शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहन उद्योग केव्हाही बंद पडू शकतो...! चीनने रेअर अर्थ मेटल रोखले, प्रकरण मोदींपर्यंत पोहोचले
2
"राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक, २०२४-२५ मध्ये देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के मराहाराष्ट्रात’’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती 
3
पाकिस्तानी खेळाडूने इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचा केला अपमान, निवृत्तीबद्दल केलं 'हे' विधान
4
'हा राष्ट्रीय विजय, यात सर्वांचे योगदान', ऑपरेशन सिंदूरबाबत एअर चीफ मार्शल यांचे मोठे वक्तव्य
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे हाफिज सईदच्या मुलाला भरली धडकी! म्हणतोय "मला सोडा,मी काहीच केलं नाहीये..."
6
Homeguard Bharti: होमगार्ड भरतीसाठी फिजिकल टेस्ट देताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
'ऑपरेशन सिंदूर अजून संपले नाही, पाकिस्तान...', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकला थेट इशारा
8
काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!
9
अकराव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; गुंतवणूकदारांची झोळी भरणार का ही मल्टीबॅगर कंपनी?
10
Astro Tips: व्यवसाय करावासा वाटतोय, पण जमेल का ही मनात शंका? २० सेकंदात मिळेल उत्तर!
11
Swami Samartha: स्वामींची मूर्ती घरात किंवा देवघरात ठेवणार असाल तर आधी 'हे' नियम वाचा!
12
ऑफिसमधील महिला पतीला म्हणाली 'बेबी', ऐकताच हायपर झाली पत्नी! भर सोसायटीत हाय व्हॉल्टेज ड्रामा; पाहा व्हिडीओ
13
आरबीआयची 'आर्थिक' ताकद वाढली! सोन्याचा साठा विक्रमी पातळीवर, बँकेच्या तिजोरीत काय-काय आहे?
14
देशातील ४९ जिल्ह्यांत जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक, भारताची लोकसंख्या घटण्याच्या मार्गावर? 
15
उच्चांकी स्तरावरुन ६०० अंकांनी का घसरला सेन्सेक्स, काय आहेत या घसरणीची कारणं?
16
हगवणेंच्या बैलासमोर नृत्य केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर आता गौतमी पाटीलची प्रतिक्रिया, म्हणाली...
17
IND vs AUS मालिकेचे वेळापत्रक BCCIने केलं जाहीर, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये रंगणार 'रनसंग्राम'
18
Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलकडे मोठा पराक्रम करण्याची संधी, फक्त तीन विकेट्स दूर!
19
प्रेमासाठी काय पण! ग्रॅज्युएट तरुणीने केलं आठवी नापास मुलाशी लग्न; म्हणाली, "माझी मर्जी..."
20
पुणेकरांनो सावध व्हा...! AI थेट पावती फाडणार; मागचा पुढचा विचार सोडा... वाहतूक नियम पाळा...

उद्योजकांनो खबरदार! झाडे लावाल तर..

By admin | Updated: July 23, 2014 00:29 IST

.महापालिकेने लादल्या अटी : पर्यावरणप्रेमींची परीक्षा; ‘भीक नको, कुत्रा आवर’ म्हणण्याची आली वेळ

नाशिक : पालिकेची आर्थिक बचत करण्यासाठी वृक्षलागवडीची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्याचा प्रयत्न उद्योजकांनी केला खरा; परंतु त्यामुळे प्रशासनाने काढलेल्या अडीच कोटींच्या निविदा रद्द करणे अधिकाऱ्यांच्या जिवावर आले आहे. त्यामुळेच की काय, परंतु प्रशासनाने ‘निमा’समोर अशा काही अटी घातल्या आहेत, की त्यामुळे ‘भीक नको पण कुत्रे आवर’ म्हणण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे.महापालिकेची वृक्षलागवड हा वादाचा विषय आहे. आत्तापर्यंत किती झाडे लावली आणि किती वाचली याचा हिशेब केला तर त्याच्या फाईली पालिकेत सापडल्या तरी खूप झाले अशी अवस्था आहे. त्यातच पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना, अडीच कोटी रुपये खर्च करून अवघी बारा हजार झाडे लावण्यासाठी निविदा मागविल्यानंतर उद्योजकांनी पालिकेची बचत करण्याचे ठरविले. ‘निमा’ या उद्योजकांंच्या संघटनेने महापौरांची भेट घेऊन बारा हजार झाडे लावण्याची तयारी दर्शविली, तर महापौरांनीच कशासाठी हा उटारेटा, असा प्रश्न केला. त्यामुळे निमाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त संजीवकुमार यांची भेट घेतली. त्यांनी उत्साह दाखविला; परंतु झारीतील शुक्राचार्यांनी या उद्योजकांना अनेक प्रकारे परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. वृक्षतोडीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, त्यासाठी महापालिकेनेच अडीच कोटी रुपये खर्च करणे कसे आवश्यक आहे, असे सांगितले. उच्च न्यायालयात प्रतिवादी होऊन प्रतिज्ञापत्रक सादर करा, असे बजावले. उद्योजक त्यालाही तयार झाले. त्यांनी पालिकेला पत्र दिले. परंतु आता अटी-शर्तींचा घोळ घालून उद्योजकांना पळवण्याची तयारी सुरू आहे.वृक्षलागवडीसाठी पालिकेच्या वतीने उद्योजकांना असा काही करारनामा देण्यात आला आहे की त्यांनी वृक्षलागवडीची हिंमतच करू नये. वृक्षलागवडीचा सर्व खर्च उद्योजकांनी करायचा असून, त्यांना पालिकेकडून कोणत्याही प्रकारे मोबदला मिळणार नाही. बारा हजार झाडे लावण्याचे काम अर्धवट ठेवले तर पालिका निमावर कारवाई करणार असून, ती मान्य करावी लागेल, असे बजावण्यात आले आहे. वृक्षसंवर्धन करताना एखादे झाड मृत झाले तर तत्काळ तेवढ्याच उंचीचे झाड लावावे लागणार आहे. तसेच गॅप फिलिंगचे काम आठ दिवसांत करावे लागेल, कामाची जागा महापालिका हद्दीत कोठेही असू शकेल... अशा तब्बल २० अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालिकेला दातृत्वाच्या भूमिकेतून पुढे आलेल्या उद्योजकांना परावृत्त करायचे आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.