शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

आरोग्य केंद्रे तपासण्याचा अधिकार बीडीओंकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:06 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रावर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात तालुका वैद्यकीय अधिकारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्रांची तपासणी तसेच चौकशी करण्याचे अधिकार देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत ठराव : वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी गैरहजर

नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रावर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात तालुका वैद्यकीय अधिकारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांना आरोग्य केंद्रांची तपासणी तसेच चौकशी करण्याचे अधिकार देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा सुरू असताना इगतपुरी तालुक्यातील खेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या दोन दिवसांपासून बंद असून, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हजर नाहीत. केंद्र का बंद आहे याचा खुलासाही करण्यास कोणी नाही, उलट दोन दिवसांपूर्वी वेळेवर उपचार न मिळाल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार सदस्यांनी केली. त्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची मिलीभगत असून, अधिकारी गैरहजर असल्यास ते एकमेकांना सांभाळून घेतात व रुग्णसेवा वाºयावर सोडत असल्याची तक्रार सभापती अश्विनी आहेर यांनी केली. यापूर्वी तालुका वैद्यकीय अधिकाºयाच्या रजा मंजुरीचे अधिकार गट विकास अधिकाºयांकडे होते ते नंतर काढून घेण्यात आले त्यामुळे कोणाचेच कोणावर नियंत्रण नसल्याचे सांगण्यात आले. अनेक आरोग्य केंद्राच्या मुख्यालयी आरोग्य कर्मचारी राहत नसल्याची तक्रारी करण्यात आल्या. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डेकाटे यांनी झाल्या प्रकाराची आपण स्वत: चौकशी करणार असल्याचे सांगितले, तर उदय जाधव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लावण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्राच्या चौकशीचे काय झाले? असा सवाल केला. यावर आरोग्य केंद्रे व उपकेंद्रावर कार्यरत वैद्यकीय अधिकाºयांच्या रजेचे अधिकारी तालुका वैद्यकीय अधिकारी व गट विकास अधिकाºयांना संयुक्तरीत्या देण्यात यावेत जेणे करून एकमेकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून, आरोग्य केंद्रांची तपासणी वा चौकशी करण्याचे अधिकार गट विकास अधिकाºयांना देण्याचा ठराव मांडण्यात आला.जिल्ह्णातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे वीज बिल मोठ्या प्रमाणावर थकले असून, बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मध्यंतरी ग्रामपंचायतींनी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळांचे वीज बिल भरण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले होते. परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. जिल्ह्णातील ३,२८५ शाळांपैकी ६७८ शाळांमध्ये अद्याप पर्यंत वीज पोहोचलेली नाही, तर ६१ शाळा दुर्गंम ठिकाणी असल्याने तेथे वीजपुरवठा होऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले. एकीकडे शाळांमध्ये वीज नसताना दुसरीकडे ग्रामपंचायतींकडून शाळांसाठी लाखो रुपयांचे साहित्य पाठविले जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद