शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शोकसभा : विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना भाई वैद्य यांच्याकडून मूल्याची जपणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:06 IST

नाशिक : राष्टÑसेवा, समाजवाद अशी मूल्येच जगाला तारू शकतात. आपल्या कृतीतून, विचारांतून ती मूल्ये सातत्याने इतरांना देण्याचे काम भाई वैद्य यांनी केले.

ठळक मुद्देहुतात्मा स्मारकामध्ये शोकसभा पार पडलीवैद्य यांनी ‘आमच्या काळात’ असा शब्द कधीच वापरला नाही

नाशिक : राष्टÑसेवा, समाजवाद अशी मूल्येच जगाला तारू शकतात. आपल्या कृतीतून, विचारांतून ती मूल्ये सातत्याने इतरांना देण्याचे काम भाई वैद्य यांनी केले. ती मूल्ये आजच्या पिढीने स्वत:त रुजवून देशाला मारक गोष्टी दूर ठेवत आदर्श नागरिक म्हणून कायम वर्तन ठेवले तरच ती भाई वैद्य यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या. शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी हुतात्मा स्मारकामध्ये शोकसभा पार पडली. यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणामधून भार्इंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शांताराम चव्हाण म्हणाले, भार्इंचे राजकीय, सामाजिक जीवनातील योगदान महत्त्वाचे होते. ते लहानातल्या लहान कार्यकर्त्याची दखल घेत. माणसे जोडण्याचे त्यांचे कसब अफलातून असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी सांगितले की, शेवटच्या क्षणापर्यंत ते समाजात लढत राहिले. त्यांचे आयुष्य लढायांनी भरले होते. स्वातंत्र्य लढाई, गोवा स्वातंत्र्यलढा, मराठवाडा मुक्ती मोर्चा, आणीबाणी आदी अनेक लढाया ते लढले. या लढाया ते स्वत: नेते या नात्याने आणि कार्यकर्त्यांची फौज निर्माण करण्यासाठीही लढत होते. प्रत्येक पिढीशी ते मनापासून समरस होत. मनमोकळेपणा हा त्यांचा गुणधर्मच होता. महाराष्टÑाच्या हातात विचारांचे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे हत्यार देण्याचे काम त्यांनी केले. भाई वैद्य यांनी ‘आमच्या काळात’ असा शब्द कधीच वापरला नाही. त्यांनी कायम विद्यमान, वर्तमान पिढीला भेडसावणारे प्रश्न मांडले. समाजातील सर्व प्रेरणास्थानांवर प्रेम करणारे भार्इंचे व्यक्तिमत्त्व दुर्मीळ असल्याचे कांबळे यांनी अधोरेखित केले. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी सांगितले की, आणीबाणीच्या काळात महापौर असूनही भाई भूमिगत राहून लढा देत होते. त्या काळात ते ज्या-ज्या कार्यकर्त्याच्या घरात राहायचे, त्या-त्या घरातील सदस्यांचे ते प्रबोधन करत. भार्इंनी समाजवादी प्राध्यापक, शिक्षक संघटना काढली होती. त्यांना संगीताची आवड होती. जीवनातील सर्व कलांवर प्रेम करणारा हा माणूस अफलातून होता, अशा शब्दांत त्यांनी भार्इंच्या आठवणींना उजाळा दिला. सभेत राकेश पवार, राम गायटे आदी विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते.