शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

‘भोजापूर’मध्ये केवळ सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा, टंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 14:20 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणात केवळ पाच ते सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणात केवळ पाच ते सहा टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाळा लांबणीवर पडल्यास धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणीयोजना संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावर मनेगावसह १६ गावे तसेच कणकोरीसह पाच गाव नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. पुढील तीन महिने मृत पाणी साठ्यावर योजना अवलंबून राहण्याची चिन्हे आहे.नांदूरशिंगोटे व परिसराचे पिण्याच्या पाण्याचे व शेतीचे भवितव्य भोजापूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गतवर्षी पश्चिम पट्ट्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरून सुध्दा धरणातील पाण्याची पातळी मार्च महिन्याच्या मध्यांवरच खालवली आहे. यावर्षी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी व रब्बी हंगामातील पिकांना आवर्तन दिले होते. इतिहासात प्रथमच पोलीस बंदोबस्तात भोजापूर धरणातील आवर्तन सोडण्यात आले होते. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहे.डिसेंबर महिन्यात नांदूरशिंगोटे, दोडी बुद्रूक, दोडी खुर्द व संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरातील पाझर तलावांत पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले होते. सुमारे पंधरा दिवस धरणातून आवर्तन सुरू होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन व धरणातून होणारा बेसुमार पाणी उपसा यामुळे धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. तसेच धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात धरणातील उद्भव विहीरीजवळील पाणीसाठा कमी झाल्याने चर घेऊन विहीरीकडे पाणी वळविण्यात येते.

टॅग्स :Nashikनाशिक