शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

भुजबळ सेनेत जाणार: समता परिषदेचे काय होणार?

By श्याम बागुल | Updated: September 3, 2019 15:43 IST

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या छगन भुजबळ यांना राजकीय आधार मिळाला तो त्यांच्या ओबीसी समाजाचे नेतेपदामुळे. समता परिषदेच्या स्थापनेनंतर अवघ्या सहा महिन्यात १९९३ मध्ये जालना येथे घेण्यात आलेल्या पहिल्याच मेळाव्यातून भुजबळ यांनी ओबीसी समाजाची

ठळक मुद्देसमता परिषदेचे लावलेले रोपटे बिहार, राजस्थान, दिल्ली, झारखंड, गोवा आदी राज्यांमध्ये झपाट्याने बहरले. ओबीसींचे नेतृत्व करतांना बहुसंख्य समाजाकडून भुजबळ टार्गेट झाले

श्याम बागुलमागासवर्गीयांना नोकरी, शिक्षणात आरक्षण देण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक सुबत्तेला हातभार लावणाऱ्या मंडल आयोगाची राज्यात अंमलबजावणी करावी या एव्हढ्या एकमेव कारणास्तव शिवसेनेशी व पर्यायाने सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेणा-या छगन भुजबळ यांनी आपल्या याच भूमिकेच्या पाठपुराव्यासाठी २८ वर्षापुर्वी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली. इतर मागासवर्गीयांची देशपातळीवर मोट बांधण्यात यशस्वीही झाले आज पुन्हा बदललेल्या राजकीय समिकरणातून भुजबळ शिवसेनेत प्रवेश करण्याच्या होत असलेल्या चर्चा पाहता, त्यांच्या संभाव्य सेना प्रवेशानंतर समता परिषदेचे काय होणार या प्रश्नाचे सध्या उत्तर सापडणे मुश्किल झाले आहे.

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या छगन भुजबळ यांना राजकीय आधार मिळाला तो त्यांच्या ओबीसी समाजाचे नेतेपदामुळे. समता परिषदेच्या स्थापनेनंतर अवघ्या सहा महिन्यात १९९३ मध्ये जालना येथे घेण्यात आलेल्या पहिल्याच मेळाव्यातून भुजबळ यांनी ओबीसी समाजाची ताकद दाखवून दिली व पुढे हीच ताकद त्यांच्या राजकारणातील सुलभ वावराला कामी आली. आक्रमक व अभ्यासू नेतृत्वगुणामुळे इतर मागासवर्गीयांमधील अन्य जातींनाही भुजबळ हे आपले नेते वाटू लागल्याने परिणामी महाराष्टÑात समता परिषदेचे लावलेले रोपटे बिहार, राजस्थान, दिल्ली, झारखंड, गोवा आदी राज्यांमध्ये झपाट्याने बहरले. प्रत्येक राज्यातील ओबीसी नेत्यांचे संघटन उभे करून त्यांना आपल्यामागे व पर्यायाने समता परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र आणण्यात भुजबळ यशस्वी झाले. परिणामी त्यांच्या या राष्टÑव्यापी नेतृत्वाचा राजकीय वाटचालीत मोठा फायदा झाला. महाराष्टÑातील राजकीय वर्तुळात ज्या ज्या वेळी भुजबळ अडचणीत आले त्या त्यावेळी समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपली ताकद दाखवून राजकीय इप्सित साध्य करून घेतले. राज्यातील ओबीसींचे नेते म्हणून ओळखल्या जाणा-या भुजबळ यांनी देखील ओबीसींच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक भूमिका घेवून त्यांच्या न्याय, हक्कासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला. अर्थात ओबीसींचे नेतृत्व करतांना बहुसंख्य समाजाकडून भुजबळ यांना टार्गेट करण्याचे काम नेहमीच करण्यात आले व त्याच्या शिक्षाही त्यांनी भोगल्या. आता मात्र पुन्हा एकदा भुजबळ यांची पावले शिवसेनेच्या दिशेने पडू लागल्याच्या वार्ता वाºयाच्या वेगाने पसरू लागल्या आहेत. अशा वार्ता व होणाºया चर्चांचा राजकीय अंदाज घेत भुजबळ पुढचे आडाखे बांधू लागले आहेत. प्रसंगी अशा वार्तांचे कधी खंडण तर कधी अशा वार्ता पसरतील याची पद्धतशीर काळजीही घेतली जात आहे. भुजबळ शिवसेनेत जातील किंवा जाणारही नाहीत, परंतु ज्या ओबीसींच्या बळावर त्यांनी राजकीय शिखरे पादाकांत केली त्या समता परिषदेचे काय हा प्रश्न त्यांच्या देशभरातील समता सैनिकांना पडला आहे. ज्या कारणावरून शिवसेनेतून बाहेर पडून समता परिषद जन्माला घातली ती परिषद सेनेत जावून अबाधित राहणार की विसर्जित करणार ? सेनेत विलीन करणार की तिचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणार असे एक नव्हे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एक मात्र खरे शिवसेनेला स्वत:च्या पक्ष संघटनेशिवाय अन्य कोणतीही समांतर संघटनेचे अस्तित्व मान्य होत नाही हे भुजबळ यांच्यासारख्या पुर्वाश्रमीच्या शिवसैनिकाला चांगलेच ठावूक आहे. आजही भुजबळ पुन्हा शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधण्यास तयार असतील तर त्यामागची कारणे व त्यांचे शिवसेनेतील स्थान याबाबतचा अंदाज मुरब्बी राजकारणी म्हणून निश्चितच बांधला असेल.

टॅग्स :PoliticsराजकारणChagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक