शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

‘भारत बंद’चा नाशिकच्या बाजारपेठेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:26 IST

देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल- डिझेलच्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेससह देशभरातील सुमारे २० राजकीय पक्ष व संघटनांनी सोमवारी (दि.१०) केलेल्या ‘भारत बंद’चा फटका नाशिकच्या बाजारपेठेलाही मोठ्या प्रमाणात बसला.

नाशिक : देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल- डिझेलच्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेससह देशभरातील सुमारे २० राजकीय पक्ष व संघटनांनी सोमवारी (दि.१०) केलेल्या ‘भारत बंद’चा फटका नाशिकच्या बाजारपेठेलाही मोठ्या प्रमाणात बसला. नाशिक शहरासह उपनगरांमध्येही दुपारपर्यंत कडकडीट बंद पाळण्यात आल्याने जवळपास ५० टक्के उलाढाल ढप्प झाली.  नाशिकमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, सराफ बाजार, रविवार कारंजा, शालिमार परिसरात बाजारपेठेला काँग्रेसच्या बंदचा फटका बसला. त्याचप्रमाणे उपनगरांमध्येही अनेक दुकाने बंद राहिल्याने शहरातील जवळपास अडीचशे ते तीनशे कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज आर्थिक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना नागरिकांनी मखर सजावटीसह पूजेच्या साहित्याची खरेदी सुरू केलेली आहे. परंतु, सकाळपासूनच दळवणळाची साधने उपलब्ध नसल्याने बाजारपेठेत ग्राहकांचा ओघही ओसरल्याचे दिसून आले. त्यामुळे काही दुकानदारांनी सकाळपासून दुकाने उघडी ठेवूनही त्यांना ग्राहकच नसल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला. परंतु दुपारनंतर व्यवहार सुरू झाल्याने नाशिककरांनी सायंकाळी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढल्याने बाजारपेठेत व्यवहार सुरळीत झाले. मात्र अनेक ग्राहकांनी बंदमध्ये बाहेर पडण्याऐवजी आजची खरेदी उद्यावर ढकलल्याने अनेक व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली.सराफ बाजाराला ३० टक्के फटकाभारत बंदचा सराफ बाजाराला जवळपास २५ ते ३० टक्के फटका बसल्याचे दिसून आले. सराफ बाजारातील अनेक व्यावसायिकांनी दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली. त्यानंतरही ग्राहकांचा ओघ नेहमीसारखा नसल्याने सराफ बाजारातही नेहमीच्या तुलनेत शांतता दिसून आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण गणपतीसाठी सोने-चांदीचे मोदक, दुर्वाहार यांससह पूजेचे साहित्य खरेदी करीत असतात. परंतु, भारत बंदमुळे ग्राहकच नसल्याने नेहमीच्या तुलनेत ३० टक्के उलाढाल ठप्प झाल्याचे दिसून आले.किरकोळ  बाजारही प्रभावित‘भारत बंद’चा सर्वाधिक प्रभाव किरकोळ बाजारावर दिसून आला. बंददरम्यान मालवाहतूक आणि व्यावसायिक गोदामे खुली होती. त्यामुळे घाऊक व्यापारावर बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. परंतु, किरकोळ विक्रेत्यांना बंदमुळे दुपारपर्यंत दुकाने बंद करावी लागली, दुपारनंतर दुकाने उघडूनही नेहमीच्या  तुलनेत ग्राहकांचा ओघ  नसल्याने किरकोळ बाजारावर बंदमुळे सर्वाधिक झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदMNSमनसे