शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खासगीकरणाने बँकांचे प्रश्न सुटणार नाही : सतीश मराठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:13 IST

खासगीकरण हा बँकिंग क्षेत्रातील अडचणींवर उपाय निश्चितच नाही. सहकारी बँकांचा मूळ उद्देश नफा कमावणे नाही. त्यामुळे सहकारी बँकांचे खासगीकरण झाले तर ते सहकाराच्या मूळ उद्दिष्टालाच हरताळ फासणारे असून, खासगीकरणाने सहकारी बँकांचे प्रश्न सुटणार नाही,

नाशिक : खासगीकरण हा बँकिंग क्षेत्रातील अडचणींवर उपाय निश्चितच नाही. सहकारी बँकांचा मूळ उद्देश नफा कमावणे नाही. त्यामुळे सहकारी बँकांचे खासगीकरण झाले तर ते सहकाराच्या मूळ उद्दिष्टालाच हरताळ फासणारे असून, खासगीकरणाने सहकारी बँकांचे प्रश्न सुटणार नाही, त्यासाठी बँकिंग कायद्यात बदल करून नवीन सहकारी बँकिंग धोरण अस्तित्वात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थ तज्ज्ञ तथा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती समितीचे नवनिर्वाचित संचालक सतीश मराठे यांनी केले आहे.  शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात उत्तर महाराष्ट्र प्रांताच्या सहकार भारतीतर्फे रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती समितीवर संचालकपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर सतीश मराठे यांचा सोमवारी (दि.२७) स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.  व्यासपीठावर अध्यक्षस्थानी अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर यांच्यासह नाशिक महिला बँकेच्या अध्यक्षा शशिकला अहिरे, राष्ट्रीय बँक प्रकोष्टचे प्रमुख संजय बिर्ला, सहकार भारतीचे प्रदेश सचिव विनायक खटावकर आदी उपस्थित होते. सतीश मराठे म्हणाले, १९६९ मध्ये बँकांच्या खासगीकरणाचा प्रयत्न यशस्वी झालेला नसल्याचा पूर्व इतिहास आहे. त्यामुळे बँकांच्या खासगीकरणापेक्षा सहकारी बँकांसह अर्बन कॉ-आॅपरेटीव्ह बँका, पतसंस्था आणि क्रेडिट सोसायट्यांना नियंत्रित करण्यासाठी ५० वर्षांपूर्वीच्या कायद्यात दुरुस्ती आवश्यक आहे. त्यामुळे सहकारी बँकांसह सध्या अडचणीत असलेल्या भारतीय बँकिंग व्यवस्थेच्या वृद्धी आणि विकासाठी नवीन बँकिंग धोरण अस्तित्वात आणण्याची गरज असल्याचे मत मराठे यांनी व्यक्त केले.  दरम्यान, विविध सहकारी बँका व पतसंस्थांच्या प्रतिनिधींनीही मराठे यांचा सत्कार केला. प्रास्ताविक अजय ब्रम्हेचा यांनी केले. सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केले.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक