शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन निधीवरून भुजबळ-कांदे यांच्यात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:18 IST

नांदगाव : तालुक्यात महापुरामुळे शेती व इतर व्यापारी व्यवसायातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पाहणी ...

नांदगाव : तालुक्यात महापुरामुळे शेती व इतर व्यापारी व्यवसायातील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पाहणी दौरा व शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बैठकीदरम्यान आपत्कालीन निधी व शिवभोजन थाळी यातील तरतुदीवरून आमदार सुहास कांदे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर पालकमंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने कांदे आक्रमक झाले. त्यांनी निधीच्या मुद्द्यावर सरळसरळ पालकमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर शाब्दिक खडाजंगी होऊन बैठक आटोपती घेण्यात आली. दरम्यान, शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर आपत्कालीन निधी मिळालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

बुधवार (दि. ७)पासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाल्यांना मोठे पूर आले. पावसामुळे शेकडो हेक्टर जमिनीतील पीक खराब झाले, तर शेकडो कुटुंबांना आर्थिक फटका बसला. त्यामुळे आमदार कांदे सक्रिय झाले होते. गेल्या चार दिवसांपासून पूरग्रस्तांमध्येच व्यस्त असलेले आमदार यांनी बैठकीची औपचारिकता पार पाडण्याच्या प्रकाराला विरोध दर्शवून आक्रमक पवित्रा घेतला. सरसकट सर्व नुकसानग्रस्तांना ठोस शासकीय मदत मिळावी, वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांशी बोलून तालुक्याला भरीव निधी मिळवून देण्याची भूमिका मांडत असताना पालकमंत्री व आमदार यांच्यात खडाजंगी झाली. आपत्कालीन निधीची मागणी करताच पालकमंत्र्यांनी कलेक्टरला ते अधिकार असतात असे सांगितल्याने कांदे संतप्त झाले. शिवाय शिवभोजन थाळीची संख्या १५० वरून थेट ३०० पर्यंत वाढविण्यास पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली. नगर परिषदेमार्फत दोन्ही वेळेस मोफत भोजन पूरग्रस्तांना वैयक्तिक खर्चातून देत असल्याचे कांदे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर ही भोजन थाळीची संख्या वाढविण्यात आली.

पंचनामे सरसकट व शंभर टक्के करावेत, अशी सूचना कांदे यांनी प्रांताधिकारी सोपान कासार यांना भुजबळ यांचा संदर्भ देऊन केली. तेव्हा भुजबळ यांनी आमदार कांदे यांना ‘मी सांगतोय ना......’ असे सांगत असतानाचा कांदे यांनी तुम्ही या समितीचे अध्यक्ष आहात, त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला तर जिल्हाधिकारी सहमती दर्शवतीलच असे सांगितले. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी बैठक आटोपती घेतली.

इन्फो

प्रांताच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा

कलेक्टर यांची अनुपस्थिती आणि भुजबळ यांनी निधीचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे दाखवलेले बोट हा कांदे व त्यांच्यातील वादाचा कळीचा मुद्दा ठरला. अतिवृष्टी किंवा ढगफुटी झाल्याने घरे वाहून गेली व नुकसान झाले आहे. त्या त्या ठिकाणी शासनाने जिल्हा नियोजन समितीमध्ये खास कलेक्टर आणि पालकमंत्री यांना आपत्कालीन निधीची तरतूद करण्याचे अधिकार दिले आहेत. तो निधी आम्हाला द्यावा. येथे आभाळ फाटले आहे, आम्ही किती दिवस स्वच्छता करणार, पूल बांधायचा आहे, नदीचे रुंदीकरण, खोलीकरण करायचे आहे, पूल वाहून गेले, बंधारे फुटले... या सर्व बाबी आपत्कालीन निधीतून झटपट होऊ शकतात, असा कांदे यांचा मुद्दा होता. तातडीने पंचनामे झाले नाहीत तर प्रांतांच्या घराबाहेर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा कांदे यांनी दिला. तसेच पंचनामे सरसकट व्हायला हवेत. अधिकारी प्रक्रियेनुसार काम करतील, परंतु खरी दिशाभूल पालकमंत्री करताहेत. आमचा शेतकरी काय भिकारी आहे का?तो कष्टाने कमवतो, असा आक्षेप कांदे यांनी घेतल्याने मुद्दा अजून गरम झाला.

फोटो- ११ भुजबळ-कांदे

110921\11nsk_47_11092021_13.jpg

फोटो- ११ भुजबळ-कांदे