शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

जिल्हाभरात पोषण अभियानास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:27 IST

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शनिवारपासून (दि.१) पोषण अभियानास सुरुवात झाली असून, पोषण अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतर्फे विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. या अभियानात १ ते ३० सप्टेंबर या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीत विविध विभागांच्या सहभागातून अशाप्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजनजागृती : १ ते ३० सप्टेंबरदरम्यान मोहीम

नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शनिवारपासून (दि.१) पोषण अभियानास सुरुवात झाली असून, पोषण अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतर्फे विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. या अभियानात १ ते ३० सप्टेंबर या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीत विविध विभागांच्या सहभागातून अशाप्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी पोषण आहार अभियान राबविण्यात येत असून, शनिवारी सर्व तालुक्यांमध्ये या अभियानानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. तालुकास्तरीय कार्यशाळा, अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांची फेरी, पोषण आहाराबाबत प्रदर्शन आदी उपक्रम राबवून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.या अभियानात पोषण आहार व त्याचे महत्त्व, स्तनपान, अनेमिया आजार, वैयक्तित स्वच्छता आदी विषयांवर अधिक लक्ष देण्यात येणार असून, गृहभेटीद्वारे पोषण आहार, चांगल्या आरोग्याच्या सवयी आदी विविध विषयांचे महत्त्व या अभियानाच्या माध्यामातून पटवून देण्यात येणार आहे.दि. १ सप्टेंबरपासून संपूर्ण महिनाभर चालणारे हे अभियान जिल्ह्णातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार असून, मातेला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी, माता व बालकाचे पोषण होऊन कुपोषण दूर होण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.