शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भिल्ल समाज संघटनेचा मोर्चा

By admin | Updated: August 10, 2014 02:01 IST

भिल्ल समाज संघटनेचा मोर्चा

 

नाशिक : धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण दिल्यास आघाडी सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशारा शनिवारी (दि.९) भिल्ल समाज संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाद्वारे आघाडी सरकारला देण्यात आला. यावेळी मोर्चाचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छोटेखानी सभेत होऊन संघटनेच्या नेत्यांची भाषणे झाली.दुपारी २ वाजेपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून भिल्ल समाज संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या दणका मोर्चास सुरुवात झाली. त्र्यंबक नाका, सीबीएसमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन धडकला. यावेळी भिल्ल समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन आघाडी सरकारने त्यांचे लाड पुरवू नये. नाहीतर आदिवासी समाज आघाडी सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीतून सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. धनगर समाज हा प्राचीन काळापासून राजसत्तेत जगत आला आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण देण्याची गरज नाही. आजही धनगर समाजातील व्यक्तींकडे कमीत कमी तीन ते चार लाखांची संपदा असते. ते सधन समाजातील आहेत. इतकेच नव्हे तर ज्यांनी घटना लिहिली आहे, त्या बाबासाहेब आंबेडकरांवरही धनगर समाजाने आरोप केले आहेत. त्यामुळे आदिवासी समाजातून धनगर समाजाला आरक्षण देता कामा नये. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य साईनाथ मोरे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पवनराजे सोनवणे, जळगाव जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांचीही भाषणे झाली. या मोर्चात संघटनेचे महासचिव किरण ठाकरे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष नितीन मोरे, अंकुश सोनवणे, बाळासाहेब बर्डे, रतन सोनवणे, अजित पवार, प्रदीप अहेर, विष्णू सोनवणे, संजय नवरे, नामदेव नवरे, बापू पवार, किरण मोरे, दत्तू पिंपळे, विजय तलवारे, श्रीराम माळी, संतोष निकम, मोतीराम सोनवणे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)