शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

भोजापूर धरणातून कालव्याद्वारे पूर पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 17:48 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातून पूर पाण्याचे आवर्तन शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कालव्याद्वारे सोडण्यात आले. पूर पाण्यामूळे परिसरातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांनी पूर पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाला सूचन्या केल्या होत्या.

ठळक मुद्देभोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आसून म्हाळूंगी नदी प्रवाहित झाली आहे.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातून पूर पाण्याचे आवर्तन शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कालव्याद्वारे सोडण्यात आले. पूर पाण्यामूळे परिसरातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांनी पूर पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाला सूचन्या केल्या होत्या.पश्चिम पट्टयात गेल्या आठवडाभर पाऊस पडल्याने म्हांळुगी नदीला पूर आला होता. म्हाळुंगी नदी प्रवाहित झाल्याने भोजापूर धरणात १६ आॅगस्ट पासून पाणी येण्यास सुरु वात झाली होती. त्यामुळे ३६० क्षमतेचे भोजापूर धरण गुरूवारी दुपारी पूर्ण क्षमतेने भरले होते. यावर्षी उशिरा धरण भरल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पूर पाणी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मनेगावसह १६ गावे व कणकोरीसह ५ गावे नळपाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. भोजापूर धरणाच्या पाण्यावर परिसाराचे शेती व्यवसाय अवलंबून आहे. धरण भरल्यामुळे शेतकरी वर्गात आंनद व्यक्त केला जात आहे.या परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून तालुक्याचा पूर्व भाग नेहमीच दुष्काळी परिस्थिती असतो त्यामूळे भोजापूर धरणाचे पूर पाणी या भागात गेल्यास सदर गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आसून म्हाळूंगी नदी प्रवाहित झाली आहे. भोजापूर धरणाच्या कालव्याद्वारे नांदूरशिंगोटे व दोडी परिसर या गावाच्या तलावांमध्ये पूरपाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी होती. कालव्यास पूरपाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे आमदार राजाभाऊ वाजे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. आमदार वाजे यांच्या मागणीचा विचार होऊन पाटबंधारे विभागाकडून पूरपाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी (दि.२५) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास भोजापूर धरणावरील गेट फिरवून पाणी कालव्याला सोडण्यात आले. याप्रंसगी जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, बाजार समितीचे संचालक अनिल सांगळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक बर्के, शाखा अभियंता बी. डब्ल्यु. बोडके, बी.के.आचट, नागेश शेळके ,रामदास सानप, प्रदीप मुंगसे, अरुण शेळके, किरण शेळके,किरण आव्हाड, योगेश शेळके, महादू शेळके, आदि यावेळी उपस्थित होते. नांदूर व दोडी या दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात येणार आहे. १०० ने क्युसेस कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.