शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे भगूर-नानेगाव रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:46 IST

लष्कराच्या विजयनगर येथील संरक्षक भिंतीमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वाहतूक सुरू असलेला भगूर-नानेगाव रस्ता बंद करण्याच्या भूमिकेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

देवळाली कॅम्प : लष्कराच्या विजयनगर येथील संरक्षक भिंतीमुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून वाहतूक सुरू असलेला भगूर-नानेगाव रस्ता बंद करण्याच्या भूमिकेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.लष्कराच्या संरक्षिक भिंतीमुळे रस्ता बंद होण्यामुळे विद्यार्थी, कामगार वर्गासह शेतमाल वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होणार असून, नानेगाव ग्रामस्थांना शेतमाल देवळाली कॅम्प-भगूरला आणण्यासाठी शिंदे-पळसे नाहीतर दोनवाडे-राहुरी मार्गे लांबचा प्रवास करून जावे लागणार आहे. महाराष्टÑ शासनाकडून गावागावांना जोडणारे शिवरस्ते जोडण्याची उपाययोजना असताना स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वीपासून रस्ताच बंद करण्याच्या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भगूर-नानेगाव रस्ता बंद करण्याच्या लष्कराच्या भूमिकेविरुद्ध लष्करी अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर या रस्त्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता. स्थानिक पातळीवर कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या माध्यमातून लष्कर व ग्रामस्थ यांच्या प्रश्नांवर तोडगा काढत लष्करी हद्द व रेल्वे यादरम्यान पंधरा-वीस फुटांचा रस्ता कॅन्टोन्मेंट बोर्डाने करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सहा महिन्यांनंतर रस्त्याचे आश्वासन सर्वच अधिकारी विसरल्याने त्या रस्त्याच्या जागेवर संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले आहे.भगूर-नानेगांव रस्ता बंदबाबत नानेगाव ग्रामस्थांनी रविवारी ग्रामस्थांची बैठक घेऊन रस्त्याच्या मुद्द्याबाबत लष्करी अधिकाºयांची भेट घेण्याचे नियोजित केले आहे.पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे बाधीत होणाºया नानेगावाला आता भगूरहून होणाºया वाहतुकीचा रस्ताच लष्करी प्रशासनामुळे बंद होणार आणि ‘इंग्रज बरे की अच्छे दिन चांगले’ अशी मनस्तापाची वेळ नानेगाव ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे.वाहतूक इतरत्र मार्गस्थ करावी लागणारभगूरहून शिंदे-पळसेला जाणारा नानेगाव मार्गे रस्ता या लष्कराच्या संरक्षक भिंतीमुळे बंद होणार असून, भविष्यकाळात भगूर-इगतपुरीकडून शिंदे, पळसे, एकलहरा आदी गावांकडे जाणारा रस्ताच बंद होणार असल्यामुळे वाहतुकीची मोठी गर्दी नाशिकरोड मार्गे मार्गस्थ करावी लागणार आहे. ग्रामीण भागात भगूरहून नानेगाव, शिंदे, पळसे या गावांना जोडणारा मार्ग बंद झाला तर सध्या बंद असलेल्या नाशिक साखर कारखान्यालाही ऊस वाहतुकीसाठी मोठा फटका बसणार आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिक