शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
2
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
3
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
4
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
5
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
6
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
7
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
8
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
9
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
10
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
11
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
12
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
13
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
14
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
15
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
16
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
18
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
19
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
20
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका

भजन, कीर्तनातून घडते लोकप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:27 IST

पंढरीची वारी म्हणजे एक आचार धर्म आहे. आपल्या उपास्य दैवताचे नामस्मरण करीत असताना नित्य कर्मामध्ये वेळ काढून तीर्थक्षेत्री दर्शनासाठी अभिगमन करणे म्हणजे वारी होय. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर माउली यांनीदेखील पंढरपूरची वारी केल्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथात केल्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथात आढळतो.

पंढरीची वारी म्हणजे एक आचार धर्म आहे. आपल्या उपास्य दैवताचे नामस्मरण करीत असताना नित्य कर्मामध्ये वेळ काढून तीर्थक्षेत्री दर्शनासाठी अभिगमन करणे म्हणजे वारी होय. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर माउली यांनीदेखील पंढरपूरची वारी केल्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथात केल्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथात आढळतो. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या समाधी सोहळ्यानंतरदेखील सुमारे सातशे वर्षांपासून वारीचा हा उपक्रम निरंतर सुरूच आहे. संत निवृत्तिनाथ संस्थानचा विश्वस्त आणि पुजारी म्हणून कार्य करीत असताना इ.स.२००० पासून दरवर्षी मी पंढरीच्या वारीला जात आहे. हा एक अलौकिक अनुभव आहे. वारी सुरू असताना पालखीच्या प्रारंभापासून ते पंढरपूरपर्यंतच्या मार्गावर दिनक्रम ठरलेला असतो. त्यात कोणताही बदल होत नाही. मुक्कामाच्या ठिकाणी पोहचल्यावर पहाटेच वारकरी उठतात. प्रात:विधी आटोपल्यानंतर काकड आरती, भजन होते. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता पालखीचे प्रस्तान होते. सकाळी एखाद्या ठिकाणी नास्ता होतो. दुपारी वाटेत जेवण होते. पुन्हा मार्गक्रमण सुरू होते. प्रत्येकजण मुखाने हरिनाम म्हणत पायवाट चालत राहतो. पुढील मुक्कामाच्या ठिकाणी पोहचल्यावर सायंकाळी आरती होते. रात्री ७ वाजता कीर्तन आणि त्यानंतर प्रबोधनात्मक प्रवचन होते. काही ठिकाणी भजनाचा जागर होते. महाप्रसादानंतर रात्रीची विश्रांती असते. पुन्हा नव्याने दिनक्रम सुरू असतोे. ज्या गावाला पालखी, दिंडीसोबतचे वारकरी पोहचतात. तेथील लोकांचेही प्रबोधन व्हावे यासाठी कीर्तन, प्रवचन आणि लोकजनजागृतीचे कार्य करण्यात येते. तसेच रात्री भजन-कीर्तनामुळे वारकऱ्यांना शारीरिक श्रम जाणवत नाही. संतांच्या विचारामुळे मानसिक उभारी मिळते. वेदामध्ये कर्माला म्हणजे दैनंदिन कामाला उपास्यदैवत म्हटले आहे. पूर्वी वाहने नव्हती म्हणून पायी वारीची प्रथा होती. परंतु आता बस आणि अन्य वाहनांनीदेखील लोक वारीला जातात. काळानुरूप हा बदल झालेला आहे.पंढरपूर येण्यापूर्वी वाखारी येथे राज्यभरातून आलेल्या सर्व संतांच्या पालख्यांचा मेळा जमतो. संत निवृत्तिनाथ हे आद्यपीठ असल्याने संत त्र्यंबकेश्वर येथून झालेल्या पालखीच्या दर्शनासाठी अन्य दिंड्यांमधील वारकरीदेखील येतात.‘विठ्ठल माझी माय, विठ्ठल माझा बाप, विठ्ठल आमुचा सखा! अशी भावना प्रत्येक वारक-यांच्या ठायी आपल्याला दिसून येते. - जयंत महाराज गोसावी ,  (लेखक, संत निवृत्तिनाथ संस्थानचे पुजारी आहेत.)

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी