शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आपत्कालीन निधीवरून भुजबळ-कांदे यांच्यात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:18 IST

नांदगाव : तालुक्यात महापुरामुळे शेती व इतर व्यापारी व्यवसायातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पाहणी ...

नांदगाव : तालुक्यात महापुरामुळे शेती व इतर व्यापारी व्यवसायातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पाहणी दौरा व शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बैठकीदरम्यान आपत्कालीन निधी व शिवभोजन थाळी यातील तरतुदीवरून आमदार सुहास कांदे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर पालकमंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने कांदे आक्रमक झाले. त्यांनी निधीच्या मुद्द्यावर सरळसरळ पालकमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर शाब्दिक खडाजंगी होऊन बैठक आटोपती घेण्यात आली. दरम्यान, शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर आपत्कालीन निधी मिळालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

बुधवार (दि. ७)पासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाल्यांना मोठे पूर आले. पावसामुळे शेकडो हेक्टर जमिनीतील पीक खराब झाले, तर शेकडो कुटुंबांना आर्थिक फटका बसला. त्यामुळे आमदार कांदे सक्रिय झाले होते. गेल्या चार दिवसांपासून पूरग्रस्तांमध्येच व्यस्त असलेले आमदार यांनी बैठकीची औपचारिकता पार पाडण्याच्या प्रकाराला विरोध दर्शवून आक्रमक पवित्रा घेतला. सरसकट सर्व नुकसानग्रस्तांना ठोस शासकीय मदत मिळावी, वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांशी बोलून तालुक्याला भरीव निधी मिळवून देण्याची भूमिका मांडत असताना पालकमंत्री व आमदार यांच्यात खडाजंगी झाली. आपत्कालीन निधीची मागणी करताच पालकमंत्र्यांनी कलेक्टरला ते अधिकार असतात असे सांगितल्याने कांदे संतप्त झाले. शिवाय शिवभोजन थाळीची संख्या १५० वरून थेट ३०० पर्यंत वाढविण्यास पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली. नगर परिषदेमार्फत दोन्ही वेळेस मोफत भोजन पूरग्रस्तांना वैयक्तिक खर्चातून देत असल्याचे कांदे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर ही भोजन थाळीची संख्या वाढविण्यात आली.

पंचनामे सरसकट व शंभर टक्के करावेत, अशी सूचना कांदे यांनी प्रांताधिकारी सोपान कासार यांना भुजबळ यांचा संदर्भ देऊन केली. तेव्हा भुजबळ यांनी आमदार कांदे यांना ‘मी सांगतोय ना......’ असे सांगत असतानाचा कांदे यांनी तुम्ही या समितीचे अध्यक्ष आहात, त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला तर जिल्हाधिकारी सहमती दर्शवतीलच असे सांगितले. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी बैठक आटोपती घेतली.

इन्फो

प्रांताच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

कलेक्टर यांची अनुपस्थिती आणि भुजबळ यांनी निधीचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे दाखवलेले बोट हा कांदे व त्यांच्यातील वादाचा कळीचा मुद्दा ठरला. अतिवृष्टी किंवा ढगफुटी झाल्याने घरे वाहून गेली व नुकसान झाले आहे. त्या त्या ठिकाणी शासनाने जिल्हा नियोजन समितीमध्ये खास कलेक्टर आणि पालकमंत्री यांना आपत्कालीन निधीची तरतूद करण्याचे अधिकार दिले आहेत. तो निधी आम्हाला द्यावा. येथे आभाळ फाटले आहे, आम्ही किती दिवस स्वच्छता करणार, पूल बांधायचा आहे, नदीचे रुंदीकरण, खोलीकरण करायचे आहे, पूल वाहून गेले, बंधारे फुटले... या सर्व बाबी आपत्कालीन निधीतून झटपट होऊ शकतात, असा कांदे यांचा मुद्दा होता. तातडीने पंचनामे झाले नाहीत तर प्रांतांच्या घराबाहेर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा कांदे यांनी दिला. तसेच पंचनामे सरसकट व्हायला हवेत. अधिकारी प्रक्रियेनुसार काम करतील, परंतु खरी दिशाभूल पालकमंत्री करताहेत. आमचा शेतकरी काय भिकारी आहे का?तो कष्टाने कमवतो, असा आक्षेप कांदे यांनी घेतल्याने मुद्दा अजून गरम झाला.

फोटो- ११ भुजबळ-कांदे

110921\11nsk_47_11092021_13.jpg

फोटो- ११ भुजबळ-कांदे