शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

‘भोजापूर’मध्ये केवळ सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा, टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 14:20 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणात केवळ पाच ते सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणात केवळ पाच ते सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाळा लांबणीवर पडल्यास धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणीयोजना संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावर मनेगावसह १६ गावे तसेच कणकोरीसह पाच गाव नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. पुढील तीन महिने मृत पाणी साठ्यावर योजना अवलंबून राहण्याची चिन्हे आहे.नांदूरशिंगोटे व परिसराचे पिण्याच्या पाण्याचे व शेतीचे भवितव्य भोजापूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गतवर्षी पश्चिम पट्ट्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरून सुध्दा धरणातील पाण्याची पातळी मार्च महिन्याच्या मध्यांवरच खालवली आहे. यावर्षी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामातील पिकांना आवर्तन दिले होते. इतिहासात प्रथमच पोलीस बंदोबस्तात भोजापूर धरणातील आवर्तन सोडण्यात आले होते. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहे.डिसेंबर महिन्यात नांदूरशिंगोटे, दोडी बुद्रूक, दोडी खुर्द व संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरातील पाझर तलावांत पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. सुमारे पंधरा दिवस धरणातून आवर्तन सुरू होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन व धरणातून होणारा बेसुमार पाणी उपसा यामुळे धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. तसेच धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात धरणातील उद्भव विहीरीजवळील पाणीसाठा कमी झाल्याने चर घेऊन विहीरीकडे पाणी वळविण्यात येते.

टॅग्स :Nashikनाशिक