शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भजन, कीर्तनातून घडते लोकप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:27 IST

पंढरीची वारी म्हणजे एक आचार धर्म आहे. आपल्या उपास्य दैवताचे नामस्मरण करीत असताना नित्य कर्मामध्ये वेळ काढून तीर्थक्षेत्री दर्शनासाठी अभिगमन करणे म्हणजे वारी होय. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर माउली यांनीदेखील पंढरपूरची वारी केल्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथात केल्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथात आढळतो.

पंढरीची वारी म्हणजे एक आचार धर्म आहे. आपल्या उपास्य दैवताचे नामस्मरण करीत असताना नित्य कर्मामध्ये वेळ काढून तीर्थक्षेत्री दर्शनासाठी अभिगमन करणे म्हणजे वारी होय. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर माउली यांनीदेखील पंढरपूरची वारी केल्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथात केल्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथात आढळतो. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्यानंतरदेखील सुमारे सातशे वर्षांपासून वारीचा हा उपक्रम निरंतर सुरूच आहे. संत निवृत्तिनाथ संस्थानचा विश्वस्त आणि पुजारी म्हणून कार्य करीत असताना इ.स.२००० पासून दरवर्षी मी पंढरीच्या वारीला जात आहे. हा एक अलौकिक अनुभव आहे. वारी सुरू असताना पालखीच्या प्रारंभापासून ते पंढरपूरपर्यंतच्या मार्गावर दिनक्रम ठरलेला असतो. त्यात कोणताही बदल होत नाही. मुक्कामाच्या ठिकाणी पोहचल्यावर पहाटेच वारकरी उठतात. प्रात:विधी आटोपल्यानंतर काकड आरती, भजन होते. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता पालखीचे प्रस्तान होते. सकाळी एखाद्या ठिकाणी नास्ता होतो. दुपारी वाटेत जेवण होते. पुन्हा मार्गक्रमण सुरू होते. प्रत्येकजण मुखाने हरिनाम म्हणत पायवाट चालत राहतो. पुढील मुक्कामाच्या ठिकाणी पोहचल्यावर सायंकाळी आरती होते. रात्री ७ वाजता कीर्तन आणि त्यानंतर प्रबोधनात्मक प्रवचन होते. काही ठिकाणी भजनाचा जागर होते. महाप्रसादानंतर रात्रीची विश्रांती असते. पुन्हा नव्याने दिनक्रम सुरू असतोे. ज्या गावाला पालखी, दिंडीसोबतचे वारकरी पोहचतात. तेथील लोकांचेही प्रबोधन व्हावे यासाठी कीर्तन, प्रवचन आणि लोकजनजागृतीचे कार्य करण्यात येते. तसेच रात्री भजन-कीर्तनामुळे वारकऱ्यांना शारीरिक श्रम जाणवत नाही. संतांच्या विचारामुळे मानसिक उभारी मिळते. वेदामध्ये कर्माला म्हणजे दैनंदिन कामाला उपास्यदैवत म्हटले आहे. पूर्वी वाहने नव्हती म्हणून पायी वारीची प्रथा होती. परंतु आता बस आणि अन्य वाहनांनीदेखील लोक वारीला जातात. काळानुरूप हा बदल झालेला आहे.पंढरपूर येण्यापूर्वी वाखारी येथे राज्यभरातून आलेल्या सर्व संतांच्या पालख्यांचा मेळा जमतो. संत निवृत्तिनाथ हे आद्यपीठ असल्याने संत त्र्यंबकेश्वर येथून झालेल्या पालखीच्या दर्शनासाठी अन्य दिंड्यांमधील वारकरीदेखील येतात.‘विठ्ठल माझी माय, विठ्ठल माझा बाप, विठ्ठल आमुचा सखा! अशी भावना प्रत्येक वारक-यांच्या ठायी आपल्याला दिसून येते. - जयंत महाराज गोसावी ,  (लेखक, संत निवृत्तिनाथ संस्थानचे पुजारी आहेत.)

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी