शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

गोदावरी नदीने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 20:10 IST

चांदोरी : राज्यावर दुष्काळाचे सावट दिसत असताना गोदावरी नदीने तळ गाठला आहे. बारमाही असलेली व अहमदनगर, मराठवाडा व नाशिकची जीवनदायीनी असलेल्या गोदावरीने तळ गाठला.

ठळक मुद्देचांदोरी : ग्रामस्थांची पाणी आवर्तन सोडण्याची मागणी

चांदोरी : राज्यावर दुष्काळाचे सावट दिसत असताना गोदावरी नदीने तळ गाठला आहे. बारमाही असलेली व अहमदनगर, मराठवाडा व नाशिकची जीवनदायीनी असलेल्या गोदावरीने तळ गाठला.कमी झालेल्या पर्जन्यमान यामुळे पाणी टंचाईच्या झळा आता गोदाकाठी असलेल्या गावांना बसत आहे. चांदोरी पासून पूढे ८ ते १० किमी अंतरावर असलेल्या नांदूरमध्यमेश्वर धरणाचा फुगवटा चांदोरी येथील गोदापात्रात असतो परंतु धरणाच्या पाण्याची पातळी कमी असल्याने पाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.एप्रिल महिन्याच्या सुरवाती पासूनच गोदावरी नदीची पाणी पातळी घटण्यास सुरवात झाली होती. एप्रिलच्या अखेर गोदावरीने तळ गाठला. यामुळे गोदाकाठच्या गावांना तसेच आसपासच्या गावांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. चांदोरी व इतर गावातील शेतकऱ्यांनी लाखो रु पये खर्चकरून शेतीसाठी नदीवरु न पाईपलाइन केली आहे. नदीपात्रात मूळ पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या सिंचनाचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.चांदोरी येथे गोदावरी नदीवर घाट असल्याने दशक्रि या विधीचे कार्यक्र म येथे होत असतात परंतु पाण्याचा अभावामुळे अंघोळी करीता ग्रामपालिकेच्या टँकर मार्फत पाणी पुरवठा होत आहे. चांदोरीच्या पश्चिम व उत्तर भागात शेत, मळ्यातील विहिरींनी व बोअरवेलने सुद्धा तळ गाठला आहे. या मुळे शेतकऱ्यांची शेतीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.सद्यस्थितीला नदी पात्रात असलेल्या ग्रामपालिकेच्या विहिरी मधून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. हा पुरवठा अवघे काही दिवस टिकेल इतका आहे. यामुळे आता स्थानिक नागरिक व शेतकरी धरणाच्या पाण्याचा आवर्तनाची मागणी करू लागले आहे.राज्यभर दुष्काळस्थिती असताना गोदावरी नदीने तळ गाठल्याने गोदाकाठ व इतर परिसरातील गावांनी पाणीटंचाई लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापरावे.- शिरीष गडाख,उपसरपंच, ग्रामपालिका चांदोरी.