शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

भुजबळ सेनेत जाणार: समता परिषदेचे काय होणार?

By श्याम बागुल | Updated: September 3, 2019 15:43 IST

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या छगन भुजबळ यांना राजकीय आधार मिळाला तो त्यांच्या ओबीसी समाजाचे नेतेपदामुळे. समता परिषदेच्या स्थापनेनंतर अवघ्या सहा महिन्यात १९९३ मध्ये जालना येथे घेण्यात आलेल्या पहिल्याच मेळाव्यातून भुजबळ यांनी ओबीसी समाजाची

ठळक मुद्देसमता परिषदेचे लावलेले रोपटे बिहार, राजस्थान, दिल्ली, झारखंड, गोवा आदी राज्यांमध्ये झपाट्याने बहरले. ओबीसींचे नेतृत्व करतांना बहुसंख्य समाजाकडून भुजबळ टार्गेट झाले

श्याम बागुलमागासवर्गीयांना नोकरी, शिक्षणात आरक्षण देण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक सुबत्तेला हातभार लावणाऱ्या मंडल आयोगाची राज्यात अंमलबजावणी करावी या एव्हढ्या एकमेव कारणास्तव शिवसेनेशी व पर्यायाने सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेणा-या छगन भुजबळ यांनी आपल्या याच भूमिकेच्या पाठपुराव्यासाठी २८ वर्षापुर्वी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली. इतर मागासवर्गीयांची देशपातळीवर मोट बांधण्यात यशस्वीही झाले आज पुन्हा बदललेल्या राजकीय समिकरणातून भुजबळ शिवसेनेत प्रवेश करण्याच्या होत असलेल्या चर्चा पाहता, त्यांच्या संभाव्य सेना प्रवेशानंतर समता परिषदेचे काय होणार या प्रश्नाचे सध्या उत्तर सापडणे मुश्किल झाले आहे.

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या छगन भुजबळ यांना राजकीय आधार मिळाला तो त्यांच्या ओबीसी समाजाचे नेतेपदामुळे. समता परिषदेच्या स्थापनेनंतर अवघ्या सहा महिन्यात १९९३ मध्ये जालना येथे घेण्यात आलेल्या पहिल्याच मेळाव्यातून भुजबळ यांनी ओबीसी समाजाची ताकद दाखवून दिली व पुढे हीच ताकद त्यांच्या राजकारणातील सुलभ वावराला कामी आली. आक्रमक व अभ्यासू नेतृत्वगुणामुळे इतर मागासवर्गीयांमधील अन्य जातींनाही भुजबळ हे आपले नेते वाटू लागल्याने परिणामी महाराष्टÑात समता परिषदेचे लावलेले रोपटे बिहार, राजस्थान, दिल्ली, झारखंड, गोवा आदी राज्यांमध्ये झपाट्याने बहरले. प्रत्येक राज्यातील ओबीसी नेत्यांचे संघटन उभे करून त्यांना आपल्यामागे व पर्यायाने समता परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र आणण्यात भुजबळ यशस्वी झाले. परिणामी त्यांच्या या राष्टÑव्यापी नेतृत्वाचा राजकीय वाटचालीत मोठा फायदा झाला. महाराष्टÑातील राजकीय वर्तुळात ज्या ज्या वेळी भुजबळ अडचणीत आले त्या त्यावेळी समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपली ताकद दाखवून राजकीय इप्सित साध्य करून घेतले. राज्यातील ओबीसींचे नेते म्हणून ओळखल्या जाणा-या भुजबळ यांनी देखील ओबीसींच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका घेवून त्यांच्या न्याय, हक्कासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला. अर्थात ओबीसींचे नेतृत्व करतांना बहुसंख्य समाजाकडून भुजबळ यांना टार्गेट करण्याचे काम नेहमीच करण्यात आले व त्याच्या शिक्षाही त्यांनी भोगल्या. आता मात्र पुन्हा एकदा भुजबळ यांची पावले शिवसेनेच्या दिशेने पडू लागल्याच्या वार्ता वाºयाच्या वेगाने पसरू लागल्या आहेत. अशा वार्ता व होणाºया चर्चांचा राजकीय अंदाज घेत भुजबळ पुढचे आडाखे बांधू लागले आहेत. प्रसंगी अशा वार्तांचे कधी खंडण तर कधी अशा वार्ता पसरतील याची पद्धतशीर काळजीही घेतली जात आहे. भुजबळ शिवसेनेत जातील किंवा जाणारही नाहीत, परंतु ज्या ओबीसींच्या बळावर त्यांनी राजकीय शिखरे पादाकांत केली त्या समता परिषदेचे काय हा प्रश्न त्यांच्या देशभरातील समता सैनिकांना पडला आहे. ज्या कारणावरून शिवसेनेतून बाहेर पडून समता परिषद जन्माला घातली ती परिषद सेनेत जावून अबाधित राहणार की विसर्जित करणार ? सेनेत विलीन करणार की तिचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणार असे एक नव्हे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एक मात्र खरे शिवसेनेला स्वत:च्या पक्ष संघटनेशिवाय अन्य कोणतीही समांतर संघटनेचे अस्तित्व मान्य होत नाही हे भुजबळ यांच्यासारख्या पुर्वाश्रमीच्या शिवसैनिकाला चांगलेच ठावूक आहे. आजही भुजबळ पुन्हा शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधण्यास तयार असतील तर त्यामागची कारणे व त्यांचे शिवसेनेतील स्थान याबाबतचा अंदाज मुरब्बी राजकारणी म्हणून निश्चितच बांधला असेल.

टॅग्स :PoliticsराजकारणChagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक