शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
3
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
4
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
5
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
6
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
7
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
8
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
9
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
10
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
11
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
12
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
13
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
14
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
15
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
16
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
17
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
तुमच्याकडे असलेलं १० रूपयांचं नाणं खरं की खोटं?; RBI नं सांगितलं सत्य, वाचा काय आहे प्रकार?
20
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

उद्योजकांनो खबरदार! झाडे लावाल तर..

By admin | Updated: July 23, 2014 00:29 IST

.महापालिकेने लादल्या अटी : पर्यावरणप्रेमींची परीक्षा; ‘भीक नको, कुत्रा आवर’ म्हणण्याची आली वेळ

नाशिक : पालिकेची आर्थिक बचत करण्यासाठी वृक्षलागवडीची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्याचा प्रयत्न उद्योजकांनी केला खरा; परंतु त्यामुळे प्रशासनाने काढलेल्या अडीच कोटींच्या निविदा रद्द करणे अधिकाऱ्यांच्या जिवावर आले आहे. त्यामुळेच की काय, परंतु प्रशासनाने ‘निमा’समोर अशा काही अटी घातल्या आहेत, की त्यामुळे ‘भीक नको पण कुत्रे आवर’ म्हणण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे.महापालिकेची वृक्षलागवड हा वादाचा विषय आहे. आत्तापर्यंत किती झाडे लावली आणि किती वाचली याचा हिशेब केला तर त्याच्या फाईली पालिकेत सापडल्या तरी खूप झाले अशी अवस्था आहे. त्यातच पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना, अडीच कोटी रुपये खर्च करून अवघी बारा हजार झाडे लावण्यासाठी निविदा मागविल्यानंतर उद्योजकांनी पालिकेची बचत करण्याचे ठरविले. ‘निमा’ या उद्योजकांंच्या संघटनेने महापौरांची भेट घेऊन बारा हजार झाडे लावण्याची तयारी दर्शविली, तर महापौरांनीच कशासाठी हा उटारेटा, असा प्रश्न केला. त्यामुळे निमाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त संजीवकुमार यांची भेट घेतली. त्यांनी उत्साह दाखविला; परंतु झारीतील शुक्राचार्यांनी या उद्योजकांना अनेक प्रकारे परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. वृक्षतोडीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, त्यासाठी महापालिकेनेच अडीच कोटी रुपये खर्च करणे कसे आवश्यक आहे, असे सांगितले. उच्च न्यायालयात प्रतिवादी होऊन प्रतिज्ञापत्रक सादर करा, असे बजावले. उद्योजक त्यालाही तयार झाले. त्यांनी पालिकेला पत्र दिले. परंतु आता अटी-शर्तींचा घोळ घालून उद्योजकांना पळवण्याची तयारी सुरू आहे.वृक्षलागवडीसाठी पालिकेच्या वतीने उद्योजकांना असा काही करारनामा देण्यात आला आहे की त्यांनी वृक्षलागवडीची हिंमतच करू नये. वृक्षलागवडीचा सर्व खर्च उद्योजकांनी करायचा असून, त्यांना पालिकेकडून कोणत्याही प्रकारे मोबदला मिळणार नाही. बारा हजार झाडे लावण्याचे काम अर्धवट ठेवले तर पालिका निमावर कारवाई करणार असून, ती मान्य करावी लागेल, असे बजावण्यात आले आहे. वृक्षसंवर्धन करताना एखादे झाड मृत झाले तर तत्काळ तेवढ्याच उंचीचे झाड लावावे लागणार आहे. तसेच गॅप फिलिंगचे काम आठ दिवसांत करावे लागेल, कामाची जागा महापालिका हद्दीत कोठेही असू शकेल... अशा तब्बल २० अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालिकेला दातृत्वाच्या भूमिकेतून पुढे आलेल्या उद्योजकांना परावृत्त करायचे आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.