शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

शोकसभा : विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना भाई वैद्य यांच्याकडून मूल्याची जपणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:06 IST

नाशिक : राष्टÑसेवा, समाजवाद अशी मूल्येच जगाला तारू शकतात. आपल्या कृतीतून, विचारांतून ती मूल्ये सातत्याने इतरांना देण्याचे काम भाई वैद्य यांनी केले.

ठळक मुद्देहुतात्मा स्मारकामध्ये शोकसभा पार पडलीवैद्य यांनी ‘आमच्या काळात’ असा शब्द कधीच वापरला नाही

नाशिक : राष्टÑसेवा, समाजवाद अशी मूल्येच जगाला तारू शकतात. आपल्या कृतीतून, विचारांतून ती मूल्ये सातत्याने इतरांना देण्याचे काम भाई वैद्य यांनी केले. ती मूल्ये आजच्या पिढीने स्वत:त रुजवून देशाला मारक गोष्टी दूर ठेवत आदर्श नागरिक म्हणून कायम वर्तन ठेवले तरच ती भाई वैद्य यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या. शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी हुतात्मा स्मारकामध्ये शोकसभा पार पडली. यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणामधून भार्इंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शांताराम चव्हाण म्हणाले, भार्इंचे राजकीय, सामाजिक जीवनातील योगदान महत्त्वाचे होते. ते लहानातल्या लहान कार्यकर्त्याची दखल घेत. माणसे जोडण्याचे त्यांचे कसब अफलातून असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी सांगितले की, शेवटच्या क्षणापर्यंत ते समाजात लढत राहिले. त्यांचे आयुष्य लढायांनी भरले होते. स्वातंत्र्य लढाई, गोवा स्वातंत्र्यलढा, मराठवाडा मुक्ती मोर्चा, आणीबाणी आदी अनेक लढाया ते लढले. या लढाया ते स्वत: नेते या नात्याने आणि कार्यकर्त्यांची फौज निर्माण करण्यासाठीही लढत होते. प्रत्येक पिढीशी ते मनापासून समरस होत. मनमोकळेपणा हा त्यांचा गुणधर्मच होता. महाराष्टÑाच्या हातात विचारांचे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे हत्यार देण्याचे काम त्यांनी केले. भाई वैद्य यांनी ‘आमच्या काळात’ असा शब्द कधीच वापरला नाही. त्यांनी कायम विद्यमान, वर्तमान पिढीला भेडसावणारे प्रश्न मांडले. समाजातील सर्व प्रेरणास्थानांवर प्रेम करणारे भार्इंचे व्यक्तिमत्त्व दुर्मीळ असल्याचे कांबळे यांनी अधोरेखित केले. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी सांगितले की, आणीबाणीच्या काळात महापौर असूनही भाई भूमिगत राहून लढा देत होते. त्या काळात ते ज्या-ज्या कार्यकर्त्याच्या घरात राहायचे, त्या-त्या घरातील सदस्यांचे ते प्रबोधन करत. भार्इंनी समाजवादी प्राध्यापक, शिक्षक संघटना काढली होती. त्यांना संगीताची आवड होती. जीवनातील सर्व कलांवर प्रेम करणारा हा माणूस अफलातून होता, अशा शब्दांत त्यांनी भार्इंच्या आठवणींना उजाळा दिला. सभेत राकेश पवार, राम गायटे आदी विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते.