शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

रुग्णालयासाठी भाभानगरचीच जागा सुयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:42 IST

शहर विकास नियंत्रण नियमावलीच्या अधिन राहून आणि दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या वाहनतळाचा विचार करूनच भाभानगर येथील जागेत शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. सदर जागा मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि रुग्णालयासाठी लागणारी जागाही पुरेशी आहे. त्यामुळे स्त्री रुग्णालयासाठी भाभानगरचीच जागा सुयोग्य असल्याची स्पष्टोक्ती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.

नाशिक : शहर विकास नियंत्रण नियमावलीच्या अधिन राहून आणि दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या वाहनतळाचा विचार करूनच भाभानगर येथील जागेत शंभर खाटांचे स्त्री रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. सदर जागा मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि रुग्णालयासाठी लागणारी जागाही पुरेशी आहे. त्यामुळे स्त्री रुग्णालयासाठी भाभानगरचीच जागा सुयोग्य असल्याची स्पष्टोक्ती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे. दरम्यान, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच गेल्या चार वर्षांपासून सदरचे रुग्णालय उभे राहण्यास विलंब झालेला आहे. त्यामुळे या रुग्णालयाबाबत कोणीही राजकारण करू नये, असा सल्लाही फरांदे यांनी दिला आहे.  स्त्री रुग्णालयाच्या जागेवरून आजी-माजी आमदार आमनेसामने उभे ठाकले आहे. माजी आमदार वसंत गिते व उपमहापौर प्रथमेश गिते यांनी रुग्णालयाला उघडपणे विरोध दर्शविला तर प्रभागातील नागरिकांनीही एकत्र येत जनहित याचिका दाखल करण्याचा पवित्रा घेतला. या साºया घटना-घडामोडींनंतर आमदार देवयानी फरांदे यांनी शनिवारी (दि.४) पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. फरांदे यांनी सांगितले, भाभानगरची जागा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि हाकेच्या अंतरावर बसस्थानके आहेत. परिसरातील महिलांना सदर रुग्णालय दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे बनणार आहे. बिटको रुग्णालय व शासकीय रुग्णालयात होणाºया गर्दीमुळे सामान्य कुटुंबातील महिलांना उपचार मिळण्यात गैरसोयीचे होते. त्यामुळे सदर शंभर खाटांचे रुग्णालय महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. शंभर खाटांच्या रुग्णालयाची निविदाप्रक्रिया व कार्यादेश होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. ...तर महिलाशक्ती रस्त्यावर उतरेल ४सामान्य गोरगरीब महिलांसाठी होणाºया या रुग्णालयाला कुणी विरोध करत असेल तर महिलाशक्ती रस्त्यावर उतरेल, असा इशाराही फरांदे यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून आपण या प्रकरणात संयम बाळगून आहे. भाजपात शिस्तीला महत्त्व दिले जाते. अन्यथा मलाही आक्रमक होता आले असते. परंतु, कुणीही यात राजकारण आणू नये. जनतेसाठीच सदर प्रकल्प राबविला जात असल्याने त्यांच्या बाजूने उभे राहावे, असा सल्लाही फरांदे यांनी दिला.