शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

लग्नतिथीने वाहतुकीचा वाजला ‘बँड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 01:32 IST

रविवारी दाट लग्नतिथी असल्यामुळे औरंगाबाद ते नांदूर नाक्यादरम्यान असलेल्या मंगल कार्यालयांमध्ये लग्नसोहळे असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि अवघ्या तीन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना दीड ते दोन तासांचा अवधी लागला. वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांच्या हॉर्नचा गोंगाट आणि ठिकठिकाणी लग्नसोहळ्यातील डीजेमुळे या मार्गाचा अक्षरश: बँड वाजला होता.

ठळक मुद्देऔरंगाबाद ते नांदूर नाका : तीन किलोमीटरचा मार्ग ‘दोन तास प्रवास’

नाशिकरोड : रविवारी दाट लग्नतिथी असल्यामुळे औरंगाबाद ते नांदूर नाक्यादरम्यान असलेल्या मंगल कार्यालयांमध्ये लग्नसोहळे असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि अवघ्या तीन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना दीड ते दोन तासांचा अवधी लागला. वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांच्या हॉर्नचा गोंगाट आणि ठिकठिकाणी लग्नसोहळ्यातील डीजेमुळे या मार्गाचा अक्षरश: बँड वाजला होता.

औरंगाबाद ते नांदूर नाक्यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला लॉन्स, हॉल, मंगल कार्यालये असल्याने लग्नतिथीला या मार्गावर अनेक सोहळे असतात. रविवारी (दि. २४) दिवसभर या मार्गावर अनेक लग्नविधी असल्यामुळे दिवसभर या मार्गावर वाहनांची वर्दळ होती. मात्र, सायंकाळी असलेल्या लग्नकार्यांमुळे वाहतूक कोंडी झाल्याने या मार्गातून दुचाकी, चारचाकी गाडी काढणेही कठीण झाले आणि औरंगाबाद ते नांदूर नाका हे अवघ्या तीन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनधारकांना दीड ते दोन तासांचा अवधी लागला. लग्न सोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडींची वाहने रस्त्यातच उभी असल्यामुळे मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांची अडचण झाली आणि वाहतूक कोंडीत वाहने अडकून पडली.

शेजारी-शेजारी असलेले लॉन्स, मंगल कार्यालयांमध्ये एकाच वेळी विधी असल्यामुळे आलेल्या वऱ्हाडींची गर्दी वाढत गेली. लॉन्सव्यतिरिक्त वऱ्हाडींनी रस्त्यावरही वाहने उभी केली होती. अशातच लग्नाच्या वराती आणि रस्त्यावरील वाहनांची वर्दळ यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत गेली. सुमारे अडीच ते तीन तास वाहतूक कोंडी कायम होती.

--इन्फो--

आमदार ढिकले उतरले रस्त्यावर

येथील एका लग्न सोहळ्यासाठी आलेले आमदार ढिकले यांनी वाहतूक कोंडीची परिस्थिती पाहून स्वत: वाहतूक नियंत्रणासाठी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मदतीला मग कार्यकर्तेही धावून आले. या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस नसल्याने ढिकले यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांशी संपर्क करून कोंडीची माहिती दिली.

--इन्पो--

पोलीसही अडकले वाहतूक कोंडीत

आमदार ढिकले यांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर औरंगाबाद नाक्यापर्यंत पोलीस पोहोचले. मात्र, तेही वाहतूक कोंडीत अडकून पडले. त्यांचे वाहन पुढे येत नसल्याने अखेर गाडीतून उतरून पोलिसांनी कोंडीतून मार्ग काढत वाहतूक नियंत्रणाचा प्रयत्न केला.

टॅग्स :NashikनाशिकTrafficवाहतूक कोंडी