शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

गुलाब उत्पादकांना कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:20 IST

नाशिक : संचारबंदीमुळे जिल्ह्यातील फूल उत्पादक (गुलाब) शेतकऱ्यांना दोन महिन्यांत कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. काहींनी गुलाबाच्या बागेत भाजीपाला लावला आहे.

नाशिक : संचारबंदीमुळे जिल्ह्यातील फूल उत्पादक (गुलाब) शेतकऱ्यांना दोन महिन्यांत कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. काहींनी गुलाबाच्या बागेत भाजीपाला लावला आहे.फूलशेतीमध्ये नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात सुमारे १५० एकरवर गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. विशेषत: नाशिक, दिंडोरी, निफाड आदी तालुके आघाडीवर आहेत. काही शेतकरी स्थानिक बाजारात गुलाबाची विक्र ी करतात, तर अनेक शेतकरी मुंबई, सुरत, बंगलोर येथील बाजारपेठेत माल पाठवतात. दरवर्षी या काळात लग्नसराई, रमजानपर्व, विविध सण उत्सव असल्याने फुलांना चांगली मागणी असते. एका सर्वसामान्य शेतकºयाचा किमान ३०० ते ५०० डझन इतकी गुलाबाची फुले दररोज बाजारात जात असतात. खुल्या शेतीतील फुलांना थोडा कमी भाव मिळत असला तरी पॉली हाउसमधील गुलाबाला किमान १०० रु पये डझनपर्यंत भाव मिळत असतो. गुलाबाच्या एक एकर शेतीतून शेतकºयाला वार्षिक ३.५० ते ४ लाखांचे आर्थिक उत्पन्न मिळत असते. या वर्षी मात्र शेतकऱ्यांना या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. या संकटामुळे अनेक शेतकºयांनी यावर्षी उत्पादन न घेण्याचा निर्णय घेतला आहे.फुलविक्र ीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. यामुळे यावर्षी गुलाबाचे उत्पादन घेतले नाही. गुलाबाच्या बागेत भाजीपाला केला आहे. दोन महिन्यांत लग्नसमारंभ, रमजान पर्व, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा, आखाजी, हनुमान जयंती असे सण उत्सव असतात यामुळे गुलाबाला चांगली मागणी असते. याशिवाय यावर्षी मंदिरेही बंद आहेत. आमचे किमान २.५० ते ३ लाखांचे नुकसान झाले आहे.- योगेश नळे, गुलाब उत्पादक शेतकरी, कसबे सकेणे, ता. निफाड

टॅग्स :Nashikनाशिक