ्या आघाडीने कॉ. राजू देसले यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघावर म्हणजेच २००९ पर्यंत भारतीय जनता पक्षाचेच वर्चस्व राहिले. ना. स. फरांदे यांनी अनेक वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले, त्यानंतर १९९८ मध्ये फरांदे यांच्याऐवजी भाजपाने प्रतापदादा सोनवणे यांना उमेदवारी दिली. सलग दोन वेळा सोनवणे या मतदारसंघातून निवडून आले, मात्र त्यांना २००९ मध्ये त्यांना खासदारकी लाभल्याने पदवीधर मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागली. अवघ्या वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना झालेल्या या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली, त्यात भाजपाकडून प्रसाद हिरे, तर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे अ‍ॅड. नितीन ठाकरे रिंगणात होते. यांच्या लढतीत अपक्ष डॉ. सुधीर तांबे यांनी विजय मिळवत अल्पकाळासाठी का होईना या मतदारसंघात परिवर्तन घडवून आणले. त्यानंतर वर्षभरात म्हणजे २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत राजकीय गणिते बदलली. डॉ. सुधीर तांबे यांना दोन्ही कॉँग्रेसने उमेदवारी दिली व भाजपाने प्रा. सुहास फरांदे यांना रिंगणात उतरविले. सरळ सरळ दुरंगी झालेल्या या निवडणुकीत तांबे यांनी पुन्हा बाजी मारून मतदारसंघावर कब्जा मिळविला व भाजपाला दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. या सर्व परिस्थितीला सहा वर्षांचा कालावधी लोटला असून, या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. केंद्रात व राज्यात सत्तांतर घडले, मतदारांवर मोदी नावाचे गारुड घट्ट बसले तर ताकदवान समजल्या जाणाऱ्या कॉँग्रेसची ताकद क्षीण झाली. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा या मतदारसंघातील अडीच लाख मतदार सामोरे जाऊ पहात असताना बदललेल्या राजकीय समीकरणांपासून ही निवडणूकही दूर राहू शकत नाही. कॉँग्रेस व राष्ट्रवादीत सत्ता काबीज करण्यासाठी सुरू असलेली चढाओढ पाहता, राष्ट्रवादीनेही या निवडणुकीत उतरण्याची कॉँग्रेसला मध्यंतरी धमकी दिली तशीच आजमावणी शिवसेनेनेही करून पाहिली. अर्थातच राष्ट्रवादी असो की शिवसेना या दोघांना ही निवडणूक लढविण्यापेक्षा मित्रपक्षांना जेरीस आणणे हाच एकमेव हेतू आहे हे लपून राहिलेले नाही. कारण दोन महिने या मतदारसंघासाठी मतदारांची नोंदणी सुरू असताना या दोन्ही पक्षांनी त्यासाठी दाखविलेली उदासीनता बरेच काही सांगून गेली. (प्रतिनिधी)