शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

जिल्हा परिषदेत खासगी वाहनांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:17 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर लोक वाहने उभी करून निघून जात असल्याने निर्माण होणाºया वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्हा परिषद आवारात खासगी वाहनांना बंदी केली असून, जिल्हा परिषदेचे ओळखपत्र असणाºयांचीच वाहने आवारात यापुढे उभी राहणार आहेत. सायंकाळी स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी गेटवर उभे राहून ओळखपत्राची तपासणी केली.

ठळक मुद्दे ओळखपत्र आवश्यक : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वत: गेटवर

नाशिक : जिल्हा परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर लोक वाहने उभी करून निघून जात असल्याने निर्माण होणाºया वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्हा परिषद आवारात खासगी वाहनांना बंदी केली असून, जिल्हा परिषदेचे ओळखपत्र असणाºयांचीच वाहने आवारात यापुढे उभी राहणार आहेत. सायंकाळी स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी गेटवर उभे राहून ओळखपत्राची तपासणी केली.जिल्हा परिषदेतील वाहततळाचा मुद्दा अत्यंत ज्वलंत असून, सदस्य, पदाधिकारी आणि बाहेरील व्यक्तींच्या वाहनामुळे वाहनतळावर वाहने उभी करणे कठीण होते. जिल्हा परिषदेची दर्शनी बाजू आणि मागील बाजूस नवीन इमारतीसमोरदेखील मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याने पायी चालणेदेखील कठीण होते. जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांव्यतिरिक्त परिसरातील बॅँका, खासगी व्यावसायिकांचे कर्मचारी जिल्हा परिषदेच्या आवारात वाहने उभी करून निघून जात होते. यामुळे संपूर्ण इमारतीला दुचाकी वाहनांचा वेढा पडलेला असायचा. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी आता याप्रकाराला आळा घातला असून, जिल्हा परिषदेचे आवार मोकळे झाले आहे.जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांव्यतिरिक्त अन्य खासगी वाहनधारक वाहने लावत असल्याची बाब निदर्शनास आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी स्वत: जिल्हा परिषदेच्या गेटवर उभे राहून वाहनधारकांच्या ओळखपत्राची तपासणी केली. यापुढे ओळखपत्राशिवाय कुणालाही जिल्हा परिषद आवारात वाहन लावण्यास मनाई करण्यात येणार असून, अनधिकृतपणे वाहन लावल्यास कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना डॉ. गिते यांनी प्रशासन विभागाला दिल्या आहेत.पार्किंगची नवीन जागाजिल्हा परिषद आवारात वाहन पार्किंगची मोठी समस्या निर्माण होत असून, यासाठी डॉ. गिते यांनी जिल्हा परिषदेच्या मागील बाजूस (नवीन इमारतीसमोर नाही) वाहन लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या संख्येपेक्षा अधिक वाहने पार्किंगमध्ये उभी केली जात असल्याने सदरची वाहन बाहेरील व्यक्तींची असल्याचे दिसून आले आहे. सोमवारी सायंकाळी सुटी झाल्यानंतर डॉ. गिते यांनी गेटवर उभे राहून कर्मचाºयांच्या ओळखपत्रांची तपासणी केली. यापुढे सकाळी येताना व सायंकाळी जाताना सर्व वाहनधारकांचे ओळखपत्र तपासूनच त्यांना आत सोडले जाणार आहे.