शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जलकरार रखडल्याने महापालिकेला कोट्यवधींचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST

केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माणाअंतर्गत नाशिक महापालिकेला वाढीव पाणी हवे असल्याने २००८ मध्ये जलसंपदा विभागाच्या उच्चस्तरीय समितीने त्याचे ...

केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माणाअंतर्गत नाशिक महापालिकेला वाढीव पाणी हवे असल्याने २००८ मध्ये जलसंपदा विभागाच्या उच्चस्तरीय समितीने त्याचे नियोजन केले आणि महापालिकेला भविष्यकालीन वाढीव लोकसंख्या विचारात घेऊन आरक्षण मंजूर केले. त्यानंतर २०११ पासून नाशिक महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात जो वार्षिक पाणी पुरवठा करार होणे आवश्यक होते, तोच झालेला नाही. त्याचे कारण म्हणजे २००८ मध्ये नाशिक महापालिकेला किकवी धरणातून पाणी देण्यात येणार होते. मात्र, हे धरण बांधलेही गेले नाही, मात्र, त्याचा सिंचन पुनर्स्थापना खर्च मात्र मागितला जात आहे. त्याचप्रमाणे उचललेले पाणी ज्या प्रमाणात प्रक्रिया होऊन ते नदीपात्रात सेाडणे आवश्यक आहे, तेच सोडले जात नाही, अशी कारणे काढून जलसंपदा विभागाने करार लांबविला. महापालिकेने वेळोवेळी त्यांचे खंडन करून जलसंपदा विभागाची आकडेवारी फोल ठरविल्याने आज पावणेदोनशे कोटी रुपयांची कथित थकबाकी पन्नास कोटींच्या आत आली आहे. तीही महापालिकेला मान्य नाहीच. परंतु त्याचे निमित्त करून जलसंपदा विभाग करार करीत नाही आणि करार केला नसल्याने दुप्पट पाण्याचे दर लावत आहे. सध्या पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेला एक कोटी रुपयांचे सरासरी देयक असताना, जलसंपदा मात्र करार न केल्याने दुप्पट म्हणजे दोन कोटी रुपयांचे बिल पाठवत आहे. अर्थात, महापालिकाही आपल्या भूमिकेवर ठाम असून दुप्पटऐवजी ठरलेल्या दरानुसारच बिल भरत आहे. त्यामुळे महापालिकेच्यालेखी मात्र, कोणत्याही प्रकारची थकबाकी राहिलेली नाही.

विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आदेशालाच जलसंपदा विभाग हरताळ फासत आहे. नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयात यासंदर्भात महाजन यांनी जलसंपदामंत्री आणि नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात वादाची रक्कम बाजूला ठेवून वार्षिक करार तातडीने करून घ्यावा आणि जलसंपदा विभागाच्या दृष्टिकोनातून जी वादाची रक्कम आहे, त्यावर शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर महापालिकेने कराराचा मसुदा तयार केला आणि तो जलसंपदा विभागाकडे पाठविला. मात्र, पुन्हा तोच घोळ घालण्यात आला आणि गेल्या फेब्रुवारी महिन्यात पाठविलेला अंतिम मसुदा देखील या विभागाने अंतिम केलेला नाही, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

इन्फो..

जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी करार करावा यासाठी नाशिक महापालिकेत काही महिन्यांपूर्वी आयुक्त कैलास जाधव यांनी बैठक बोलावली होती. मात्र, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा, आधी थकबाकी भरा, मग करार, असा हेका धरल्याने प्रश्न कायम राहिला.

इन्फो...

महापालिकेतील राजकारण नडले!

नाशिक महापालिकेत भाजपाची सत्ता असून आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने घोळ घालण्यात येत आहे. करार करणे ही प्रशासकीय बाब असताना, हा विषय महासभेवर मांडण्यात आल्यानंतर विविध पक्षांनी त्याला फाटे फोडले. त्यामुळे राजकीय स्तरावर देखील हा विषय रखडला आहे.