शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा सरकार उद्योगपतींच्या हिताचे

By admin | Updated: July 30, 2015 00:12 IST

विलास गरुड : बसपाच्या आरक्षण परिषदेत टीका

नाशिक : भाजपाचे सरकार हे केवळ उद्योगपतींच्या हिताचे असून मोदींनी जनतेला केवळ आश्वासने दाखवून भूलथापा दिल्या आहेत. ‘अच्छे दिन आएंंगे’ असा भावनिक आशावाद घराघरांपर्यंत पोहचविला आणि लोकांची दिशाभूल केली. जनतेचे अच्छे दिन येण्याऐवजी मोदींपासून तर वसुंधरा राजेंपर्यंत सर्वांचे अच्छे दिन आले आहे. मोदी टीम तुपाशी अन् जनता उपाशी अशी अवस्था सध्या झाली आहे, अशी जोरदार टीका बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी केली.महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये आयोजित जिल्हास्तरीय आरक्षण परिषदेप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या परिषदेत बोलताना गरुड यांनी कॉँग्रेस, भाजपा, रिपाइं आठवले गट अशा सर्वच पक्षांच्या कार्यपध्दतीवर प्रश्न उपस्थित करून चौफेर टीका केली. घटनात्मक आरक्षणासाठी या महाराष्ट्रात संघर्ष करावा लागतो हे दुर्दैव आहे. राज्य घटनेत इतर मागासवर्गीयांसाठी आयोगाची स्थापना करून अनुसूचित जाती-जमातींप्रमाणेच त्यांना सोयीसवलती दिल्या जाव्यात अशी, तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली; मात्र मनुवादी विचारसरणीच्या राजकीय पक्षांकडून अद्याप त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप गरुड यांनी केला. यावेळी व्यासपीठावर अरुण काळे, मुकुंद गांगुर्डे, आनंद आढाव, मच्छिंद्र आहिरे, रमेश निकम, राहुल आहिरे, धर्मा जाधव, तुळशीराम खोटरे आदि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मायावती पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच ‘भीमसंध्या’ हा भीमगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)