शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! दिवाळीच्या मिठाईत भेसळ

By admin | Updated: October 25, 2016 01:04 IST

गोड विष : चांदीचा वर्खआणि खवाही बनावट; निकृष्ट दर्जाच्या खव्याची आवक

 नाशिक : दिवाळीत मिठाई खरेदी करीत असाल तर नाशिककरांनो सावधान ! कारण मिठाईमध्ये प्रमाणाबाहेर भेसळ होत असल्याची बाब समोर आली आहे. दिवाळीत मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते ही बाब हेरून भेसळ माफिया भेसळयुक्त मिठाई बनवित आहेत. आरोग्यला घातक ठरू शकणारी मिठाई बाजारात आल्याने नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. दिवाळीतील मागणीचा विचार करून मोठ्या प्रमाणात मिठाई बनविली जात असतानाच त्यासाठी बनावट तसेच निकृष्ठ दर्जाचा मावा वापरला जात आहे. विशेष म्हणजे हा मावा शेजारील गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये दाखल होत आहे. ही भेसळ सहजा सहजी ओळखता येत नसली तरी नागरिकांना संभाव्य धोका लक्षात घेत खात्रीशीर स्विट््सच्या दुकानातूच मिठाई खरेदी करावी लागणार आहे. मिठाईच्या क्षेत्रात नामवंत असलेल्या दुकानदारांकडूनही मिठाई घेतल्यास धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी जागरूकता दाखविणे हाच उपाय ठरू शकतो. दिवाळीची मिठाई बनविताना दूषित आणि भेसळयुक्त पदार्थांचा वापर केला जातोच शिवाय मिठाई बनविणारे कारागीर आणि त्यांचे किचन अत्यंत गलिच्छ असल्याने दूषित मिठाईचा धोका अधिकच वाढतो. विशेषत: परप्रांतीय व्यावसायिकांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, त्यांच्या मिठाईचा दर्जा निकृष्ट असल्याची बाब यापूर्वीही अनेकदा समोर आलेली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या दुकानदारांकडे अन्य राज्यांमधून मावा, वनस्पती तूप, बर्फी मागविली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाने आता धाडसत्र सुरू केले आहे. आत्तापर्यंत या विभागाने ८५ नमुने ताब्यात घेतले आहेत शिवाय विभागात १२ ठिकाणी जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. दिवाळीत मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात असते. याचा फायदा घेत विक्रेता मालामध्ये भेसळ करतात. त्यातून विषबाधेसारखे प्रकार घडण्याची शक्यता असते. मिठाई कशी वापरावी ४मिठाईपासून निर्माण झालेला धोका लक्षात घेता मिठाई कितीतास चांगली राहू शकते याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडूनच ग्राहकांना सजग करण्यात येत आहे. शक्यतो ग्राहकांनी मिठाई खरेदी केल्यानंतर २४ तासांतच मिठाई संपविली पाहिजे, तर बंगाली व तत्सम मिठाई असेल तर मिठाई खरेदी केल्यापासून ८ ते १० तास मिठाई चांगली राहू शकते. मिठाई खराब झालेली असेल तर ती तत्काळ नष्ट केली जावी. त्याबरोबरच खाद्यतेल, वनस्पती तूप, तूप हे पदार्थ खरेदी करताना त्यावरील लेबल ‘बेस्ट बिफोर..’ उत्पादन दिनांक पाहूनच खरेदी करावी, असे कळविण्यात आले आहे. मिठाई तसेच अन्न पदार्थ खरेदी करताना काही शंका आल्यास ग्राहकांनी सहआयुक्त (नाशिक) अन्न व औषध प्रशासन विभाग, उद्योग भवन, आयटीआय सिग्नलजवळ येथे संपर्क साधावा, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.