शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

नीतिमान वकिलांवर विश्वास ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:59 IST

सध्या भारत एका वेगळ्याच स्थितीतून वाटचाल करत आहे. या स्थितीचा परिणाम देशातील सर्वच क्षेत्रात व समाजातील विविध घटकांवर झालेला दिसून येतो. वकिली व्यवसायदेखील याला अपवाद राहिलेला नाही. त्यामुळे ७० टक्के वकिलांनी जरी नीतिमत्ता, व्यावसायिक मूल्ये सोडली असली तरी ३० टक्के वकील निश्चितपणे या मूल्यांची जोपासना करत आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहेत, त्यामुळे लोकांनी त्यांच्यावरील विश्वास नक्कीच वृद्धिंगत करायला हवा, असे मत ज्येष्ठ वकील दौलतराव घुमरे यांनी मुलाखतीतून व्यक्त केले.

ठळक मुद्देदौलतराव घुमरे ‘संवाद’च्या प्रकट मुलाखतीत व्यक्त केले मत

नाशिक : सध्या भारत एका वेगळ्याच स्थितीतून वाटचाल करत आहे. या स्थितीचा परिणाम देशातील सर्वच क्षेत्रात व समाजातील विविध घटकांवर झालेला दिसून येतो. वकिली व्यवसायदेखील याला अपवाद राहिलेला नाही. त्यामुळे ७० टक्के वकिलांनी जरी नीतिमत्ता, व्यावसायिक मूल्ये सोडली असली तरी ३० टक्के वकील निश्चितपणे या मूल्यांची जोपासना करत आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहेत, त्यामुळे लोकांनी त्यांच्यावरील विश्वास नक्कीच वृद्धिंगत करायला हवा, असे मत ज्येष्ठ वकील दौलतराव घुमरे यांनी मुलाखतीतून व्यक्त केले.संवाद संस्थेच्या वतीने घुमरे यांच्या मुलाखतीचे कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर संवादचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब गुंजाळ, अ‍ॅड. नितीन ठाकरे, अ‍ॅड. क. का. घुगे हे उपस्थित होते. यावेळी घुमरे यांनी अ‍ॅड. मिलिंद चिंधडे, डॉ. शंकर बोºहाडे यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देत बालपणाच्या आठवणी, शिक्षणाच्या वाटचालीपासून देशात झालेले राजकीय-सामाजिक बदल, विविध राष्टÑीय नेत्यांचे विचार अशा चौफेर पद्धतीने आपले विचार मांडले.यावेळी घुमरे म्हणाले, व्यापारीवृत्तीमुळे देशातील सर्वच क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात नीतिमत्तेची मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत. व्यापारी दृष्टिकोनचा पगडा सर्वच क्षेत्रात वाढत असताना वकिली क्षेत्रही त्यापासून सुरक्षित राहू शकले नाही; मात्र या देशातील लोक वेडे नाहीत की ते दररोज न्यायालयाचा उंबरा ओलांडतात. त्यांना खात्री असते वकील आपल्याला न्याय मिळवून देईल. गरिबीमुळे बालपणात अन्यायाविरुद्ध चीड येत होती. गांधीजी देशाची उभारणी करत असताना त्यांच्याविषयी काढल्या जाणाऱ्या वाईट उद्गारामुळे चीड निर्माण होत होती. त्यावेळी तरुणांना सोबत घेत मोर्चा काढला असता उदोजी वसतिगृहातून बाहेरचा रस्ता दाखविला गेला.सावरकर कोणालाही समजले नाहीसावरकर यांची विचारधारा, देशप्रेम, राष्टÑभक्ती भाजप, राष्टÑीय स्वयंसेवक संघासह कोणालाही समजलेली नाही, अशी खंतही घुमरे यांनी यावेळी बोलून दाखविली. सावरकरांच्या सभेला दोन तास उपस्थित राहिल्यानंतर त्यांच्या विचारांनी माझ्यावर पडलेल्या प्रभावातून मी आजही बाहेर येऊ शकलेलो नाही.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक