शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

गोरक्षनगरला ‘महास्वच्छता’ अभियानाची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:30 IST

नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया तसेच स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण वाढत चाललेले आहेत. सदर आजार दूर ठेवण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१९मध्ये होणाऱ्या सर्वेक्षणात नाशिक शहराला पहिल्या दहामध्ये आणण्यासाठी मनपाला स्वच्छतेच्या कामात हातभार लावण्यासाठी लोकसहभाग नोंदवून दिंडोरीरोडवरील गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे रविवारी ‘महास्वच्छता’ अभियान लोकसहभागास गोरक्षनगर येथून सुरुवात करण्यात केली.

पंचवटी : नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया तसेच स्वाइन फ्लू आजाराचे रुग्ण वाढत चाललेले आहेत. सदर आजार दूर ठेवण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१९मध्ये होणाऱ्या सर्वेक्षणात नाशिक शहराला पहिल्या दहामध्ये आणण्यासाठी मनपाला स्वच्छतेच्या कामात हातभार लावण्यासाठी लोकसहभाग नोंदवून दिंडोरीरोडवरील गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे रविवारी ‘महास्वच्छता’ अभियान लोकसहभागास गोरक्षनगर येथून सुरुवात करण्यात केली.  केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत, देशातील स्वच्छ तसेच प्रदूषणमुक्त शहरांसाठी गतवर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये नाशिक शहराचा पहिल्या दहामध्ये क्रमांक आणण्यासाठी मनपातर्फे स्वच्छतेच्या बाबतीत विविध पातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे गेल्या वर्षभरापासून अनेक स्वच्छता अभियान राबवून या प्रयत्नांमध्ये खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला होता. अपुºया लोकसहभागामुळे यंदा नाशिक शहर स्पर्धेत मागे पडले आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत केवळ मनपावर विसंबून न राहता स्वच्छता अभियानात नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावत अभियानामध्ये सामील व्हावे यासाठी अभियान सुरू केले आहे. यावेळी आमदार बाळासाहेब सानप यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास त्याचे फायदे व परिसरातील विविध विकासकामांची माहिती दिली. डॉक्टरांनी डेंग्यू, मलेरियापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय दखल घ्यावी याबाबत सूचना केल्या. यावेळी झालेल्या स्वच्छता अभियान मोहिमेला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, डॉ. रविकिरण निकम, डॉ. साकले डॉ. तोरणे, डॉ. देशपांडे, डॉ. जायभावे उपस्थित होते. संपूर्ण गोरक्षनगरवासीय महिला, पुरुष तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व गोरक्षनगर मित्रमंडळाचे सदस्य सहभागी झाले होते.स्वच्छतेतून आरोग्य हा विचार रुजवण्यासाठी सदर उपक्रम गोरक्षनगरवासीयांच्या सहभागाने महिन्यातून किमान एक दिवस सातत्य ठेवून राबविण्यात येणार आहे. हे स्वच्छता अभियान केवळ गोरक्षनगर पुरतेच मर्यादित न ठेवता मंडळाचे कार्यकर्ते परिसरातील विविध भागांत जाऊन स्वच्छता अभियान राबविणार तसेच स्थानिकांना स्वच्छता अभियानात सहभागी होण्यासाठी प्रेरित करणार आहे.- प्रवीण जाधव, अध्यक्ष, गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळ

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNashikनाशिक