शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

भाजपमुळेच राज्यात वीज बिल वसुलीची सक्ती : प्राजक्त तनपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 01:44 IST

शासनाने महावितरणला सहकार्य करणे, पैसे देणे अपेक्षित होते. दुदैवाने ते होऊ शकले नाही. त्यामुळे ३० हजार कोटी कर्जाचा बोजा शेतीपंपामुळे वाढला. कोरोनामुळेही परिस्थिती बरी नाही. केंद्र सरकार व मागील सरकारच्या भोंगळ कारभारामुळे वीज बिल वसुलीची सक्ती करण्याची वेळ आल्याचा आरोप राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी येथे आयोजित आढावा बैठकीप्रसंगी केला.

ठळक मुद्दे पिंपळगावी महावितरणची आढावा बैठक

पिंपळगाव बसवंत : शासनाने महावितरणला सहकार्य करणे, पैसे देणे अपेक्षित होते. दुदैवाने ते होऊ शकले नाही. त्यामुळे ३० हजार कोटी कर्जाचा बोजा शेतीपंपामुळे वाढला. कोरोनामुळेही परिस्थिती बरी नाही. केंद्र सरकार व मागील सरकारच्या भोंगळ कारभारामुळे वीज बिल वसुलीची सक्ती करण्याची वेळ आल्याचा आरोप राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी येथे आयोजित आढावा बैठकीप्रसंगी केला.

अशोकराव बनकर पतसंस्थेत निफाड-ओझर येथील महावितरण कंपनीसंदर्भात आयोजित बैठकीत तनपुरे यांनी कामकाजाचा आढावा घेतला. तनपुरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना वीज मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेला शेतमाल मातीमोल होऊन जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीज उपलब्ध करून द्यावी. राज्यात भारनियमन होऊ दिलेले नाही. भविष्यातदेखील हे संकट येणार नाही याची काळजी घेतली जाईल. कोळशाच्या खाणी या केंद्र सरकारच्या मालकीच्या असतात. केंद्र सरकार कोळसा पुरवण्यात कमी पडत आहे. त्यासाठी चर्चेची तयारी असल्याचे आव्हानही त्यांनी दिले. शेतकऱ्यांचे भरल्या पिकाचे नुकसान करू नका. ५० हजारांचे बिल असेल तर ५ हजारांची सवलत द्या, शेतकऱ्यांसोबत संयमाने बोला, त्यासाठी हवं तर ट्रेनिंग घ्या, असा सल्लाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. आमदार दिलीप बनकर यांनी ९५ हजार आदिवासी असूनदेखील निफाड तालुक्यातील बांधवांना निधी उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. यावेळी आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, रामभाऊ माळोदे, बाळासाहेब बनकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारशे, नगरसेवक सागर कुंदे, जावेद शेख, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, महापारेषणचे मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड, अधीक्षक अभियंता संजय खडारे, आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी कुमार, निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचके, आदी उपस्थित होते.

इन्फो

 

शेजारी कुणी बसले म्हणजे लगेच सरकार बनवतील असा विषय नसतो. कोणताही राजकीय भूकंप होणार नाही. सरकार पाडण्याचा या ना त्या मार्गाने कोणी कितीही प्रयत्न केला तरी पाच वर्षे सरकार टिकेल. विरोधी पक्षाने सरकार पाडण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ दिला तर ते कदाचित सत्तेत येऊ शकतात, असा टोलाही तनपुरे यांनी लगावला. ईडीबाबत मात्र तनपुरे यांनी काहीही भाष्य करण्यास टाळले.

 

टॅग्स :NashikनाशिकelectricityवीजPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरे