शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

गुलाब उत्पादकांना कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:20 IST

नाशिक : संचारबंदीमुळे जिल्ह्यातील फूल उत्पादक (गुलाब) शेतकऱ्यांना दोन महिन्यांत कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. काहींनी गुलाबाच्या बागेत भाजीपाला लावला आहे.

नाशिक : संचारबंदीमुळे जिल्ह्यातील फूल उत्पादक (गुलाब) शेतकऱ्यांना दोन महिन्यांत कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. काहींनी गुलाबाच्या बागेत भाजीपाला लावला आहे.फूलशेतीमध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात सुमारे १५० एकरवर गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. विशेषत: नाशिक, दिंडोरी, निफाड आदी तालुके आघाडीवर आहेत. काही शेतकरी स्थानिक बाजारात गुलाबाची विक्र ी करतात, तर अनेक शेतकरी मुंबई, सुरत, बंगलोर येथील बाजारपेठेत माल पाठवतात. दरवर्षी या काळात लग्नसराई, रमजानपर्व, विविध सण उत्सव असल्याने फुलांना चांगली मागणी असते. एका सर्वसामान्य शेतकºयाचा किमान ३०० ते ५०० डझन इतकी गुलाबाची फुले दररोज बाजारात जात असतात. खुल्या शेतीतील फुलांना थोडा कमी भाव मिळत असला तरी पॉली हाउसमधील गुलाबाला किमान १०० रु पये डझनपर्यंत भाव मिळत असतो. गुलाबाच्या एक एकर शेतीतून शेतकºयाला वार्षिक ३.५० ते ४ लाखांचे आर्थिक उत्पन्न मिळत असते. या वर्षी मात्र शेतकऱ्यांना या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. या संकटामुळे अनेक शेतकºयांनी यावर्षी उत्पादन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.फुलविक्र ीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. यामुळे यावर्षी गुलाबाचे उत्पादन घेतले नाही. गुलाबाच्या बागेत भाजीपाला केला आहे. दोन महिन्यांत लग्नसमारंभ, रमजान पर्व, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, आखाजी, हनुमान जयंती असे सण उत्सव असतात यामुळे गुलाबाला चांगली मागणी असते. याशिवाय यावर्षी मंदिरेही बंद आहेत. आमचे किमान २.५० ते ३ लाखांचे नुकसान झाले आहे.- योगेश नळे, गुलाब उत्पादक शेतकरी, कसबे सकेणे, ता. निफाड

टॅग्स :Nashikनाशिक