शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

भाजपमुळेच राज्यात वीज बिल वसुलीची सक्ती : प्राजक्त तनपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 01:44 IST

शासनाने महावितरणला सहकार्य करणे, पैसे देणे अपेक्षित होते. दुदैवाने ते होऊ शकले नाही. त्यामुळे ३० हजार कोटी कर्जाचा बोजा शेतीपंपामुळे वाढला. कोरोनामुळेही परिस्थिती बरी नाही. केंद्र सरकार व मागील सरकारच्या भोंगळ कारभारामुळे वीज बिल वसुलीची सक्ती करण्याची वेळ आल्याचा आरोप राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी येथे आयोजित आढावा बैठकीप्रसंगी केला.

ठळक मुद्दे पिंपळगावी महावितरणची आढावा बैठक

पिंपळगाव बसवंत : शासनाने महावितरणला सहकार्य करणे, पैसे देणे अपेक्षित होते. दुदैवाने ते होऊ शकले नाही. त्यामुळे ३० हजार कोटी कर्जाचा बोजा शेतीपंपामुळे वाढला. कोरोनामुळेही परिस्थिती बरी नाही. केंद्र सरकार व मागील सरकारच्या भोंगळ कारभारामुळे वीज बिल वसुलीची सक्ती करण्याची वेळ आल्याचा आरोप राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी येथे आयोजित आढावा बैठकीप्रसंगी केला.

अशोकराव बनकर पतसंस्थेत निफाड-ओझर येथील महावितरण कंपनीसंदर्भात आयोजित बैठकीत तनपुरे यांनी कामकाजाचा आढावा घेतला. तनपुरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना वीज मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेला शेतमाल मातीमोल होऊन जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीज उपलब्ध करून द्यावी. राज्यात भारनियमन होऊ दिलेले नाही. भविष्यातदेखील हे संकट येणार नाही याची काळजी घेतली जाईल. कोळशाच्या खाणी या केंद्र सरकारच्या मालकीच्या असतात. केंद्र सरकार कोळसा पुरवण्यात कमी पडत आहे. त्यासाठी चर्चेची तयारी असल्याचे आव्हानही त्यांनी दिले. शेतकऱ्यांचे भरल्या पिकाचे नुकसान करू नका. ५० हजारांचे बिल असेल तर ५ हजारांची सवलत द्या, शेतकऱ्यांसोबत संयमाने बोला, त्यासाठी हवं तर ट्रेनिंग घ्या, असा सल्लाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. आमदार दिलीप बनकर यांनी ९५ हजार आदिवासी असूनदेखील निफाड तालुक्यातील बांधवांना निधी उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. यावेळी आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, रामभाऊ माळोदे, बाळासाहेब बनकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारशे, नगरसेवक सागर कुंदे, जावेद शेख, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, महापारेषणचे मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड, अधीक्षक अभियंता संजय खडारे, आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी कुमार, निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचके, आदी उपस्थित होते.

इन्फो

 

शेजारी कुणी बसले म्हणजे लगेच सरकार बनवतील असा विषय नसतो. कोणताही राजकीय भूकंप होणार नाही. सरकार पाडण्याचा या ना त्या मार्गाने कोणी कितीही प्रयत्न केला तरी पाच वर्षे सरकार टिकेल. विरोधी पक्षाने सरकार पाडण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ दिला तर ते कदाचित सत्तेत येऊ शकतात, असा टोलाही तनपुरे यांनी लगावला. ईडीबाबत मात्र तनपुरे यांनी काहीही भाष्य करण्यास टाळले.

 

टॅग्स :NashikनाशिकelectricityवीजPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरे