शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

न्यायालयात हव्यात मूलभूत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:25 IST

स्त्रियांनी शिकून निरनिराळ्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास सुरुवात केली. त्यात डॉक्टर, इंजिनिअर यांसह वकिली क्षेत्रातही त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. पूर्वी केवळ वकील म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया आज न्यायाधीशपदापर्यंत आपली छाप उमटवू शकल्या आहेत.

नाशिक : स्त्रियांनी शिकून निरनिराळ्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास सुरुवात केली. त्यात डॉक्टर, इंजिनिअर यांसह वकिली क्षेत्रातही त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. पूर्वी केवळ वकील म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया आज न्यायाधीशपदापर्यंत आपली छाप उमटवू शकल्या आहेत. असे असताना आजही वकील म्हणून काम देताना, करवून घेताना काहीअंशी स्त्री-पुरुष भेदाभेद केला जातो. महिला वकिलांवर विश्वास टाकताना साशंकता राहते. जिल्हाभरात ७२० महिला वकील कार्यरत असताना आणि सर्व प्रकारच्या केसेस सक्षमतेने हाताळत असताना, जिल्हा न्यायालयात त्यांना स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, अशा मूलभूत गोष्टींची याचना करावी लागत आहे.  ज्युनिअर वकील कामात गांभीर्य ठेवत नाही, संगणकीकरणाच्या रेट्यामुळे व त्याची चांगली सेवा मिळत नसल्याने वकिलांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. अशा स्थितीत निष्पक्ष न्यायाचे ध्येय ठेवत वेगाने काम करणे सोपे राहिलेले नाही. वकिलांना त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा न्यायालय प्रशासनानेच मदत करण्याची अधिक अपेक्षा आहे. त्याचबरोबर ज्युनिअर वकिलांना न्यायालयात काम करताना, वावरताना पाळावयाच्या गोष्टींची आता नियमावलीद्वारे दखल घेतली जात आहे. त्याचे पालन करीत वकिलीसारख्या पवित्र क्षेत्राचे गांभीर्य पाळले जावे, असे मत व्यक्त केले आहे.  याशिवाय व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अवाजवी संकल्पना, इंटरनेटचा अतिवापर, सदसद्विवेक न बाळगता होत असलेली वर्तणूक यामुळे धोक्यात आलेल्या कुटुंबव्यवस्थेबद्दलही काळजी वाटत असल्याचा सूर महिला वकिलांनी व्यक्त केला. कुटुंब न्यायालयासह सर्व कोर्ट एकाच ठिकाणी आणल्यास काम करणे सोपे होईल, असे मत विविध क्षेत्रात काम करणाºया ज्येष्ठ, अनुभवी महिला वकिलांनी व्यक्त केले. ‘लोकमत’च्या विचार-विमर्शच्या व्यासपीठावर झालेल्या चर्चेत अ‍ॅड. इंद्रायणी पटणी, अ‍ॅड. विजया माहेश्वरी, अ‍ॅड. मंजुषा गुर्जर, अ‍ॅड. मुग्धा सापटणेकर, अ‍ॅड. अपर्णा देव, अ‍ॅड. सुनीता साळवे आदींनी सहभाग घेतला.अनेक समस्याजिल्हा न्यायालयात शेकडोच्या संख्येने असणाºया महिला वकील, विविध कामांनिमित्त येणाºया महिला यांच्यासाठी केवळ तीन स्वच्छतागृह आहेत. त्यांची अवस्थाही बिकट आहे. स्वच्छतागृह नियमित स्वच्छ केले जात नाही. पुरेसे पाणी नसते. सार्वजनिक असल्याने त्याची देखभाल दुरुस्ती होत नाही. वापराबाबत शिस्त पाळली जात नाही.पिण्याच्या पाण्याची सोय आहे. परंतु न्यायालय आवारात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे वकिलांसह सर्वांचेच मोठे हाल होतात.पार्किंगचा प्रश्नही गंभीर रूप धारण करत आहे. गाड्या लावायला, त्या बाहेर काढायला मोठी कसरत करावी लागते. चांगली कॅँटिन, बाररूम छोटे आहे. त्यात कॉन्फरन्स करता येत नाही. रेंटेल टेबल उपलब्ध करून द्या.  शहरात एकत्र कॉम्प्लेक्समध्ये नवीन कौटुंबिक न्यायालय सुरू करावे. सर्व कोर्ट एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा. महिलांचे खटले प्रलंबित राहतात. न्यायालयांची संख्या कमी आहे. न्यायालयाला आता नवीन जागा मिळतेय, त्या जागेत या समस्या प्राधान्याने सोडवल्या जाव्यात, अशी अपेक्षा महिला वकिलांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :advocateवकिलNashikनाशिक