शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

भाजपा सरकार उद्योगपतींच्या हिताचे

By admin | Updated: July 30, 2015 00:12 IST

विलास गरुड : बसपाच्या आरक्षण परिषदेत टीका

नाशिक : भाजपाचे सरकार हे केवळ उद्योगपतींच्या हिताचे असून मोदींनी जनतेला केवळ आश्वासने दाखवून भूलथापा दिल्या आहेत. ‘अच्छे दिन आएंंगे’ असा भावनिक आशावाद घराघरांपर्यंत पोहचविला आणि लोकांची दिशाभूल केली. जनतेचे अच्छे दिन येण्याऐवजी मोदींपासून तर वसुंधरा राजेंपर्यंत सर्वांचे अच्छे दिन आले आहे. मोदी टीम तुपाशी अन् जनता उपाशी अशी अवस्था सध्या झाली आहे, अशी जोरदार टीका बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी केली.महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये आयोजित जिल्हास्तरीय आरक्षण परिषदेप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या परिषदेत बोलताना गरुड यांनी कॉँग्रेस, भाजपा, रिपाइं आठवले गट अशा सर्वच पक्षांच्या कार्यपध्दतीवर प्रश्न उपस्थित करून चौफेर टीका केली. घटनात्मक आरक्षणासाठी या महाराष्ट्रात संघर्ष करावा लागतो हे दुर्दैव आहे. राज्य घटनेत इतर मागासवर्गीयांसाठी आयोगाची स्थापना करून अनुसूचित जाती-जमातींप्रमाणेच त्यांना सोयीसवलती दिल्या जाव्यात अशी, तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली; मात्र मनुवादी विचारसरणीच्या राजकीय पक्षांकडून अद्याप त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप गरुड यांनी केला. यावेळी व्यासपीठावर अरुण काळे, मुकुंद गांगुर्डे, आनंद आढाव, मच्छिंद्र आहिरे, रमेश निकम, राहुल आहिरे, धर्मा जाधव, तुळशीराम खोटरे आदि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मायावती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच ‘भीमसंध्या’ हा भीमगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)