शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

सावधान! आता तिप्पट दंडवसुली

By admin | Updated: November 16, 2016 01:15 IST

बेशिस्त वाहतूक : वाहनांची कागदपत्रे नसल्यास आजपासून होणार कारवाई

नाशिक : वाहनचालकांकडून नियमांच्या होणाऱ्या पायमल्लीस आळा बसावा तसेच वाहतुकीस शिस्त लागावी यासाठी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी कडक पावले उचलली आहेत़ बुधवारपासून (दि़ १६) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीचालकांकडून नवीन सुधारित दरानुसार दंडवसुली केली जाणार असून, दंडाची ही रक्कम सद्यस्थितीतील दंडाच्या तिप्पट आहे़ त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना एकतर विचार तरी करावा लागेल; वा तिप्पट दंड भरण्याची तयारी तरी ठेवावी लागेल़  शहरात वाहनचालकांकडून सिग्नल तोडणे, एकेरी मार्गावरून विरुद्ध दिशेने जाणे, वाहनांची कागदपत्रे, लायसन्स जवळ न बाळगणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे याबरोबरच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे़ या प्रवृत्तीमुळे अपघातांची संख्या वाढत चालली असून, त्यास नागरिक बळी पडत आहेत़ वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना वेसण घालण्यासाठी तसेच शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मंगळवारी रावसाहेब थोरात सभागृहात पोलीस आयुक्तालयातर्फे वाहतूक परिषद -२०१६ चे आयोजन करण्यात आले होते़ पोलीस आयुक्त वाहतूक समस्या जाणून घेत असतानाच कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे वाहनचालक सुसाट झाल्याचे मत काही नागरिकांनी नोंदविले होते़ तसेच जोपर्यंत वाहनचालकांना कायद्याची जरब बसत नाही वा खिशाला झळ लागत नाही तोपर्यंत ही समस्या कायम राहणार असल्याचे मतही मांडण्यात आले़ त्यामुळे आयुक्तांनी शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून बुधवारपासून शासनाच्या नवीन सुधारित नियमानुसार दंडवसुली करण्यात येणार असल्याचे जाहीर केले़ विशेष म्हणजे सुधारित नियमात दंडामध्ये तिप्पट वाढ करण्यात आली आहे़   विनानोंदणी वाहन रस्त्यावर चालविणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, परवाना नसलेल्या व्यक्तीस वाहन चालविण्यास देणे, वाहनाचा विमा काढलेला नसणे, भरधाव वाहन चालविणे यासाठी पूर्वीच्या दंडापेक्षा तिप्पट वाढ करण्यात आली आहे़ तर इतर नियमांमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली असून, यापुढे नवीन नियमानुसार दंडवसुली केली जाणार आहे़