शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीचा निर्णय सर्वांत मोठी चूक :  यशवंत सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:32 IST

अटलबिहारी वाजपेयी सरकारने आर्थिक विकासाचे जे मॉडेल समोर ठेवले होते, ते यूपीए आणि एनडीए सरकारने पुढे न नेल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. नोटबंदीचा निर्णय ही सर्वांत मोठी चूक ठरली. त्याचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्राला बसला. सद्य:स्थितीत सरकारकडून आर्थिक विकासाच्या वेगाची दिली जाणारी आकडेवारी संशयास्पद असल्याचे प्रतिपादन भारताचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी महावीर व्याख्यानमालेत बोलताना केले.

नाशिक : अटलबिहारी वाजपेयी सरकारने आर्थिक विकासाचे जे मॉडेल समोर ठेवले होते, ते यूपीए आणि एनडीए सरकारने पुढे न नेल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. नोटबंदीचा निर्णय ही सर्वांत मोठी चूक ठरली. त्याचा सर्वाधिक फटका असंघटित क्षेत्राला बसला. सद्य:स्थितीत सरकारकडून आर्थिक विकासाच्या वेगाची दिली जाणारी आकडेवारी संशयास्पद असल्याचे प्रतिपादन भारताचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी महावीर व्याख्यानमालेत बोलताना केले. नाशिक जिल्हा सांस्कृतिक कला फाउंडेशन आणि जैन सेवा कार्यसमिती यांच्या वतीने प. सा. नाट्यगृहात आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प यशवंत सिन्हा यांनी ‘भारताची आर्थिक वाटचाल व दिशा’ या विषयावर गुंफले. अध्यक्षस्थानी वनाधिपती विनायकदादा पाटील होते. यावेळी सिन्हा यांनी स्वातंत्र्यापासून ते ९०च्या दशकापर्यंत बदलत्या अर्थव्यवस्थेचा वेध घेत पुढे सांगितले, वाजपेयी सरकारने आर्थिक विकासाचे एक मॉडेल समोर ठेवले होते. त्यात सरकारी गुंतवणूक वाढविणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे यांचा समावेश होता. त्यातून राष्टÑीय महामार्गाची निर्मिती झाली. ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विस्तारले.  टेलिकॉम क्षेत्रात सुधारणा झाली. परंतु, नंतर यूपीए सरकारने एक्साइज ड्यूटीमध्ये सवलत दिली. मनरेगा सुरू केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मागणी आणि पुरवठा यांच्यात जेव्हा संतुलन राहत नाही, तेव्हा अर्थव्यवस्था विकृत होत जाते. भारताची अर्थव्यवस्था ही जटिल आहे. प्रत्येक घटकाचा विचार करावा लागणार आहे. २०१४ मध्ये जेव्हा एनडीए सरकार आले तेव्हा सुमारे २५ ते ३० लाख कोटी रुपयांचे प्रकल्प रखडलेले होते. बॅँकांचे एनपीए वाढलेले होते. आंतरराष्टÑीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पडलेल्या होत्या. परंतु, आता चार वर्षांत मागे वळून पाहिले तर चुकीच्या धोरणांचा अवलंब करण्यात आला. बॅँकांचा एनपीए वाढलेला आहे. सहा लाख कोटीने बचत कमी झाली आहे. गेल्या १४ वर्षांत एकही मोठा प्रकल्प उदयास आला नाही. शेतकरीवर्ग दु:खी आहे. महाराष्टÑात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या वाढते आहे. सर्वत्र नैराश्याची स्थिती आहे. भुलभुलय्या सुरू आहे. आश्वासने मात्र मोठी देताना त्याची अंमलबजावणी होत नसल्याची खंतही सिन्हा यांनी व्यक्त केली. सरकार स्थापन झाले त्यावेळी ‘टीम इंडिया’ची चर्चा केली गेली. परंतु, आज कुठे आहे ‘टीम इंडिया’ असे सांगत त्यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले. प्रास्ताविक गौतम सुराणा यांनी केले. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा, डॉ. भाऊसाहेब मोरे, सोहनलाल भंडारी, प्रवीण खाबिया आदी उपस्थित होते.फडणवीसांवरही निशाणायशवंत सिन्हा यांनी महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. सिन्हा म्हणाले, मागील वर्षी अकोला येथे शेतकºयांचे आंदोलन झाले त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या. मुंबईत काही दिवसांपूर्वी किसान सभेचा मोर्चा आला. त्यांच्याही सर्व मागण्या मान्य केल्या. दिल्लीत अण्णा हजारे यांनी उपोषण केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांनाही सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मागण्या सर्व मान्य करतात; परंतु अंमलबजावणी एकाचीही झालेली नाही. अकोला येथे झालेल्या आंदोलनासंदर्भात लिखित आश्वासन देऊनही अद्याप एकही मागणी अंमलात आली नसल्याचे सिन्हा यांनी सांगितले.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हा