शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

सावधान ! दिवाळीच्या मिठाईत भेसळ

By admin | Updated: October 25, 2016 01:04 IST

गोड विष : चांदीचा वर्खआणि खवाही बनावट; निकृष्ट दर्जाच्या खव्याची आवक

 नाशिक : दिवाळीत मिठाई खरेदी करीत असाल तर नाशिककरांनो सावधान ! कारण मिठाईमध्ये प्रमाणाबाहेर भेसळ होत असल्याची बाब समोर आली आहे. दिवाळीत मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते ही बाब हेरून भेसळ माफिया भेसळयुक्त मिठाई बनवित आहेत. आरोग्यला घातक ठरू शकणारी मिठाई बाजारात आल्याने नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज आहे. दिवाळीतील मागणीचा विचार करून मोठ्या प्रमाणात मिठाई बनविली जात असतानाच त्यासाठी बनावट तसेच निकृष्ठ दर्जाचा मावा वापरला जात आहे. विशेष म्हणजे हा मावा शेजारील गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये दाखल होत आहे. ही भेसळ सहजा सहजी ओळखता येत नसली तरी नागरिकांना संभाव्य धोका लक्षात घेत खात्रीशीर स्विट््सच्या दुकानातूच मिठाई खरेदी करावी लागणार आहे. मिठाईच्या क्षेत्रात नामवंत असलेल्या दुकानदारांकडूनही मिठाई घेतल्यास धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी जागरूकता दाखविणे हाच उपाय ठरू शकतो. दिवाळीची मिठाई बनविताना दूषित आणि भेसळयुक्त पदार्थांचा वापर केला जातोच शिवाय मिठाई बनविणारे कारागीर आणि त्यांचे किचन अत्यंत गलिच्छ असल्याने दूषित मिठाईचा धोका अधिकच वाढतो. विशेषत: परप्रांतीय व्यावसायिकांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, त्यांच्या मिठाईचा दर्जा निकृष्ट असल्याची बाब यापूर्वीही अनेकदा समोर आलेली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या दुकानदारांकडे अन्य राज्यांमधून मावा, वनस्पती तूप, बर्फी मागविली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाने आता धाडसत्र सुरू केले आहे. आत्तापर्यंत या विभागाने ८५ नमुने ताब्यात घेतले आहेत शिवाय विभागात १२ ठिकाणी जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. दिवाळीत मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात असते. याचा फायदा घेत विक्रेता मालामध्ये भेसळ करतात. त्यातून विषबाधेसारखे प्रकार घडण्याची शक्यता असते. मिठाई कशी वापरावी ४मिठाईपासून निर्माण झालेला धोका लक्षात घेता मिठाई कितीतास चांगली राहू शकते याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडूनच ग्राहकांना सजग करण्यात येत आहे. शक्यतो ग्राहकांनी मिठाई खरेदी केल्यानंतर २४ तासांतच मिठाई संपविली पाहिजे, तर बंगाली व तत्सम मिठाई असेल तर मिठाई खरेदी केल्यापासून ८ ते १० तास मिठाई चांगली राहू शकते. मिठाई खराब झालेली असेल तर ती तत्काळ नष्ट केली जावी. त्याबरोबरच खाद्यतेल, वनस्पती तूप, तूप हे पदार्थ खरेदी करताना त्यावरील लेबल ‘बेस्ट बिफोर..’ उत्पादन दिनांक पाहूनच खरेदी करावी, असे कळविण्यात आले आहे. मिठाई तसेच अन्न पदार्थ खरेदी करताना काही शंका आल्यास ग्राहकांनी सहआयुक्त (नाशिक) अन्न व औषध प्रशासन विभाग, उद्योग भवन, आयटीआय सिग्नलजवळ येथे संपर्क साधावा, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.