शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

‘भारत बंद’चा नाशिकच्या बाजारपेठेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:26 IST

देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल- डिझेलच्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेससह देशभरातील सुमारे २० राजकीय पक्ष व संघटनांनी सोमवारी (दि.१०) केलेल्या ‘भारत बंद’चा फटका नाशिकच्या बाजारपेठेलाही मोठ्या प्रमाणात बसला.

नाशिक : देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल- डिझेलच्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेससह देशभरातील सुमारे २० राजकीय पक्ष व संघटनांनी सोमवारी (दि.१०) केलेल्या ‘भारत बंद’चा फटका नाशिकच्या बाजारपेठेलाही मोठ्या प्रमाणात बसला. नाशिक शहरासह उपनगरांमध्येही दुपारपर्यंत कडकडीट बंद पाळण्यात आल्याने जवळपास ५० टक्के उलाढाल ढप्प झाली.  नाशिकमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, सराफ बाजार, रविवार कारंजा, शालिमार परिसरात बाजारपेठेला काँग्रेसच्या बंदचा फटका बसला. त्याचप्रमाणे उपनगरांमध्येही अनेक दुकाने बंद राहिल्याने शहरातील जवळपास अडीचशे ते तीनशे कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज आर्थिक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना नागरिकांनी मखर सजावटीसह पूजेच्या साहित्याची खरेदी सुरू केलेली आहे. परंतु, सकाळपासूनच दळवणळाची साधने उपलब्ध नसल्याने बाजारपेठेत ग्राहकांचा ओघही ओसरल्याचे दिसून आले. त्यामुळे काही दुकानदारांनी सकाळपासून दुकाने उघडी ठेवूनही त्यांना ग्राहकच नसल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला. परंतु दुपारनंतर व्यवहार सुरू झाल्याने नाशिककरांनी सायंकाळी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढल्याने बाजारपेठेत व्यवहार सुरळीत झाले. मात्र अनेक ग्राहकांनी बंदमध्ये बाहेर पडण्याऐवजी आजची खरेदी उद्यावर ढकलल्याने अनेक व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली.सराफ बाजाराला ३० टक्के फटकाभारत बंदचा सराफ बाजाराला जवळपास २५ ते ३० टक्के फटका बसल्याचे दिसून आले. सराफ बाजारातील अनेक व्यावसायिकांनी दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली. त्यानंतरही ग्राहकांचा ओघ नेहमीसारखा नसल्याने सराफ बाजारातही नेहमीच्या तुलनेत शांतता दिसून आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण गणपतीसाठी सोने-चांदीचे मोदक, दुर्वाहार यांससह पूजेचे साहित्य खरेदी करीत असतात. परंतु, भारत बंदमुळे ग्राहकच नसल्याने नेहमीच्या तुलनेत ३० टक्के उलाढाल ठप्प झाल्याचे दिसून आले.किरकोळ  बाजारही प्रभावित‘भारत बंद’चा सर्वाधिक प्रभाव किरकोळ बाजारावर दिसून आला. बंददरम्यान मालवाहतूक आणि व्यावसायिक गोदामे खुली होती. त्यामुळे घाऊक व्यापारावर बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. परंतु, किरकोळ विक्रेत्यांना बंदमुळे दुपारपर्यंत दुकाने बंद करावी लागली, दुपारनंतर दुकाने उघडूनही नेहमीच्या  तुलनेत ग्राहकांचा ओघ  नसल्याने किरकोळ बाजारावर बंदमुळे सर्वाधिक झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदMNSमनसे