शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
2
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
3
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
4
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
5
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
6
मयंतीची पँट नेहमी मी घातलो, आज तू का घातलीस? Live शोमध्ये गावस्करांनी विचारला मिश्किल प्रश्न, मग...  
7
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
8
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
9
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
10
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
11
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
12
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
13
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
14
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
15
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
16
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
17
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
18
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
19
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
20
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!

भिल्ल समाज संघटनेचा मोर्चा

By admin | Updated: August 10, 2014 02:01 IST

भिल्ल समाज संघटनेचा मोर्चा

 

नाशिक : धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण दिल्यास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशारा शनिवारी (दि.९) भिल्ल समाज संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाद्वारे आघाडी सरकारला देण्यात आला. यावेळी मोर्चाचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छोटेखानी सभेत होऊन संघटनेच्या नेत्यांची भाषणे झाली.दुपारी २ वाजेपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून भिल्ल समाज संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या दणका मोर्चास सुरुवात झाली. त्र्यंबक नाका, सीबीएसमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला. यावेळी भिल्ल समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन आघाडी सरकारने त्यांचे लाड पुरवू नये. नाहीतर आदिवासी समाज आघाडी सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीतून सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. धनगर समाज हा प्राचीन काळापासून राजसत्तेत जगत आला आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण देण्याची गरज नाही. आजही धनगर समाजातील व्यक्तींकडे कमीत कमी तीन ते चार लाखांची संपदा असते. ते सधन समाजातील आहेत. इतकेच नव्हे तर ज्यांनी घटना लिहिली आहे, त्या बाबासाहेब आंबेडकरांवरही धनगर समाजाने आरोप केले आहेत. त्यामुळे आदिवासी समाजातून धनगर समाजाला आरक्षण देता कामा नये. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य साईनाथ मोरे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पवनराजे सोनवणे, जळगाव जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांचीही भाषणे झाली. या मोर्चात संघटनेचे महासचिव किरण ठाकरे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष नितीन मोरे, अंकुश सोनवणे, बाळासाहेब बर्डे, रतन सोनवणे, अजित पवार, प्रदीप अहेर, विष्णू सोनवणे, संजय नवरे, नामदेव नवरे, बापू पवार, किरण मोरे, दत्तू पिंपळे, विजय तलवारे, श्रीराम माळी, संतोष निकम, मोतीराम सोनवणे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)