नांदूरमध्यमेश्वर धरणातील पाण्याची पातळीही कमालीची घटली असून या धरणामध्ये काही ठिकाणी पाण्याचे डबके तर काही ठिकाणी गाळ साचलेला दिसत आहे. यामुळे स्थलांतरीत पक्षी त्या साचलेल्या डबक्यांच्या दिशेने धाव घेत आहेत; मात्र त्यांच्याबरोबर मासेमारी करणारे देखील डबक्यांवर आक्रमण करीत असल्या कारणाने पक्ष्यांना असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्न स्थलांतरीत पक्ष्यांपुढे निर्माण झाला आहे. मच्छीमारांक डून पक्ष्यांची शिकार होण्याच्या भितीपोटी पक्षी पुढे सरकत नाही परिणामी पक्ष्यांवर उपासमारीचे संकट ओढवले असून पुढील तीन महिन्यासाठी धरणावर मासेमारीसाठी बंदी घालावी अशी मागणी होत आहे.
धरणावर मासेमारीला बंदी घालावी
By admin | Updated: July 11, 2014 00:22 IST