शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

छोट्या कर्जदारांबाबत बॅँकेने सबुरीने घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:16 IST

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या एकूण कर्जदारांपैकी अवघ्या पाच टक्के बड्या कर्जदारांकडे ७० ते ८० टक्के थकबाकी आहे. त्यामुळे बॅँकेच्या व्यवस्थापनाने बड्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याच्या कार्यवाहीला विरोध असण्याचे कारण नाही, मात्र बड्या कर्जदारांप्रमाणे सरसकट सर्वच छोट्या कर्जदारांनाही वेठीस धरणे योग्य होणार नाही, असे मत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केले व छोट्या कर्जदारांबाबत जिल्हा बॅँकेने सबुरीचे घ्यावे, अशी आपण सूचना केल्याचे ते म्हणाले.

ठळक मुद्दे सूरज मांढरे : बड्या थकबाकीदारांकडून वसुली करा

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या एकूण कर्जदारांपैकी अवघ्या पाच टक्के बड्या कर्जदारांकडे ७० ते ८० टक्के थकबाकी आहे. त्यामुळे बॅँकेच्या व्यवस्थापनाने बड्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याच्या कार्यवाहीला विरोध असण्याचे कारण नाही, मात्र बड्या कर्जदारांप्रमाणे सरसकट सर्वच छोट्या कर्जदारांनाही वेठीस धरणे योग्य होणार नाही, असे मत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केले व छोट्या कर्जदारांबाबत जिल्हा बॅँकेने सबुरीचे घ्यावे, अशी आपण सूचना केल्याचे ते म्हणाले.पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी मांढरे यांनी जिल्हा बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. बॅँकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे थकबाकीदारांकडील वसुलीशिवाय पर्याय नाही, कर्ज वसूल झाले तरच ते ठेवीदारांना पैसे देऊ शकतील ही वस्तुस्थिती असल्याचे सांगून मांढरे यांनी, बॅँकेकडून सुरू असलेल्या सक्तीच्या वसुलीबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी आल्या असून, काही संघटनांनी निवेदने देऊन आंदोलनाचा इशाराही दिला आहे. त्यामुळे एकीकडे बॅँक वाचविणेही गरजेचे आहे तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीत शेतकरी टिकविणेही तितकेच महत्त्वाचे असल्याने आपण बॅँकेच्या व्यवस्थापनाला यापूर्वीच टॉप टेन थकबाकीदारांवर कारवाई करण्याबाबत सूचना केल्या असून, शंभर लहान शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल करण्याऐवजी एकच मोठ्या थकबाकीदाराकडून मोठी रक्कम वसूल करण्याला प्राधान्य देण्यात यावे असे मत व्यक्त केले. याकामी प्रशासन म्हणून जी काही मदत लागेल ती करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.जिल्हा बॅँकेत शेतकरीच कर्जदार व शेतकरीच ठेवीदार आहे. त्यामुळे कर्जाची वसुली न झाल्यास त्याचा परिणाम ठेवीदार शेतकऱ्यांवरच होणार आहे. हे खरे असले तरी, ज्या मोठ्या थकबाकीदारांकडे रक्कम आहे, त्यांच्याकडून ती वसूल व्हावी, परंतु लहान शेतकºयांना वेठीस धरू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले आहे.