शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

जलकरार रखडल्याने महापालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST

केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माणाअंतर्गत नाशिक महापालिकेला वाढीव पाणी हवे असल्याने २००८ मध्ये जलसंपदा विभागाच्या उच्चस्तरीय समितीने त्याचे ...

केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माणाअंतर्गत नाशिक महापालिकेला वाढीव पाणी हवे असल्याने २००८ मध्ये जलसंपदा विभागाच्या उच्चस्तरीय समितीने त्याचे नियोजन केले आणि महापालिकेला भविष्यकालीन वाढीव लोकसंख्या विचारात घेऊन आरक्षण मंजूर केले. त्यानंतर २०११ पासून नाशिक महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात जो वार्षिक पाणी पुरवठा करार होणे आवश्यक होते, तोच झालेला नाही. त्याचे कारण म्हणजे २००८ मध्ये नाशिक महापालिकेला किकवी धरणातून पाणी देण्यात येणार होते. मात्र, हे धरण बांधलेही गेले नाही, मात्र, त्याचा सिंचन पुनर्स्थापना खर्च मात्र मागितला जात आहे. त्याचप्रमाणे उचललेले पाणी ज्या प्रमाणात प्रक्रिया होऊन ते नदीपात्रात सेाडणे आवश्यक आहे, तेच सोडले जात नाही, अशी कारणे काढून जलसंपदा विभागाने करार लांबविला. महापालिकेने वेळोवेळी त्यांचे खंडन करून जलसंपदा विभागाची आकडेवारी फोल ठरविल्याने आज पावणेदोनशे कोटी रुपयांची कथित थकबाकी पन्नास कोटींच्या आत आली आहे. तीही महापालिकेला मान्य नाहीच. परंतु त्याचे निमित्त करून जलसंपदा विभाग करार करीत नाही आणि करार केला नसल्याने दुप्पट पाण्याचे दर लावत आहे. सध्या पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेला एक कोटी रुपयांचे सरासरी देयक असताना, जलसंपदा मात्र करार न केल्याने दुप्पट म्हणजे दोन कोटी रुपयांचे बिल पाठवत आहे. अर्थात, महापालिकाही आपल्या भूमिकेवर ठाम असून दुप्पटऐवजी ठरलेल्या दरानुसारच बिल भरत आहे. त्यामुळे महापालिकेच्यालेखी मात्र, कोणत्याही प्रकारची थकबाकी राहिलेली नाही.

विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आदेशालाच जलसंपदा विभाग हरताळ फासत आहे. नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयात यासंदर्भात महाजन यांनी जलसंपदामंत्री आणि नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात वादाची रक्कम बाजूला ठेवून वार्षिक करार तातडीने करून घ्यावा आणि जलसंपदा विभागाच्या दृष्टिकोनातून जी वादाची रक्कम आहे, त्यावर शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर महापालिकेने कराराचा मसुदा तयार केला आणि तो जलसंपदा विभागाकडे पाठविला. मात्र, पुन्हा तोच घोळ घालण्यात आला आणि गेल्या फेब्रुवारी महिन्यात पाठविलेला अंतिम मसुदा देखील या विभागाने अंतिम केलेला नाही, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

इन्फो..

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी करार करावा यासाठी नाशिक महापालिकेत काही महिन्यांपूर्वी आयुक्त कैलास जाधव यांनी बैठक बोलावली होती. मात्र, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा, आधी थकबाकी भरा, मग करार, असा हेका धरल्याने प्रश्न कायम राहिला.

इन्फो...

महापालिकेतील राजकारण नडले!

नाशिक महापालिकेत भाजपाची सत्ता असून आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने घोळ घालण्यात येत आहे. करार करणे ही प्रशासकीय बाब असताना, हा विषय महासभेवर मांडण्यात आल्यानंतर विविध पक्षांनी त्याला फाटे फोडले. त्यामुळे राजकीय स्तरावर देखील हा विषय रखडला आहे.