शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात कांदा उत्पादकांचा संप

By admin | Updated: May 7, 2016 22:08 IST

शुकशुकाट : भाव घसरल्याने बाजार समितीत आवक ठप्प

 येवला : कांद्याच्या घसरलेल्या भावाकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी येवला तालुक्यासह पंचक्र ोशीतील कांदा उत्पादक शेतकरी शुक्र वार पासून चार दिवस संपावर गेल्याने येवला बाजार समितीत शुकशुकाट होता.शुक्र वारपासून विक्र ी साठी आणू नका या शेतकरी संघटनेच्या आवाहनाला, सर्वच शेतकऱ्यांसह ,विशेष म्हणजे व्यापारी आणि कृषी उत्पन्न बाजार सम्मिती सभापती उषा शिंदेसह संचालकांनी बाजार समितीच्या आवारात फलक लावून संपाला पाठींबा दिला आहे. या संपामुळे येवला बाजार समिती आवारात दररोज ४०० वाहनातून येणारी सुमारे ४ ते ५ हजार क्विंटल आवक ठप्प झाली आहे.केवळ कार्यालयीन कामकाज चालू होते.शेतकरी संघटना नेते संतु पाटील झांबरे यानी येवला कृषि उत्पन्न बाजार समितिच्या आवारात झालेल्या शेतकऱ्यांच्या बुधवारी सकाळी दहा वाजता झालेल्या शेतकरी व व्यापारी ,यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता.महाराष्ट्रासह येवला तालुका दुष्काळाने होरपळुन निघाल्याचा अनुभव आपण घेत असताना यंदाची पाणी टंचाई ऐतिहासिक आहे.या सर्व परिस्थितितही पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकर्यांनी जमेल त्यागावी जाऊन पाणी आहे तेथे आपले उन्हाळ कांद्याचे रोप नेऊन शेती मालकाला एकरी पंचवीस ते तीस हजार रु पये ठोका देवून कांदा लागवड केली.लागवडीसाठी टोळी,रोप घेऊन जाणे, पाणी भरण्यासाठी जाण्या येण्याचा खर्च अशी सर्कस करूनही आज काद्याला केवळ चारशे ते सहाशे रूपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे.कांद्याच्या काढणी आण िसाठवण याचाच खर्च देखील फिटत नाही .प्रती क्विंटल 700 रु पये खर्च येतो आण िउत्पन्न प्रतिक्विंटल 400 रु पये घ्यायचे हा कुठला धंदा ?असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.निर्यातमूल्याचे सततचे धरसोडीचे धोरण,यामुळे कांद्याला अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव नाही.या प्रश्नासंदर्भात येवला तालुका शेतकरी संघटनेचे संतु पाटील झांबरे यांचेसह संध्या पगारे, अरु ण जाधव, अनिस पटेल, बाळासाहेब गायकवाड, सुभाष सोनावणे, सुरेश कदम, सुरेश जेजूरकर,प्रभाकर भोसले, अनिल गायकवाड, सतिष जगझाप यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते पाशा पटेल,प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत,यांचेशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली .आता आपण शासनात आहात किमान शेतकर्याच्या कांदा बाबत येवल्याचा आवाज शासनाच्या कानी घाला.त्यामुळे किमान शेतकर्याला दिलासा द्यावा.आम्ही शासनाशी बोलतो असे आश्वासन येवलेकरांना मिळाले.शासनाने प्रती क्विंटल कांद्याचे किमान मूल्य ठरवावे.आण िकिमान मूल्यापेक्षा मार्केटवर कमी भाव मिळाला तर कांदा उत्पादक शेतकर्याची फरकाची रक्कम त्या शेतकर्याच्या खात्यावर थेट वर्ग करावी .याचा थेट फायदा शेतकर्याला होईल.अशी मागणी देखील संपकरी शेतकर्यांनी केली आहे. (वार्ताहर)