शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ उतरले आखाड्यात

By admin | Updated: August 9, 2015 23:30 IST

सिंंहस्थ कुंभमेळा : नाशिक, त्र्यंबक, कावनाईला भेट

भुजबळ उतरले आखाड्यातसिंंहस्थ कुंभमेळा : नाशिक, त्र्यंबक, कावनाईला भेटनाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू-महंतांकडून प्रशासनावर होणारे आरोप, आखाड्यातील आपसातील मतभेद आणि पोलीस प्रशासनाकडून नाशिककरांची होणारी अडवणूक या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री छगन भुजबळ आता आखाड्यात उतरले आहेत. भुजबळ यांनी कावनाई, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील आखाड्यांना भेटी देऊन येणारे भाविक आणि साधूंना चांगल्या सुविधा देणे हे यजमान म्हणून आपली जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. भुजबळ यांनी त्र्यंबक येथील बडा उदासीन आखाडाचे प्रमुख रघुमुनीजी महाराज, निरंजनी आखाड्याचे प्रमुख नरेंद्रगिरी महाराज, अखिल भारतीय षड्दर्शन आखाडा परिषदेचे महंत सागरानंद महाराज, महंत हरिगीरीजी महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांच्या भेटी घेतल्या.याप्रसंगी भुजबळ यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आपण सक्रिय झाल्याचे संकेत देत संपूर्ण साधुग्रामची पाहणी केली. यावेळी छगन भुजबळ म्हणाले, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत. या सर्व भाविकांना पर्यटकांना मोठ्या प्रमाणवर सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. येणाऱ्या भाविक व पर्यटकांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार असून, आर्थिक उलाढालही होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयी -सुविधा देणे आपले काम आहे. सर्व पक्ष व विविध गट, स्वयंसेवक यांनी एकत्र येऊन हा पवित्र सोहळा पार पाडावा, असे आवाहनदेखील भुजबळ यांनी केले. यावेळी बडा उदासीन आखाड्याचे प्रमुख महंत रघुमुनी महाराज यांनी सांगितले की, आम्ही छगन भुजबळ यांचे पाहुणे आहोत. त्यामुळे हा कुंभमेळा चांगल्याप्रकारे होईल यात शंका नाही. मात्र, प्रशासनाकडून पाहिजे त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रशासन कमी पडत आहे. हरिगीरीजी महराज यांनीही सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रशासनाकडून सुविधांचा अभाव असल्याचे सांगितले. यावेळी छगन भुजबळ यांनी त्र्यंबक नगरपरिषदेला भेट दिली. नगराध्यक्ष अनघा फडके, योगेश तुंगार, माधुरी जोशी आदि नगरसेवकांनी त्यांचे सत्कार करून स्वागत केले. यावेळी भुजबळ यांनी कुंभमेळ्यात भाविकांना चांगल्या प्रकारच्या सोयी-सुविधा देण्याचे आवाहन केले.भुजबळ यांनी कामांची केलेली पाहणी, यजमान म्हणून भाविक आणि साधूंसाठी करावयाच्या सुविधा याविषयी विधान केल्यामुळे साधुग्रामच्या समस्या सुटू शकतील, असा विश्वास अनेक साधू-महंतांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, दिलीप खैरे, परवेज कोकणी, अ‍ॅड. संदीप गुळवे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, गोरख बोडके, सुनील वाजे, उदय जाधव, बाळासाहेब गाढवे, कैलास घुले, बिहरू मुळाने, पुरुषोत्तम कडलक आदि मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)