नाशिक : महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या वतीने आयोजित राज्य कुमार गटाच्या बास्केटबॉल स्पर्धेत आज तिसऱ्या दिवशी झालेल्या साखळी सामन्यांमध्ये महिला गटात नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद या मोठ्या संघांचा दबदबा राहिला. आजच्या सामन्यांमध्ये मुलांच्या गटात औरंगाबाद, वासिम, नागपूर, रत्नागिरी, औरंगाबाद, तर मुलींच्या गटात नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, दक्षिण मुंबई, पुणे, बीड या संघांनी वर्चस्व राखले. पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील ५५ संघ सहभागी झाले असून, त्यात मुलांचे ३५ व मुलींचे २० संघ आहेत. आज तिसऱ्या दिवशी झालेल्या साखळी सामन्यांमध्ये मुलींंच्या गटात जोरदार चुरस झाली़ सोलापूरच्या संघाने बीडचा ३७-२ अशा मोठ्या गोलफ रकाने पराभव केला़ औरंगाबाद संघाने अहमदनगरचा ३४-५ ने पराभव केला. मुंबई व ठाणे संघात झालेल्या रोमहर्षक लढतीत मुंबईने २९-२८ ने विजय मिळवला़ नाशिकच्या संघाने बलाढ्य समजल्या जाणाऱ्या सेंट्रल मुंबई संघाचा ३९-१६ ने पराभव करत विजय साकार केला़ चंद्रपूर ने यवतमाळचा १० - ५ ने पराभव केला़ पुणे संघाने अमरावतीचा ५७-२७ ने पराभव केला. बीडच्या संघाने १९ - ० अशा मोठ्या फ रकाने चंद्रपूरचा पराभव केला़ मुलांच्या संघात वाशिमच्या संघाने नांदेडचा ४६-४३ असा पराभव केला़ नागपूर संघाने ठाणेचा ५५-२२ ने पराभव केला़ रत्नागिरीने चंद्रपूरचा ४५-२८ असा पराभव केला़ औरंगाबाद संघाने अमरावतीचा ५५-१८ अशा फ रकाने पराभव केला़
बास्केटबॉल स्पर्धेत महिला गटात चुरस पुणे, नाशिकचा दबदबा
By admin | Updated: June 21, 2014 00:59 IST