शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
2
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
3
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
4
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
5
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
6
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
7
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
8
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
9
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
10
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
12
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
13
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
14
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
15
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
16
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
17
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
18
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
19
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
20
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!

द्राक्ष, कांद्याचे सर्वाधिक नुकसान : प्रधान सचिव येणार

By admin | Updated: November 18, 2014 00:32 IST

सतरा हजार हेक्टरवरील पिके बाधित

  नाशिक : वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह जिल्'ात सर्वदूर कोसळलेल्या पावसामुळे सुमारे १७ हजार हेक्टरवरील शेती पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, नुकसानीचा निश्चित आकडा शोधण्यासाठी तलाठ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव बुधवारी नाशिक दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या उपस्थितीत शासकीय बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्'ात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. रविवारी सायंकाळी तर धुवॉँधार बरसून पावसाने दाणाफाण उडविली, जवळपास दोन तास कोसळलेल्या या पावसामुळे शेतातील उभी पिके नष्ट झाली आहेत. विशेष करून द्राक्ष, डाळिंब व खळ्यात काढून ठेवलेल्या कांद्याला याची मोठ्या प्रमाणात झळ बसून शेतकरी उद््ध्वस्त झाला आहे. त्याच बरोबर कापणीवर आलेल्या भात व नागली पिकांचीही नासधूस झाल्याने विशेष करून आदिवासी भागातील शेतकऱ्याची अवस्था बिकट झाल्याने जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांना तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, त्यानंतरच नुकसानीचा निश्चित अंदाज बांधण्यात येणार आहे. सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर तातडीने पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले. जिल्'ात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्राधन सचिव श्रीकांत सिंह बुधवारी नाशिक जिल्'ाच्या दौऱ्यावर येत आहेत. सिन्नर तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन दुपारी १२ वाजता सर्व महसूल अधिकारी, कृषी अधिकारी, तहसीलदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा ते दौऱ्यावर जातील.