शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भोजापूर धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 14:30 IST

नांदूरशिंगोटे - सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. परिसरासाठी वरदान ठरलेल्या भोजापूर धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक राहिला असून मृत पाणी साठ्यावर पाणी पुरवठा योजनांचे भवितव्य अवलंबून आहेत.

नांदूरशिंगोटे - सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. परिसरासाठी वरदान ठरलेल्या भोजापूर धरणात केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक राहिला असून मृत पाणी साठ्यावर पाणी पुरवठा योजनांचे भवितव्य अवलंबून आहेत. पाच धरणांपैकी भोजापूर धरण सर्वात मोठे धरण आहे. सिन्नर व संगमनेर तालुक्यातील काही गावे धरणाच्या लाभक्षेत्रात असून भोजापूर धरणावरच परिसरातील पाणी पुरवठा योजना व शेती व्यवसाय अवलंबून आहे. म्हाळुंगी नदीवर भोजापूर धरण बांधण्यात आले असून ३६१ दशलक्ष घनफूट क्षमता असुन १०७ दशलक्ष घनफूट निरूपयोगी साठा आहे. गत महिन्यापासून तीव्र उन्हामुळे धरणातील पिण्याचे वेगाने बाष्पीभवन तसेच धरणातून राजरोसपणे होणारा अवैध पाणी उपसा यामुळे धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे.यावर्षी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरून सुध्दा मागील वर्षी पेक्षा पाणीसाठा कमी शिल्लक राहिल्याने मे मिहन्याच्या अखेरीस धरण कोरडे पडण्याची शक्यता आहे.भोजापूर धरण गतवर्षी पुर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत होते. पूरपाण्याचा लाभक्षेत्रातील गावांना फायदा झाला होता. सिन्नर व संगमनेर तालुक्यातील सुमारे २१ गावातील १०० च्या आसपास लहान मोठे केटीवेअर बंधारे भरण्यात आले होते. तब्बल अडीच मिहने पूरपाणी कालव्याद्वारे सुरु होते. पुर्व भागातील पांगरी परिसरात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे अनेक वर्षानतंर पाणी पोहचले होते. भोजापूर धरणाच्या पाण्यावर कणकोरी सह पाचगावे व मनेगाव सह सोळागावे नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. आजमतिीला धरणातील उपयुक्त पाण्यासाठ्या पैकी फक्त दोन दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक आहेत. धरणातील मृत पाणी साठ्यावर आगामी काळात पाणी पुरवठा योजना तग धरून राहतील अशी परिस्थिती आहे. धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने पाण्याला पिवळसर रंग येतो. त्यामुळे पाणी बेचव लागते.भविष्य काळात पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भोजापूर धरणात उपयुक्त पाणी साठा संपत आला असुन मृतपाणी साठ्यावर नळपाणी योजना सुरू राहतील व सुमारे दोन महिने पाणी पुरवठा सुरू राहू शकतो.------------------गाळाची समस्या बनली गंभीरभोजापूर धरणाच्या पाण्यावरच परिसराचे भवितव्य अवलंबून आहे.भोजापूर धरण उभारणीपासून आजपर्यंत गाळ उपसण्यात आला नाही तसेच धरणाच्या अनेक भागात टेकड्या असल्याने पाण्याची जागा गाळाने व्यापली आहे. त्याचा परिणाम पाणी पातळीवर झाला आहे.गाळाचे प्रमाण जास्त असल्याने पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातील पाणी नदी द्वारे वाहून जाते.धरणातील गाळ काढल्यास पाण्याची पातळी वाढेल आण ित्याचा फायदा लाभक्षेत्रातील शेतकर्यांना होईल. 

टॅग्स :Nashikनाशिक