शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे भगूर-नानेगाव रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:46 IST

लष्कराच्या विजयनगर येथील संरक्षक भिंतीमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वाहतूक सुरू असलेला भगूर-नानेगाव रस्ता बंद करण्याच्या भूमिकेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

देवळाली कॅम्प : लष्कराच्या विजयनगर येथील संरक्षक भिंतीमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वाहतूक सुरू असलेला भगूर-नानेगाव रस्ता बंद करण्याच्या भूमिकेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.लष्कराच्या संरक्षिक भिंतीमुळे रस्ता बंद होण्यामुळे विद्यार्थी, कामगार वर्गासह शेतमाल वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होणार असून, नानेगाव ग्रामस्थांना शेतमाल देवळाली कॅम्प-भगूरला आणण्यासाठी शिंदे-पळसे नाहीतर दोनवाडे-राहुरी मार्गे लांबचा प्रवास करून जावे लागणार आहे. महाराष्टÑ शासनाकडून गावागावांना जोडणारे शिवरस्ते जोडण्याची उपाययोजना असताना स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वीपासून रस्ताच बंद करण्याच्या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भगूर-नानेगाव रस्ता बंद करण्याच्या लष्कराच्या भूमिकेविरुद्ध लष्करी अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर या रस्त्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता. स्थानिक पातळीवर कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या माध्यमातून लष्कर व ग्रामस्थ यांच्या प्रश्नांवर तोडगा काढत लष्करी हद्द व रेल्वे यादरम्यान पंधरा-वीस फुटांचा रस्ता कॅन्टोन्मेंट बोर्डाने करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सहा महिन्यांनंतर रस्त्याचे आश्वासन सर्वच अधिकारी विसरल्याने त्या रस्त्याच्या जागेवर संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले आहे.भगूर-नानेगांव रस्ता बंदबाबत नानेगाव ग्रामस्थांनी रविवारी ग्रामस्थांची बैठक घेऊन रस्त्याच्या मुद्द्याबाबत लष्करी अधिकाºयांची भेट घेण्याचे नियोजित केले आहे.पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे बाधीत होणाºया नानेगावाला आता भगूरहून होणाºया वाहतुकीचा रस्ताच लष्करी प्रशासनामुळे बंद होणार आणि ‘इंग्रज बरे की अच्छे दिन चांगले’ अशी मनस्तापाची वेळ नानेगाव ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे.वाहतूक इतरत्र मार्गस्थ करावी लागणारभगूरहून शिंदे-पळसेला जाणारा नानेगाव मार्गे रस्ता या लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे बंद होणार असून, भविष्यकाळात भगूर-इगतपुरीकडून शिंदे, पळसे, एकलहरा आदी गावांकडे जाणारा रस्ताच बंद होणार असल्यामुळे वाहतुकीची मोठी गर्दी नाशिकरोड मार्गे मार्गस्थ करावी लागणार आहे. ग्रामीण भागात भगूरहून नानेगाव, शिंदे, पळसे या गावांना जोडणारा मार्ग बंद झाला तर सध्या बंद असलेल्या नाशिक साखर कारखान्यालाही ऊस वाहतुकीसाठी मोठा फटका बसणार आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिक