शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

भाजपमुळेच राज्यात वीज बिल वसुलीची सक्ती : प्राजक्त तनपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 01:44 IST

शासनाने महावितरणला सहकार्य करणे, पैसे देणे अपेक्षित होते. दुदैवाने ते होऊ शकले नाही. त्यामुळे ३० हजार कोटी कर्जाचा बोजा शेतीपंपामुळे वाढला. कोरोनामुळेही परिस्थिती बरी नाही. केंद्र सरकार व मागील सरकारच्या भोंगळ कारभारामुळे वीज बिल वसुलीची सक्ती करण्याची वेळ आल्याचा आरोप राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी येथे आयोजित आढावा बैठकीप्रसंगी केला.

ठळक मुद्दे पिंपळगावी महावितरणची आढावा बैठक

पिंपळगाव बसवंत : शासनाने महावितरणला सहकार्य करणे, पैसे देणे अपेक्षित होते. दुदैवाने ते होऊ शकले नाही. त्यामुळे ३० हजार कोटी कर्जाचा बोजा शेतीपंपामुळे वाढला. कोरोनामुळेही परिस्थिती बरी नाही. केंद्र सरकार व मागील सरकारच्या भोंगळ कारभारामुळे वीज बिल वसुलीची सक्ती करण्याची वेळ आल्याचा आरोप राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी येथे आयोजित आढावा बैठकीप्रसंगी केला.

अशोकराव बनकर पतसंस्थेत निफाड-ओझर येथील महावितरण कंपनीसंदर्भात आयोजित बैठकीत तनपुरे यांनी कामकाजाचा आढावा घेतला. तनपुरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना वीज मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेला शेतमाल मातीमोल होऊन जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दाबाने वीज उपलब्ध करून द्यावी. राज्यात भारनियमन होऊ दिलेले नाही. भविष्यातदेखील हे संकट येणार नाही याची काळजी घेतली जाईल. कोळशाच्या खाणी या केंद्र सरकारच्या मालकीच्या असतात. केंद्र सरकार कोळसा पुरवण्यात कमी पडत आहे. त्यासाठी चर्चेची तयारी असल्याचे आव्हानही त्यांनी दिले. शेतकऱ्यांचे भरल्या पिकाचे नुकसान करू नका. ५० हजारांचे बिल असेल तर ५ हजारांची सवलत द्या, शेतकऱ्यांसोबत संयमाने बोला, त्यासाठी हवं तर ट्रेनिंग घ्या, असा सल्लाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. आमदार दिलीप बनकर यांनी ९५ हजार आदिवासी असूनदेखील निफाड तालुक्यातील बांधवांना निधी उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. यावेळी आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र डोखळे, सुभाष कराड, रामभाऊ माळोदे, बाळासाहेब बनकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारशे, नगरसेवक सागर कुंदे, जावेद शेख, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, महापारेषणचे मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड, अधीक्षक अभियंता संजय खडारे, आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी कुमार, निफाड नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचके, आदी उपस्थित होते.

इन्फो

 

शेजारी कुणी बसले म्हणजे लगेच सरकार बनवतील असा विषय नसतो. कोणताही राजकीय भूकंप होणार नाही. सरकार पाडण्याचा या ना त्या मार्गाने कोणी कितीही प्रयत्न केला तरी पाच वर्षे सरकार टिकेल. विरोधी पक्षाने सरकार पाडण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी वेळ दिला तर ते कदाचित सत्तेत येऊ शकतात, असा टोलाही तनपुरे यांनी लगावला. ईडीबाबत मात्र तनपुरे यांनी काहीही भाष्य करण्यास टाळले.

 

टॅग्स :NashikनाशिकelectricityवीजPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरे