शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

राष्टवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी भाऊगर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:49 IST

राष्टवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्षांसह सहा जणांनी अर्ज दाखल केल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठीची चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेट्ये यांच्यासह अनेक दिग्गज असल्याने संभाव्य गटबाजी टाळण्यासाठी अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्याचा निर्णय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आहे.

नाशिक : राष्टवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्षांसह सहा जणांनी अर्ज दाखल केल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठीची चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेट्ये यांच्यासह अनेक दिग्गज असल्याने संभाव्य गटबाजी टाळण्यासाठी अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्याचा निर्णय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीअंतर्गत रविवारी राष्टÑवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष निवडीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. विद्यमान जिल्हाध्यक्षांसह राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेट्ये यांनीही जोरदार तयारी केल्यामुळे चुरस अधिक वाढली आहे. याबरोबरच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्टÑवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वाजे, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, कोंडाजीमामा आव्हाड आणि सचिन पिंगळे यांचीही नावे जिल्हाध्यक्षपदासाठी पुढे आली आहेत. जिल्हाध्यक्षपसाठी जोरदार फिल्ंिडग लावण्यात आल्यामुळे अनेक दावे, प्रतिदावे आणि तक्रारींचा सूरही इच्छुकांमध्ये उमटला. विद्यमान जिल्हाध्यक्षांविषयीदेखील मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्याचे समजते. तर एका गटाने ओबीसी चेहऱ्याला संधी देण्याबाबतचा युक्तिवाद केला. हा सारा घटनाक्रम आणि इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी यामुळे दोनदा  विचारविनीमय करूनही कोणत्याही एका नावावर एकमत होऊ शकले नाही. अखेर निवडणूक निरीक्षक अविनाश अधिक यांनी इच्छुकांच्या नावांवर प्रदेशमध्येच चर्चा होऊन प्रदेशपातळीवरून जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे जाहीर करून श्रेष्ठींकडून येणाºया नावाला सर्वांनी समर्थन द्यावे असा ठरावच केला.विद्यमान जिल्हाध्यक्षांविषयी तक्रारीविद्यमान जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी जिल्ह्यात विविध प्रश्नांवर वेळोवेळी रस्त्यावर उतरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतरही त्यांच्याविषयी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी निवडणूक निरीक्षकांकडे तक्रारी केल्याचे बोलले जात आहे.  त्यातच अनेक दिग्गज जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असून, काहींनी वरूनच मोर्चेबांधणी केल्यामुळे विद्यमान जिल्हाध्यक्ष पगार यांच्यापुढे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.  किंबहूना यंदा नवीन चेहºयाला संधी देण्याबाबतच सर्वसंमती झाल्याचेही समजते. त्यामुळे पगार यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस